शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

परशुराम घाटातील ७१ कुटुंबांना धोका, पेढे गावातील कुटुंबांवर स्थलांतराची टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 18:40 IST

घाटात दरड कोसळल्याने ऐन पावसाळ्यात १० कुटुंबांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या पेढे परशुराम येथील घाटात सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे तब्बल ७१ कुटुंबांना दरडीचा धोका निर्माण झाला आहे. त्यापैकी ४८ जणांना महसूल विभागाकडून तात्पुरत्या स्थलांतराच्या नोटीस बजावल्या होत्या. मात्र, शनिवारी रात्री या घाटात दरड कोसळल्याने ऐन पावसाळ्यात १० कुटुंबांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. काहीजण नातेवाईकांच्या घरी, तर काहीजण भाड्याच्या खोलीत राहत आहेत.

परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. डोंगराच्या कटाईचे काम अजूनही बाजूने काही ठिकाणी सुरू आहे. मात्र, या डोंगर कटाईमुळे घाटमाथ्यावर व पायथ्यालगत असलेल्या वस्तीला मोठा धोका निर्माण झाला आहे. या घाटातील सुमारे ४०० मीटर लांबीचा दरडग्रस्त भाग अतिशय धोकादायक बनला असून, या कामामुळे पेढे परशुरामवासीय भीतीच्या छायेत आहेत. महिनाभरापूर्वी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्यातर्फे पेढे परशुराम येथील ४८ दगडग्रस्त कुटुंबांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यापाठोपाठ पेढे व परशुराम या दोन्ही ग्रामपंचायतीत आढावा बैठकही घेतली होती.

महिनाभरापूर्वी ठेकेदार कंपनीला तत्काळ डोंगराच्या बाजूने संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्याची सूचना केली होती. त्यानंतर बेंचिंग पद्धतीने डोंगर कटाईचे काम सुरू होते परंतु आता पावसाने जोर घेतल्यामुळे कामाची गती खूपच मंदावली आहे. त्यातच शनिवारी रात्री घाटाच्या मध्यवर्ती ठिकाणी दरड कोसळली. मात्र, घटनेमुळे घाट माथ्यावर व पायथ्याशी असलेल्या वस्तीतील १० कुटुंबांना रात्रीच स्थलांतरित केले. या घटनेमुळे तब्बल ४८ कुटुंबांना स्थलांतर करावे लागणार आहे. त्याबाबत प्रशासनाकडून दोन्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू केली आहे. या गावचे तलाठी भारत जाधवर यांनी सांगितले की, तीन-चार कुटुंबांची रात्रीच्यावेळी शाळेत व्यवस्था केली असून, उर्वरित कुटुंब त्यांच्या नातेवाईकांकडे राहत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी