शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike : विलीनीकरणाबाबत समितीच निर्णय घेणार, परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 17:28 IST

एसटी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने ४१ टक्के पगारवाढ दिलेली आहे. आजवर एसटीच्या इतिहासात कधीच न झालेला असा निर्णय घेतला आहे.

मंडणगड : एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाची मागणी न्यायालयासमाेर आहे. त्यावर महाराष्ट्र शासन निर्णय घेऊ शकत नाही, जो निर्णय घ्यायचा आहे, तो न्यायालयाने नेमलेली समितीच घेईल, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी मंडणगड येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

मंडणगड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री तथा पालकमंत्री अनिल परब मंगळवारी मंडणगड येथे आले हाेते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने ४१ टक्के पगारवाढ दिलेली आहे. आजवर एसटीच्या इतिहासात कधीच न झालेला असा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या विलीनीकरणाला १२ आठवड्यांचा कालावधी दिलेला आहे. पण न्यायालयाने २० तारीख दिली आहे, त्यामध्ये विलीनीकरणाचा मुद्दा होणार आहे, असे कर्मचाऱ्यांना भासवून काहीजणांकडून विलीनीकरणाचा मुद्दा भरकटवला जात आहे, असे अनिल परब म्हणाले. विलीनीकरण मुद्दा समितीच्या माध्यमातून सोडवण्यात येणार आहे. तोपर्यंत आपण कामावर या, असे आवाहन अनिल परब यांनी केले.

दापोली येथील रिसाॅर्ट बांधकामासंदर्भात परब म्हणाले की, किरीट सोमय्या अशा वारंवार तक्रारी जाणून बुजून करत आहेत. त्यांनी सगळा अभ्यास केलेला असूनही त्यांनी या रिसाॅर्टसंदर्भात ज्या तक्रारी केलेल्या आहेत, त्या रिसाॅर्टशी माझा कुठलाही संबंध नसल्याचे सरकारी यंत्रणेने स्पष्ट केले आहे. तरीही केवळ माझी बदनामी करण्यासाठी त्यांचा खटाटाेप सुरू आहे. त्यांना एकतर माझी माफी मागायला लागेल किंवा १०० कोटी द्यावे लागतील. मी मानहानीचा दावा केलेला आहे, असे परब यांनी सांगितले.

गाळ उपशाचा प्रश्न सुटला

चिपळूण येथील नदीतील गाळ उपशाचा प्रश्न बऱ्याचअंशी सुटलेला आहे. काही प्रश्न आहेत, त्यावर लवकरच तोडगा निघेल व चिपळूण बचाव समितीचे आंदाेलन लवकर संपेल, असे पालकमंत्री अनिल परब यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीST Strikeएसटी संपAnil Parabअनिल परब