शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

वीज वाहिन्या की मृत्यूसापळा

By admin | Updated: August 1, 2014 23:20 IST

संगमेश्वर तालुका : महावितरणचा कारभार, ग्राहकांच्या जिवाचा होतोय खेळ

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्या धोकादायक बनल्या आहेत. गेल्या महिनाभरात तीनवेळा वीज वाहिनी तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. त्यामुळे रस्त्यावरुन चालणाऱ्यांना आपल्या डोक्यावरुन जाणारी महावितरणची वीज वाहिनी म्हणजे साक्षात मृत्यूचा सापळा भासत आहे.महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना सुविधा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. वीजबिल वसुली मात्र कायद्याचा बडगा दाखवून केली जात आहे. सध्या झालेल्या आॅनलाईन तक्रार सुविधेमुळे महावितरणचे काम सुलभ झाले असले तरी ग्रामीण भागातील ग्राहकांना मात्र या जाचक सुविधेमुळे आठ ते दहा दिवस अंधारात राहावे लागत आहे. तक्रारवही गायब झाल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली आहे. पावसाळी हंगाम असल्याने आणि वीज लाईनभोवती वाढलेल्या झाडीची साफसफाई न झाल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या तक्रारीतही वाढ झाली आहे. कडवई परिसरातही गेले काही दिवस वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या सततच्या वीज पुरवठा खंडित होण्याने अनेक ठिकाणी वीज उपकरणे निकामी होत आहेत.कडवई आणि पंचक्रोशीला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या अनेक वर्षांपूर्वीच्या असून, महावितरण कंपनीकडून त्या बदलणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी अशाच काही ठिकाणी वीज वाहिन्या तुटून अपघात घडले होते. चालू वीज वाहिनी पडून विनायक मयेकर यांच्या रिक्षेचे नुकसान झाले होते. या रिक्षाचालकालाही महावितरणने मदतीचा हात पुढे केला नाही. कडवई बाजारपेठ येथे तर या वाहिन्यांचे धोकादायक जाळे दिसून येते. या वाहिन्यांखालचे सुरक्षा गार्डही काही ठिकाणी गंजून लोंबकळत असताना दिसून येतात. गेल्या पंधरा दिवसात कडवईतील अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटून रस्त्यावर पडण्याचे प्रकार वाढले आहेत. महावितरणला माहिती मिळेपर्यंत या वाहिन्यांमधून प्रवाह चालू असतो. अशावेळी गंभीर अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. समर्थनगर येथे एकाच ठिकाणी वीज वाहिनी तुटून रस्त्यावर पडण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. अपघात होता होता एक रिक्षाचालक बालंबाल बचावला. महावितरण कंपनी सोयीसुविधांना प्राधान्य देणार का? महावितरण सर्वच गोष्टी ग्राहकांकडून खरेदी करुन घेत आहे. खराब झालेल्या वाहिन्याही ग्राहकांच्या पैशातून बदलल्या जात आहेत. मग वीजबिलात आकारले जाणारे विविध अधिभार आणि अनामत रक्कम कुणाच्या खिशात जातात, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. (वार्ताहर)