शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
3
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
4
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
5
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
6
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारने तिजोरी उघडली
7
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
8
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
9
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
10
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
11
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
12
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
13
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
14
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
15
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
16
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
17
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
18
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
19
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
20
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...

धरण झाले तरीही पाण्याचा दाह

By admin | Updated: May 18, 2016 00:07 IST

राजापूर तालुका : पूर्व परिसरातील मध्यम प्रकल्पावर १० वर्षांत ५०० कोटींचा खर्च

राजापूर : धरण बांधून पूर्ण झाले. पण, त्यातून काढावयाच्या कालव्यांच्या कामाला गती नाही. त्यामुळे पावसाळी दिवसात तुडुंब धरण भरूनही त्यातील पाण्याचा एक टिपूसदेखील तालुक्याच्या पूर्व परिसरवासीयांना मिळालेला नाही, हेच आजचे विदारक चित्र आहे. साधारणपणे नद्यांना येणारे मोठमोठे महापूर रोखणे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे, अन्नधान्याच्या निर्मितीसह करावयाची वीजनिर्मिती हा धरणे बांधण्याबाबतचा मूळ उद्देश असला तरी कोकणात मात्र प्रामुख्याने पिण्याच्या पाण्यासह भातशेतीसाठी पाणी हाच मुख्य उद्देश आहे. पण, तोसुध्दा साध्य झालेला नाही. तालुक्यातील सर्वांत मोठा धरण प्रकल्प असणाऱ्या अर्जुनाचे हे चित्र कशाचे द्योतक मानायचे ? सध्या तर हे धरण केवळ पर्यटनस्थळ म्हणून राहिले आहे. राजापूर तालुक्याच्या पूर्व परिसरात करक व पांगरी या गावात शासनाच्या लघु पाटबंधारे विभागाने दहा वर्षांपूर्वी मध्यम प्रकल्प उभारायला सुरूवात केली होती. सुरुवातीच्या काळात ४१ कोटी एवढी अंदाजित खर्चाची रक्कम असलेल्या या प्रकल्पाची मागील १० वर्षाच्या खर्चाची आकडेवारी ५०० कोटीपेक्षा जास्त आहे. या प्रकल्पामुळे करक गाव अंशत: तर पांगरी गाव पूर्णत: बाधित झाले आहे. मागील १० वर्षांच्या काळात हे धरण बांधून पूर्ण झाले आहे. एकूण चार ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या वसाहती उभारण्यात आल्या आहेत. पण, त्या वसाहतींचीही दुरवस्था बनली आहे. मागील पाच वर्षांपासून धरणात पाणीसाठा होऊ लागला आहे. या प्रकल्पात ७४.६० दशलक्ष घनमीटर म्हणजे २.६४ टीएमसी एवढा पाणीसाठा होणार असून, त्यामुळे २३०३ हेक्टर अतिरिक्त पीक क्षेत्र निर्माण होणार आहे. या प्रकल्पावर २०.७५० मेगावॅट ऊर्जा निर्माण करण्याचे शासनाचे धोरण आहे. तालुक्याच्या पूर्व परिसरात दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो. त्यामध्ये पहिल्या दोन महिन्यातच हे धरण तुडुंब भरते. पण, नंतरच्या काळात आतील पाण्याचा दाब वाढून धरणावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून यासाठी त्या पाण्याचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने आतील पाणी लगतच्या नदीवाटे सोडून दिले जाते. मात्र, त्यानंतर धरणात पुन्हा पाणी साठवायला सुरुवात केली जाते. साधारण शेवटच्या टप्प्यात धरणात पुन्हा पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवायला सुरुवात होते. उन्हाळी दिवसात ठराविक टप्प्याने पुन्हा पाणी सोडले जाते, असा प्रकार मागील काही वर्षांपासून सुरू असून, अद्याप कालव्यांची कामे मार्गी न लागल्यामुळे अशी वेळ आली आहे, हे सत्य बाहेर आले आहे.या धरणातून उजवीकडे ५७ किलोमीटरचा, तर डावीकडे ६०.९३ किलोमीटरचा कालवा काढला जात असून, त्यांची सुरु असलेली कामे समाधानकारक नाहीत, हेच सत्य आहे. मागील अनेक वर्षे अर्जुनाच्या कालव्यांची कामे मार्गी लावण्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदारांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच कालव्यांची कामे मार्गी लागलेली नाहीत. काही ठेकेदार तर गेल्या काही महिन्यांपासून आपल्या कामाकडे फिरकलेही नव्हते. काहींची कामे सुरु होती, पण ती समाधानकारक नव्हती. त्यातून काही ठिकाणी तर कालव्यांची कामे सुरु असताना झालेल्या खोदाईदरम्यान भूसुरूंगाच्या स्फोटात आजुबाजुच्या घरादारांवर मोठमोठे दगड पडून अनेक घरांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या होत्या. पण, शासनाकडून त्याची साधी दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी आणखी नुकसान होऊ नये, यासाठी कालव्यांच्या खोदकामाचे काम बंद पाडले होते, अशा विविध कारणांनी अर्जुनाच्या दोन्ही कालव्यांची अपूर्ण राहिलेली कामे काही ठिकाणी चालू होती. मात्र, नवीन आर्थिक वर्षात शासनाकडून वेळेवर निधी मिळेल का? याबाबत ठेकेदारांच्या मनात कायम शंका राहिली आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांना फायदा नाहीच : अर्जुनाच्या पुनरूज्जीवनाची मोहीमआता शासनाकडून अर्जुना नदीच्या पुनरुज्जीवनाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याचा येथील जनतेला निश्चित फायदा होणारा आहे, याचाही विचार होणे आवश्यक आहे. आजघडीला हा प्रकल्प पर्यटकांसाठी आकर्षण ठरला आहे. अर्जुना प्रकल्प शेतकऱ्यांसाठी अजून तरी फायदेशीर ठरलेला नाही.