शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानाच्या मालमत्तेचे रक्षण वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 11:56 IST

भारतीय सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या जवानाच्या स्वत:च्या मालमत्तेचे रक्षण मात्र वाऱ्यांवर आहे. या जवानाच्या जागेतून त्याच्या संमतीशिवाय दहा फुटांचा रस्ता नेण्याची मर्दुमकी ग्रामपंचायतीने गाजवली आहे. त्याने आपल्या जागेला घातलेले कुंपणही ग्रामपंचायतीने तोडून नेले आहे. आता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली असून, कागदपत्र तपासण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

ठळक मुद्देसीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानाच्या मालमत्तेचे रक्षण वाऱ्यावरजिल्हाधिकारी चव्हाण यांनी लक्ष घातल्यामुळे शासकीय यंत्रणा कामाला

रत्नागिरी : भारतीय सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या जवानाच्या स्वत:च्या मालमत्तेचे रक्षण मात्र वाऱ्यांवर आहे. या जवानाच्या जागेतून त्याच्या संमतीशिवाय दहा फुटांचा रस्ता नेण्याची मर्दुमकी ग्रामपंचायतीने गाजवली आहे. त्याने आपल्या जागेला घातलेले कुंपणही ग्रामपंचायतीने तोडून नेले आहे. आता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली असून, कागदपत्र तपासण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.हा दुर्दैवी प्रकार चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे घडला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या सुभेदार विनोद वसंत कदम यांच्याबाबत हा प्रकार घडला असून, सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या या जवानावर सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची वेळ आली आहे.सुभेदार विनोद कदम यांनी चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे सहा गुंठे जागा घेतली आहे. या जागेपलिकडे निवृत्त सैनिक शांताराम शिंदे यांचे घर आहे. त्यांच्या घरानजीक रस्ता असतानाही ग्रामपंचायतीने त्यांना विनोद कदम यांच्या जागेतून रस्ता काढून देण्यात आला आहे. शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्याचा इशारा दिल्यामुळे ग्रामपंचायतीने घाई करून त्यांना कदम यांच्या जागेतून रस्ता काढून दिला आहे.जवान विनोद कदम यांच्या जागेत ग्रामपंचायत दप्तरी रस्त्याची नोंद घालण्यात आली आहे. याबाबत कदम यांच्यावतीने माहितीच्या आधारात ग्रामपंचायतीकडे या रस्त्याबाबत माहिती विचारण्यात आली. मात्र, या जागेत रस्त्याची नोंद करताना आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींची पूर्तता झालेली नसल्याचे पुढे आले आहे.

ही जागा रस्त्यासाठी देणारे एक करारपत्र कदम कुटुंबाला मिळाले आहे. त्यावर विनोद कदम यांचे नाव व स्वाक्षरी आहे. मात्र, आपण अशी कोणतीही स्वाक्षरी केली नसल्याची बाजू विनोद कदम यांनी मांडली आहे. करारपत्राच्या बाँडपेपरवर जी तारीख आहे, त्यावेळी कदम हे काश्मीर सीमेवर कार्यरत होते. आपल्या जागी अन्य कोणीतरी स्वाक्षरी करून बनावट दस्तऐवज तयार केला असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.आपल्या जागेतून रस्त्याचे काम केले जात असल्याची माहिती कळल्यानंतर कदम काश्मीरमधून चिपळूणला दाखल झाले आणि त्यांनी आपल्या जागेला कुंपण घातले. ग्रामपंचायतीने आपल्या जागेत अतिक्रमण केले असल्याची तक्रार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे करण्यासाठी सोमवारी ते रत्नागिरीत दाखल झाले.

जिल्हाधिकारी यांनी चिपळूण प्रांताधिकारी यांना याबाबत माहिती घेण्याची सूचना केली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी ज्यावेळी कदम प्रांताधिकारी आणि चिपळूण पंचायत समितीचे गटविस्तार अधिकारी यांना भेटण्यासाठी गेले, त्यावेळेत ग्रामपंचायतीने त्यांच्या जागेवरील कुंपण तोडून नेले.बुधवारी विनोद कदम यांनी जिल्हाधिकारी यांची पुन्हा भेट घेतली आणि झालेल्या प्रकाराची माहिती दिली. आपली संमत्ती नसताना आपल्या जागेत रस्त्याची नोंद करून ग्रामपंचायतीने अतिक्रमण केले असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. कागदपत्र पाहिल्यानंतर संतापलेल्या जिल्हाधिकारी यांनी यंत्रणेला तातडीने घटनास्थळी जाऊन माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत.आक्रोश मीडियावरसैनिकांबद्दलचा आक्रोश फक्त सोशल मीडियावर केला जातो. प्रत्यक्षात त्यांच्या कुटुंबियांना पाठबळ देण्याऐवजी त्यांच्या जागेत अतिक्रमण केले जाते. सर्वसामान्य माणसे सैनिकांबद्दलचे प्रेम फक्त मीडियावरच दाखवणार का, असा प्रश्न यातून निर्माण होत आहे.आता धावाधाव सुरूआता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशामुळे करारपत्रावरील सही तपासण्याचे काम पंचायत समितीने हाती घेतले आहे. कदम यांच्या जागेचे तोडलेले कुंपण ग्रामपंचायतीमध्येच आहे. विस्तार अधिकारी आता ग्रामपंचायतीकडून माहिती घेत आहेत.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी