शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

वीज वाहिन्या की मृत्यूसापळा

By admin | Updated: August 1, 2014 23:20 IST

संगमेश्वर तालुका : महावितरणचा कारभार, ग्राहकांच्या जिवाचा होतोय खेळ

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्या धोकादायक बनल्या आहेत. गेल्या महिनाभरात तीनवेळा वीज वाहिनी तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. त्यामुळे रस्त्यावरुन चालणाऱ्यांना आपल्या डोक्यावरुन जाणारी महावितरणची वीज वाहिनी म्हणजे साक्षात मृत्यूचा सापळा भासत आहे.महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना सुविधा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. वीजबिल वसुली मात्र कायद्याचा बडगा दाखवून केली जात आहे. सध्या झालेल्या आॅनलाईन तक्रार सुविधेमुळे महावितरणचे काम सुलभ झाले असले तरी ग्रामीण भागातील ग्राहकांना मात्र या जाचक सुविधेमुळे आठ ते दहा दिवस अंधारात राहावे लागत आहे. तक्रारवही गायब झाल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली आहे. पावसाळी हंगाम असल्याने आणि वीज लाईनभोवती वाढलेल्या झाडीची साफसफाई न झाल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या तक्रारीतही वाढ झाली आहे. कडवई परिसरातही गेले काही दिवस वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या सततच्या वीज पुरवठा खंडित होण्याने अनेक ठिकाणी वीज उपकरणे निकामी होत आहेत.कडवई आणि पंचक्रोशीला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या अनेक वर्षांपूर्वीच्या असून, महावितरण कंपनीकडून त्या बदलणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी अशाच काही ठिकाणी वीज वाहिन्या तुटून अपघात घडले होते. चालू वीज वाहिनी पडून विनायक मयेकर यांच्या रिक्षेचे नुकसान झाले होते. या रिक्षाचालकालाही महावितरणने मदतीचा हात पुढे केला नाही. कडवई बाजारपेठ येथे तर या वाहिन्यांचे धोकादायक जाळे दिसून येते. या वाहिन्यांखालचे सुरक्षा गार्डही काही ठिकाणी गंजून लोंबकळत असताना दिसून येतात. गेल्या पंधरा दिवसात कडवईतील अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटून रस्त्यावर पडण्याचे प्रकार वाढले आहेत. महावितरणला माहिती मिळेपर्यंत या वाहिन्यांमधून प्रवाह चालू असतो. अशावेळी गंभीर अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. समर्थनगर येथे एकाच ठिकाणी वीज वाहिनी तुटून रस्त्यावर पडण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. अपघात होता होता एक रिक्षाचालक बालंबाल बचावला. महावितरण कंपनी सोयीसुविधांना प्राधान्य देणार का? महावितरण सर्वच गोष्टी ग्राहकांकडून खरेदी करुन घेत आहे. खराब झालेल्या वाहिन्याही ग्राहकांच्या पैशातून बदलल्या जात आहेत. मग वीजबिलात आकारले जाणारे विविध अधिभार आणि अनामत रक्कम कुणाच्या खिशात जातात, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. (वार्ताहर)