शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
2
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
3
दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
4
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
5
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
6
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
7
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
8
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
9
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
10
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
11
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
12
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
13
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
14
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
15
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
16
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
18
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
19
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
20
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

दापोली : आगारवायंगणीत महिलांनी बांधला मिशन बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 12:29 IST

ग्रामस्थ व प्रशासनाने हातात हात घालून काम केले तर कोणतेही काम होऊ शकते हे दापोली तालुक्यातील आगारवायंगणी गावातील महिलांनी दाखवून दिले आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अंतर्गत ‘मिशन बंधारे २०१९’ मोहिमेत आजपर्यंत लोकसहभागातून

ठळक मुद्देपाणी अडवा, पाणी जिरवा : मुख्याधिकारी आंचल गोयल यांचे हात राबले महिलांसोबत ‘मिशन बंधारे’त  पंचायत समितीच्या महिला कर्मचारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हातात हात घालून श्रमदानातून याठिकाणी बंधारा घालून मिशन बंधारे मोहिमेत महिला कुठेही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.

दापोली : ग्रामस्थ व प्रशासनाने हातात हात घालून काम केले तर कोणतेही काम होऊ शकते हे दापोली तालुक्यातील आगारवायंगणी गावातील महिलांनी दाखवून दिले आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अंतर्गत ‘मिशन बंधारे २०१९’ मोहिमेत आजपर्यंत लोकसहभागातून बंधारे बांधल्याचे आपण पाहिले आहे. परंतु, आगारवायंगणी गावातील महिला मंडळ, दापोली पंचायत समितीच्या महिला कर्मचारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हातात हात घालून श्रमदानातून याठिकाणी बंधारा घालून मिशन बंधारे मोहिमेत महिला कुठेही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.

आगारवायंगणी गावातील महिला मिशन बंधारे मोहिमेत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, सहाय्यक गटविकास अधिकारी बागुल, विस्तार अधिकारी रोहिणी जाधव सहभागी झाल्या होत्या. दापोली पंचायत समितीतील महिला कर्मचारी व आगारवायंगणी गावातील महिलांनी श्रमदानातून यावेळी नदीवर बंधारा बांधला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी  गोयल यांनी महिलांसमवेत श्रमदान केले. रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला बंधारा महिलांनी स्वतंत्रपणे बांधला. यावेळी हातात टोपले, दगड घेऊन महिला कर्मचाºयांनी श्रमदान केले. विशेष म्हणजे हा संपूर्ण साखळी बंधारा महिलांनी बांधून महिला या क्षेत्रातसुद्धा कमी नसल्याचे दाखवून दिले.

मिशन बंधारे मोहिमेत दापोलीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रशांत राऊत, जिल्हा परिषद सदस्य अनंत करंबेळे, विस्तार अधिकारी दिलीप रुके, सरपंच किसन भाताडे, उपसरपंच कोळंबे, तंटामुक्त अध्यक्ष अशोक शिगवण, ग्रामीण अध्यक्ष नितीन शिगवण, ग्रामसेविका एस. व्ही. साळुंके, ग्रामपंचायत सदस्य रोशनी भाताडे, उषा जाधव, चंद्रकला शिगवण, विद्या शिगवण, तानाजी शिगवण, किरण शिगवण, निवास जाधव, अनिल जाधव सहभागी झाले होते.

गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आगारवायंगणी ग्रामस्थांनी २५ वर्षांपूर्वी गावात मिशन बंधारे मोहीम हाती घेतली होती. येथील ग्रामस्थ गेली २५ वर्षे मिशन बंधारे मोहीम राबवत आहेत. मिशन बंधारे मोहिमेमुळे ग्रामस्थांनी पाणीटंचाईवर मात करण्यात यश मिळवले आहे. दरवर्षी ग्रामस्थ लोकसहभागातून गावात ३५ ते ४० बंधारे बांधतात. या बंधारे मोहिमेमुळे गावातील पाणीस्रोतांच्या पातळीत वाढ झाल्यामुळे मे अखेरपर्यंत शेतकºयांच्या बागायतींना मुबलक पाणी उपलब्ध होते.

 

आगारवायंगणी गावात पंयायत समितीतील महिला कर्मचारी व गावातील महिला बचत गटांच्या माध्यमातून बंधारा बांधण्यात आला आहे. महिलांनी श्रमदान करुन समाधानकारक काम केले आहे. कोकणात सर्वाधिक पाऊस पडत असला, तरीही पडणारे पाणी जमिनीत न मुरल्यामुळे पाणी टंचाईसारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. परंतु, आगारवायंगणी गावाने श्रमदानातून बांधलेले बंधारे कौतुकाला पात्र आहेत. या गावात मिशन बंधारेच्या माध्यमातून अडविण्यात आलेले पाणी लोकांना खूप फायद्याचे आहे. गावाने लोकसहभागातून उत्स्फूर्तपणे राबविलेली मिशन बंधारे मोहीम कौतुकाला पात्र आहे.

- आंचल गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRatnagiriरत्नागिरी