शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

वादळामुळे रामपूरमध्ये नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST

भराव हटविल्याने धोका टळला चिपळूण : पावसाळा तोंडावर असतांना बहाद्दूरशेख येथील वाशिष्ठी पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे ...

भराव हटविल्याने धोका टळला

चिपळूण : पावसाळा तोंडावर असतांना बहाद्दूरशेख येथील वाशिष्ठी पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे सर्व गर्डर चढवून झाल्याने नदीतील भराव काढण्यात आला आहे. नदीचे पाणी तेथून प्रवाहित होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात होणारा धोका टळला असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नदीतील भराव पावसाळ्यापूर्वी काढावा, अशी मागणी पर्यावरण प्रेमी शौकत मुकादम यांनी केली होती. आता हा भराव काढण्यात आला आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

रस्त्याचे डांबरीकरण करा

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील ४४ किलोमीटर लांबीचा रस्ता चौपदरीकरणाचे काम २०२१ मध्ये पूर्ण होईल, अशी ग्वाही कल्याण टोल कंपनीच्या ठेकेदाराने दिली होती. पण, ही ग्वाही म्हणजे निव्वळ धूळफेक होय. याच मार्गावर भोस्ते घाट व गणपती कृपा हॉटेलसमोर पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. हा रस्ता म्हणजे अपघाताला आमंत्रण देणारा ठरणार आहे. पाऊस तोंडावर आलेला आहे. म्हणून पर्यायी रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी युवा सेनेचे कौशल चिखले यांनी केली आहे.

घारीला जीवनदान

दापोली : येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे हे खेडमधून दापोलीकडे येत असताना रस्त्यामध्ये जखमी अवस्थेत त्यांना घार दिसून आली. त्या घारीला त्यांनी दापोलीत आणून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून घेतली. वेळीच या घारीला औषधोपचार मिळाल्यामुळे तिचा जीव वाचला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांचे कौतुक होत आहे.

रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

दापोली : येथील अनुबंध या संस्थेतर्फे खानबहादूर मेमोरियल हॉस्पिटलला कोरोना काळात गरीब रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आला. तसेच हे यंत्र कसे चालवायचे, याचे प्रात्यक्षिकदेखील दाखविण्यात आले. यावेळी डॉ. अनिरूध्द डोंगरे, वरूण वालावलकर, ओंकार कर्वे, डॉ. मुनिर सरगुरोह आदी उपस्थित होते.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

चिपळूण : रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २९ गावे असून, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. आतापर्यंत ३५० रुग्ण बरे झाले असून, सध्या ६४ बाधित रुग्ण आहेत. २५०० नागरिकांनी लस घेतली आहे, अशी माहिती डॉ. निकिता शिर्के यांनी दिली. काेराेनातून रुग्ण बरे हाेत असल्याने ग्रामस्थांनाही दिलासा मिळाला आहे़

चिपळूण - मुंबई बस सेवा सुरू

चिपळूण : राज्य शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊनच्या काळात येथील आगारातील काही मोजक्याच फेऱ्या सुरु होत्या. हळूहळू ग्रामीण भागातील फेऱ्या वाढविण्यात येत असून, आज सोमवारी सकाळी १० वाजता चिपळूण - मुंबई ही एस. टी.ची पहिली बस सोडण्यात आली. काही दिवसातच पुणेसाठीही बस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांनी दिली.

रुग्णांना साहित्य वाटप

खेड : येथील स्टेट बँकेचे शाखाधिकारी नीलेश तांबे यांनी शहरातील दोन कोविड सेंटरमधील ११० रुग्णांना पाणी बॉटल्स, फ्रुटी व बिस्कीट किटचे वाटप केले. शाखाधिकारी तांबे यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाबाधित रुग्णांना मदतीचा हात दिला होता. दुसऱ्या लाटेतही नगर परिषदेच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या ३५ रुग्णांना, तर शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या कोविड सेंटरमधील ६५ रुग्णांना किटचे वाटप केले.

टँकरने पाणीपुरवठा

खेड : तालुक्यात तौक्ते चक्रीवादळानंतर सलग चार दिवस झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे टंचाईग्रस्त गाव - वाड्यांची संख्या स्थिरावलेली असतानाच ऐनवली - बंगालवाडीत पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. याठिकाणी शनिवारपासून टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. सद्यस्थितीत १९ गावे ३५ वाड्यांना एक शासकीय व ४ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.