शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
4
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
5
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
6
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
7
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
8
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
11
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
12
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
13
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
14
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
15
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
16
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
17
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
18
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
19
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
20
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध

दापोली : आगारवायंगणीत महिलांनी बांधला मिशन बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 12:29 IST

ग्रामस्थ व प्रशासनाने हातात हात घालून काम केले तर कोणतेही काम होऊ शकते हे दापोली तालुक्यातील आगारवायंगणी गावातील महिलांनी दाखवून दिले आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अंतर्गत ‘मिशन बंधारे २०१९’ मोहिमेत आजपर्यंत लोकसहभागातून

ठळक मुद्देपाणी अडवा, पाणी जिरवा : मुख्याधिकारी आंचल गोयल यांचे हात राबले महिलांसोबत ‘मिशन बंधारे’त  पंचायत समितीच्या महिला कर्मचारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हातात हात घालून श्रमदानातून याठिकाणी बंधारा घालून मिशन बंधारे मोहिमेत महिला कुठेही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.

दापोली : ग्रामस्थ व प्रशासनाने हातात हात घालून काम केले तर कोणतेही काम होऊ शकते हे दापोली तालुक्यातील आगारवायंगणी गावातील महिलांनी दाखवून दिले आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अंतर्गत ‘मिशन बंधारे २०१९’ मोहिमेत आजपर्यंत लोकसहभागातून बंधारे बांधल्याचे आपण पाहिले आहे. परंतु, आगारवायंगणी गावातील महिला मंडळ, दापोली पंचायत समितीच्या महिला कर्मचारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हातात हात घालून श्रमदानातून याठिकाणी बंधारा घालून मिशन बंधारे मोहिमेत महिला कुठेही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.

आगारवायंगणी गावातील महिला मिशन बंधारे मोहिमेत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, सहाय्यक गटविकास अधिकारी बागुल, विस्तार अधिकारी रोहिणी जाधव सहभागी झाल्या होत्या. दापोली पंचायत समितीतील महिला कर्मचारी व आगारवायंगणी गावातील महिलांनी श्रमदानातून यावेळी नदीवर बंधारा बांधला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी  गोयल यांनी महिलांसमवेत श्रमदान केले. रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला बंधारा महिलांनी स्वतंत्रपणे बांधला. यावेळी हातात टोपले, दगड घेऊन महिला कर्मचाºयांनी श्रमदान केले. विशेष म्हणजे हा संपूर्ण साखळी बंधारा महिलांनी बांधून महिला या क्षेत्रातसुद्धा कमी नसल्याचे दाखवून दिले.

मिशन बंधारे मोहिमेत दापोलीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रशांत राऊत, जिल्हा परिषद सदस्य अनंत करंबेळे, विस्तार अधिकारी दिलीप रुके, सरपंच किसन भाताडे, उपसरपंच कोळंबे, तंटामुक्त अध्यक्ष अशोक शिगवण, ग्रामीण अध्यक्ष नितीन शिगवण, ग्रामसेविका एस. व्ही. साळुंके, ग्रामपंचायत सदस्य रोशनी भाताडे, उषा जाधव, चंद्रकला शिगवण, विद्या शिगवण, तानाजी शिगवण, किरण शिगवण, निवास जाधव, अनिल जाधव सहभागी झाले होते.

गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आगारवायंगणी ग्रामस्थांनी २५ वर्षांपूर्वी गावात मिशन बंधारे मोहीम हाती घेतली होती. येथील ग्रामस्थ गेली २५ वर्षे मिशन बंधारे मोहीम राबवत आहेत. मिशन बंधारे मोहिमेमुळे ग्रामस्थांनी पाणीटंचाईवर मात करण्यात यश मिळवले आहे. दरवर्षी ग्रामस्थ लोकसहभागातून गावात ३५ ते ४० बंधारे बांधतात. या बंधारे मोहिमेमुळे गावातील पाणीस्रोतांच्या पातळीत वाढ झाल्यामुळे मे अखेरपर्यंत शेतकºयांच्या बागायतींना मुबलक पाणी उपलब्ध होते.

 

आगारवायंगणी गावात पंयायत समितीतील महिला कर्मचारी व गावातील महिला बचत गटांच्या माध्यमातून बंधारा बांधण्यात आला आहे. महिलांनी श्रमदान करुन समाधानकारक काम केले आहे. कोकणात सर्वाधिक पाऊस पडत असला, तरीही पडणारे पाणी जमिनीत न मुरल्यामुळे पाणी टंचाईसारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. परंतु, आगारवायंगणी गावाने श्रमदानातून बांधलेले बंधारे कौतुकाला पात्र आहेत. या गावात मिशन बंधारेच्या माध्यमातून अडविण्यात आलेले पाणी लोकांना खूप फायद्याचे आहे. गावाने लोकसहभागातून उत्स्फूर्तपणे राबविलेली मिशन बंधारे मोहीम कौतुकाला पात्र आहे.

- आंचल गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRatnagiriरत्नागिरी