शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

खेडमधील पिंपळवाडी धरणाचा बांध ढासळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 18:05 IST

Flood Khed Ratnagiri: खेड तालुक्यातील मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या पिंपळवाडी धरणाचा बांध अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात ढासळला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यासमोर असलेल्या नदी किनाऱ्यावरील सुमारे शंभरहून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देखेडमधील पिंपळवाडी धरणाचा बांध ढासळलाशंभरहून अधिक ग्रामस्थ स्थलांतरित

खेड : तालुक्यातील मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या पिंपळवाडी धरणाचा बांध अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात ढासळला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यासमोर असलेल्या नदी किनाऱ्यावरील सुमारे शंभरहून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

धरणाच्या सांडव्याच्या संरक्षक भिंतीचे काम करणारा ठेकेदार या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप होत असून, या प्रकरणी सरकारने तातडीने चौकशी करण्याची मागणी होत आहे.तालुक्यातील पिंपळवाडी धरणाला गुरुवारी (२२ रोजी) रात्रीच्या सुमारास मोठा धोका निर्माण झाला होता. धरणाच्या सांडव्याच्या संरक्षक भिंतीचे सुरू असलेले बांधकाम या कामाचा ठेका असलेल्या कंपनीने अर्धवट केल्याने धरणाच्या दरवाज्यातून विसर्ग होत असलेले पाणी या संरक्षक भिंतीवरून थेट धरणाच्या मुख्य बंधाऱ्यावरून वाहू लागले.

या पाण्याच्या प्रवाह एवढा मोठा होता की, काही क्षणात धरणाच्या भिंतीचा तब्बल पंचवीस टक्के भाग ढासळून तेथील माती वाहून गेली. गेल्याच वर्षी २ कोटी रुपये खर्च करून सांडव्याच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले होते.अतिवृष्टीच्या काळात पिंपळवाडी धरणाला धोका निर्माण झाल्याचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी जाहीर करत धरणाच्या लाभ क्षेत्रातील नदी किनारच्या सुमारे सात गावातील शेकडो ग्रामस्थांना स्थलांतरित केले.जलसंपदा विभागाचे सहकार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगल यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, धरणाच्या सांडव्याच्या संरक्षक मार्गदर्शक भिंतीचे काम ठेकेदाराकडून ५० टक्केच झाले आहे. त्यातच गुरुवारी रात्री ढगफुटी झाल्याप्रमाणे सुमारे ४०० मिलिमीटर पाऊस पडला.

धरण शंभर टक्के भरले व पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. धरणातून सांडव्यामार्गे पाण्याचा विसर्ग होत असताना सांडव्याला मार्गदर्शक संरक्षक भिंत नसल्याने दिशा बदलली व धरणाच्या मुख्य बंधाऱ्यावरून पाण्याचा मोठा जलप्रपात कोसळून धरणाच्या भिंतीचे कोट्यवधीचे नुकसान झाले.

यावेळी पाण्याचा प्रवाह थेट लोकवस्तीच्या दिशेने होऊ लागल्याने त्या रात्री नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ आली. पाण्याच्या प्रचंड वेगाने खोपी बौद्धवाडी व सुतारवाडी यांच्यामधील पूलही वाहून गेला आहे, असे गोविंद श्रीमंगल यांनी सांगितले.

टॅग्स :floodपूरKhedखेडRatnagiriरत्नागिरी