शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

डी.एड. ऐवजी विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST

रत्नागिरी : शिक्षक भरतीसाठी टीईटी सक्तीची करण्यात आली आहे. मात्र, या परीक्षेचा निकाल अवघा ...

रत्नागिरी : शिक्षक भरतीसाठी टीईटी सक्तीची करण्यात आली आहे. मात्र, या परीक्षेचा निकाल अवघा एक ते दोन टक्के लागत आहे. शिवाय गेली दहा वर्षे शिक्षक भरती रखडली आहे. दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लाखो रूपये खर्च करून अनेकांना नोकरी नसल्याने युवकांनी डी. एड.साठी प्रवेश घेणे बंद केले आहे. जिल्ह्यातील चार डी.एड महाविद्यालयात २४० प्रवेश क्षमता असताना अवघे ७८ अर्ज आले असून, अन्य विद्यार्थ्यांनी आता स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली आहे.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम राज्यभरात सुरू आहे. सुरूवातीला डीएड (डिप्लोमा इन एज्युकेशन) नंतर डीटीएड (डिप्लोमा इन टिचर एज्युकेशन) सध्या डीएलएड (डिप्लोमा इन इलिमेंटरी एज्युकेशन) या नावाने अभ्यासक्रम सुरू आहे. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शिक्षक नोकरीची हमखास संधी होती. त्यामुळे डीएड विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत असे. मात्र, सध्या शिक्षक भरतीच बंद असल्याने लाखो विद्यार्थी डी.एड वा बी.एड होऊन नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातही नोकरीसाठी सीईटी, टीईटीसारख्या परीक्षांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, तरीही शिक्षक भरतीबाबत अनिश्चितता आहे. २०११ नंतर २०१७ ला पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यात आली. मात्र, त्यावेळी निम्मी भरती झाली नाही. त्यामुळे अनेकांचा हिरमाेड झाला. आता डी.एड ऐवजी बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली आहे.

---------------------

सन २०१० नंतर २०१७ साली शिक्षक भरतीचे नियोजन करण्यात आले. मात्र ही प्रक्रिया आजमितीस लांबलेली आहे. पवित्र पोर्टलचा जो गाजावाजा करण्यात आला त्यातील भोंगळ कारभार दुनियेसमोर आला आहे. बारा हजार पदे भरण्याची घोषणा करून देखील अवघी तीन ते चार हजार पदे प्रत्यक्ष भरली आहेत. एखादी भरती दोन वर्षापेक्षा अधिक लांबविणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळण्यासारखे आहे.- प्रभाकर धोपट, खंडाळा-रत्नागिरी

--------------------

शिक्षक भरती आज करू, उद्या करू असे करता करता शासनाने दहा वर्षे आश्वासनावर ढकलली आहेत. दहा वर्षांतील तरूणाई शिक्षण घेऊन बरबाद झाली आहे. बदललेली धोरणे आणि भरती करण्याबाबत उदासीनता, भरतीबाबतचे निर्णय याचा फटका बसत आहे. त्यामुळे शिक्षक भरतीवरचा विश्वासच उडाला आहे. स्पर्धा परीक्षेनंतर नोकरीची हमी असल्याने त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

- कल्पेश घवाळी, रत्नागिरी