शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

खेडमधील पिंपळवाडी धरणाचा बांध ढासळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 18:05 IST

Flood Khed Ratnagiri: खेड तालुक्यातील मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या पिंपळवाडी धरणाचा बांध अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात ढासळला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यासमोर असलेल्या नदी किनाऱ्यावरील सुमारे शंभरहून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देखेडमधील पिंपळवाडी धरणाचा बांध ढासळलाशंभरहून अधिक ग्रामस्थ स्थलांतरित

खेड : तालुक्यातील मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या पिंपळवाडी धरणाचा बांध अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात ढासळला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यासमोर असलेल्या नदी किनाऱ्यावरील सुमारे शंभरहून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

धरणाच्या सांडव्याच्या संरक्षक भिंतीचे काम करणारा ठेकेदार या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप होत असून, या प्रकरणी सरकारने तातडीने चौकशी करण्याची मागणी होत आहे.तालुक्यातील पिंपळवाडी धरणाला गुरुवारी (२२ रोजी) रात्रीच्या सुमारास मोठा धोका निर्माण झाला होता. धरणाच्या सांडव्याच्या संरक्षक भिंतीचे सुरू असलेले बांधकाम या कामाचा ठेका असलेल्या कंपनीने अर्धवट केल्याने धरणाच्या दरवाज्यातून विसर्ग होत असलेले पाणी या संरक्षक भिंतीवरून थेट धरणाच्या मुख्य बंधाऱ्यावरून वाहू लागले.

या पाण्याच्या प्रवाह एवढा मोठा होता की, काही क्षणात धरणाच्या भिंतीचा तब्बल पंचवीस टक्के भाग ढासळून तेथील माती वाहून गेली. गेल्याच वर्षी २ कोटी रुपये खर्च करून सांडव्याच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले होते.अतिवृष्टीच्या काळात पिंपळवाडी धरणाला धोका निर्माण झाल्याचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी जाहीर करत धरणाच्या लाभ क्षेत्रातील नदी किनारच्या सुमारे सात गावातील शेकडो ग्रामस्थांना स्थलांतरित केले.जलसंपदा विभागाचे सहकार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगल यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, धरणाच्या सांडव्याच्या संरक्षक मार्गदर्शक भिंतीचे काम ठेकेदाराकडून ५० टक्केच झाले आहे. त्यातच गुरुवारी रात्री ढगफुटी झाल्याप्रमाणे सुमारे ४०० मिलिमीटर पाऊस पडला.

धरण शंभर टक्के भरले व पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. धरणातून सांडव्यामार्गे पाण्याचा विसर्ग होत असताना सांडव्याला मार्गदर्शक संरक्षक भिंत नसल्याने दिशा बदलली व धरणाच्या मुख्य बंधाऱ्यावरून पाण्याचा मोठा जलप्रपात कोसळून धरणाच्या भिंतीचे कोट्यवधीचे नुकसान झाले.

यावेळी पाण्याचा प्रवाह थेट लोकवस्तीच्या दिशेने होऊ लागल्याने त्या रात्री नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ आली. पाण्याच्या प्रचंड वेगाने खोपी बौद्धवाडी व सुतारवाडी यांच्यामधील पूलही वाहून गेला आहे, असे गोविंद श्रीमंगल यांनी सांगितले.

टॅग्स :floodपूरKhedखेडRatnagiriरत्नागिरी