शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

खेडमधील पिंपळवाडी धरणाचा बांध ढासळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 18:05 IST

Flood Khed Ratnagiri: खेड तालुक्यातील मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या पिंपळवाडी धरणाचा बांध अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात ढासळला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यासमोर असलेल्या नदी किनाऱ्यावरील सुमारे शंभरहून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देखेडमधील पिंपळवाडी धरणाचा बांध ढासळलाशंभरहून अधिक ग्रामस्थ स्थलांतरित

खेड : तालुक्यातील मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या पिंपळवाडी धरणाचा बांध अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात ढासळला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यासमोर असलेल्या नदी किनाऱ्यावरील सुमारे शंभरहून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

धरणाच्या सांडव्याच्या संरक्षक भिंतीचे काम करणारा ठेकेदार या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप होत असून, या प्रकरणी सरकारने तातडीने चौकशी करण्याची मागणी होत आहे.तालुक्यातील पिंपळवाडी धरणाला गुरुवारी (२२ रोजी) रात्रीच्या सुमारास मोठा धोका निर्माण झाला होता. धरणाच्या सांडव्याच्या संरक्षक भिंतीचे सुरू असलेले बांधकाम या कामाचा ठेका असलेल्या कंपनीने अर्धवट केल्याने धरणाच्या दरवाज्यातून विसर्ग होत असलेले पाणी या संरक्षक भिंतीवरून थेट धरणाच्या मुख्य बंधाऱ्यावरून वाहू लागले.

या पाण्याच्या प्रवाह एवढा मोठा होता की, काही क्षणात धरणाच्या भिंतीचा तब्बल पंचवीस टक्के भाग ढासळून तेथील माती वाहून गेली. गेल्याच वर्षी २ कोटी रुपये खर्च करून सांडव्याच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले होते.अतिवृष्टीच्या काळात पिंपळवाडी धरणाला धोका निर्माण झाल्याचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी जाहीर करत धरणाच्या लाभ क्षेत्रातील नदी किनारच्या सुमारे सात गावातील शेकडो ग्रामस्थांना स्थलांतरित केले.जलसंपदा विभागाचे सहकार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगल यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, धरणाच्या सांडव्याच्या संरक्षक मार्गदर्शक भिंतीचे काम ठेकेदाराकडून ५० टक्केच झाले आहे. त्यातच गुरुवारी रात्री ढगफुटी झाल्याप्रमाणे सुमारे ४०० मिलिमीटर पाऊस पडला.

धरण शंभर टक्के भरले व पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. धरणातून सांडव्यामार्गे पाण्याचा विसर्ग होत असताना सांडव्याला मार्गदर्शक संरक्षक भिंत नसल्याने दिशा बदलली व धरणाच्या मुख्य बंधाऱ्यावरून पाण्याचा मोठा जलप्रपात कोसळून धरणाच्या भिंतीचे कोट्यवधीचे नुकसान झाले.

यावेळी पाण्याचा प्रवाह थेट लोकवस्तीच्या दिशेने होऊ लागल्याने त्या रात्री नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ आली. पाण्याच्या प्रचंड वेगाने खोपी बौद्धवाडी व सुतारवाडी यांच्यामधील पूलही वाहून गेला आहे, असे गोविंद श्रीमंगल यांनी सांगितले.

टॅग्स :floodपूरKhedखेडRatnagiriरत्नागिरी