शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सहकाऱ्याच्या गोळीने शिकारीच झाला शिकार?, धमकीमुळे सारे गप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 18:06 IST

मात्र जंगलात शिकारीसाठी गेले असताना त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. आता पत्रकारांनीच हे प्रकरण उघड करुन सहकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा मुद्दा पुढे आणला आहे.

दापोली : आपल्या मित्रांसमवेत जंगलामध्ये शिकारीला गेलेल्या दापोली तालुक्यातील नानटे कांबळेवाडी येथील दत्ताराम खळे (६९) यांचा आपल्या सहकाऱ्यांच्या बंदुकीतील गोळी लागून दुर्दैवी अंत झाला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. चार महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला होता. मात्र जंगलात शिकारीसाठी गेले असताना त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. आता पत्रकारांनीच हे प्रकरण उघड करुन सहकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा मुद्दा पुढे आणला आहे.

पत्रकारांच्या सतर्कतेमुळे तब्बल चार महिन्यांनी हा प्रकार जगापुढे आला आहे. दापोली तालुक्यातील नानटे कांबळेवाडी येथील येथे दत्ताराम खळे यांचे घर आहे. पत्नीच्या निधनानंतर ते गावात एकटेच राहत होते. त्यांच्या दोन मुली विवाहित असून, मुलगा मुंबई येथे नोकरी करतो. ते आपल्या काही मित्रांसमवेत अधेमधे शिकारीला जात असत.

४ डिसेंबर २०२१ रोजीही ते मित्रांसोबत शिकारीसाठी गेले होते. त्या वेळी दुसऱ्या व्यक्तीच्या हातातील बंदुकीची गोळी त्यांच्या शरीरातून आरपार गेली. यामुळे जंगलातच जागच्या जागी मृत्यू ओढवला. या प्रकारामुळे घाबरलेल्या त्यांच्या मित्रांनी हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले. संपूर्ण शरीराला कापड गुंडाळून त्यांचा मृतदेह रात्री गावांमध्ये आणण्यात आला.

खळे यांची मुले सकाळी गावात येऊन हजर होतात घाईघाईत अंत्यसंस्कार उरकून घेण्यात आले. खळे यांच्या मुलांना त्यांच्या वडिलांना अंतिम अंघोळदेखील घालायला दिली नाही. यामुळे या मुलांना आपल्या वडिलांचा खून झाल्याचा संशय आला. मात्र ही मुले वडिलांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरली नसल्याने त्यांनी याबाबत कुठेही वाच्यता केली नाही.

धमकीमुळे सारे गप्प

काही दिवसांनी गावांमध्ये या घटनेची चर्चा होऊ लागली. मात्र याबाबत धमकी देण्यात आल्याने हे प्रकरण पोलीस स्थानकापर्यंत गेले नसल्याची चर्चा आहे. हा प्रकार कळल्यानंतर दापोलीतील पत्रकारांनी घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा केले. गावातील अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून ही बाब पुढे आली आहे. आता या प्रकरणात पोलीस काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी