शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रत्नागिरीत रमजान ईद पर्यंत शहराला दररोज पाणी पुरवठा

By मेहरून नाकाडे | Updated: April 19, 2023 17:28 IST

संभाव्य पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसू नये, यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा

रत्नागिरी : मुस्लिम भाविकांच्या पवित्र रमजान मासची लवकरच सांगता होणार असून रमजान ईद शनिवार दि.२२ रोजी साजरी होणार आहे. रमजान ईद निमित्त शहरातील पाणीपुरवठा ईदपर्यंत दररोज करण्याच्या सूचना मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिल्या आहेत. यामुळे मुस्लिम बांधवांतूनच नाही तर शहरवासियांमध्ये समाधान व्यक्त हाेत आहे.भारतीय हवामान विभागाने दक्षिण पॅसिफिक महासागरातील ‘अल् निनो’ या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहराला केवळ शीळ या एकमेव धरणातून पाणीपुरवठा सुरू आहे. बाष्पीभवनामुळे शीळ धरणातील पाणीसाठा प्रचंड वेगाने कमी होत आहे. सद्य:स्थितीत धरणात केवळ दि. ६ जूनपर्यंत पुरेल इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

शहरात साडे दहा हजार नळजोडण्या असून शहरासाठी दररोज १८ ते १९ दक्षलक्षधनमीटर पाणी पुरवठा होतो. मात्र ‘अल् निनो’च्या प्रभावामुळे संभाव्य पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसू नये, यासाठी रविवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.मुस्लिम भाविकांचा रमजान ईद सण तोंडावर असून तयारी सर्वत्र सुरू आहे. भाविकांची गैरसोय होवून नये यासाठी शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, माजी नगरसेवक सुहेल मुकादम, मुसा काझी, बाळू साळवी, निमेश नायर, सामाजिक कार्यकर्ते बारक्या हळदणकर, उमर  गालिब मुकादम, जिब्रान तांडेल, करीम वस्ताव यांनी रमजान ईद निमित्त ईद पर्यंत पाणी ठेवण्यासाठी उद्योजक किरण सामंत यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे मागणी केली. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मुख्याधिकारी बाबर यांनी मागणीला मान्यता देत ईदपर्यंत शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याची सूचना केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी