शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

सप्टेंबरमध्ये मृतांच्या संख्येत भरमसाठ वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 14:27 IST

उशिराने होणारे निदान, तपासणी करण्याबाबतची उदासिनता आणि कोरोनाची भीती यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांप्रमाणेच मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २६१ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील १२६ जणांचा मृत्यू सप्टेंबर महिन्याच्या २९ दिवसात झाला आहे. आजवर झालेल्या मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील रूग्णांची संख्या सर्वाधिक असून, सर्वात कमी मृत्यू मंडणगड तालुक्यात झाले आहेत.

ठळक मुद्देसप्टेंबरमध्ये मृतांच्या संख्येत भरमसाठ वाढ कोरोना तपासणीबाबत लोकांची भीती कायम

मनोज मुळ्येरत्नागिरी : उशिराने होणारे निदान, तपासणी करण्याबाबतची उदासिनता आणि कोरोनाची भीती यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांप्रमाणेच मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २६१ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील १२६ जणांचा मृत्यू सप्टेंबर महिन्याच्या २९ दिवसात झाला आहे. आजवर झालेल्या मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील रूग्णांची संख्या सर्वाधिक असून, सर्वात कमी मृत्यू मंडणगड तालुक्यात झाले आहेत.कोरोनाचा प्रसार होऊ लागल्यानंतर पहिल्या चार महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात रूग्ण वाढत असले तरी मृतांची संख्या मर्यादीत होती. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑगस्टमध्ये गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांमुळे कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढले. या काळात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला. एकीकडे बाजारात गर्दी वाढली आणि दुसरीकडे घराघरात माणसांची संख्या वाढली. त्यामुळे गणेश चतुर्थीनंतरच्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच दररोज रुग्णसंख्येत मोठी भर पडत आहे.एप्रिल महिन्यात २, मे महिन्यात ७, जून महिन्यात १७ तर जुलैमध्ये ३३ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. जुलै महिनाअखेरीस जिल्ह्यातील मृतांची संख्या ५९ इतकी होती. ऑगस्ट महिन्यात ७६ जणांचा मृत्यू झाला आणि एकूण मृतांची संख्या १३५ पर्यंत गेली. सप्टेंबर महिन्यात तर त्या पुढचा कहर झाला आहे. २९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात आणखी १२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मृतांची संख्या २६१ इतकी झाली आहे.

भीतीमुळे अनेकजण आपला आजार लपवतात. लक्षणे असूनही तपासणी करून घेत नाहीत. त्यामुळे कोरोनाचे निदान होण्यात विलंब होता. त्यामुळे मृतांची संख्या वाढते. हे लक्षात घेऊनच राज्य सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान सुरू केले आहे. त्याला सर्व लोकांनी प्रतिसाद द्यावा आणि तपासणी करून घ्यावी.- डॉ. अशोक बोल्डे, जिल्हा शासकीय रुग्णालय

उशिरा दाखलकोरोनाच्या भीतीने रूग्ण उपचारासाठी उशिराने रूग्णालयात येतात, हे मृत्यूचे मुख्य कारण आहे. वेळेत उपचार न मिळाल्यामुळे न्युमोनिया वाढतो आणि त्यावर नियंत्रण आणता येत नाही. त्यामुळे मृतांची संख्या अधिक वाढते.तपासणीच नकोतापाची किंवा कोरोनाची लक्षणे असूनही तपासणी करण्यासाठी लोक पुढे येत नाहीत. तपासणी करून घेण्यात झालेल्या विलंबामुळेही उपचार मिळण्यात वेळ जातो. त्याने आजार बळावत जातो.घाबरल्यानेही..कोरोनाची भीती हेही मृत्यूचे एक कारण आहे. बरे होण्यासाठी रूग्णाची इच्छशक्ती प्रबळ हवी. ती नसेल तर उपचाराला प्रतिसाद मिळत नाही.नियम पाळासामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझेशन यासारखे नियम पाळायलाच हवेत. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यावरच अधिक भर द्यायला हवा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी