शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उद्या संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 13:39 IST

जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीला दिनांक २ ते ३ जून या कालावधीत चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या चक्रीवादळामुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून दिनांक ३ जून २०२० रोजी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५चे कलम ३४ प्रमाणे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संचारबंदी जाहीर केली आहे.

ठळक मुद्देचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उद्या संचारबंदीजिल्हाधिकारी यांनी काढले आदेश, एनडीआरएफची तुकडी तैनात

रत्नागिरी : जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीला दिनांक २ ते ३ जून या कालावधीत चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या चक्रीवादळामुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून दिनांक ३ जून २०२० रोजी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५चे कलम ३४ प्रमाणे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संचारबंदी जाहीर केली आहे.या आदेशानुसार लोकांना त्यांच्या अत्यावश्यक सेवा विषयक बाबीसाठी वगळून अन्य कोणत्याही गोष्टीसाठी जिल्ह्यात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी संचार करण्यास बंदी करण्यात आली आहे. या कालावधीत लोकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला असून लोकांनी घरातच सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.समुद्रामध्ये जाऊ नयेया कालावधीत लोकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. त्याचबरोबर समुद्रात वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये जाऊ नये. मच्छिमारांनी आपल्या बोटींचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना सुरक्षितपणे बांधून ठेवण्याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात.नागरिकांनी हे करावे

  • घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तर तत्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षितस्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेऊन स्थलांतरीत व्हावे.
  • घराच्या अवती भवती वादळामुळे कोणत्या वस्तू, विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूंपासून लांब रहावे.
  •  आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षितस्थळी हलवावे.
  • केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदिल) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तू उजेड व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात.
  • हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा. त्यासाठी काही जास्त बॅटऱ्या जवळ ठेवाव्यात.
  • नागरिकांनी सोबत आवश्यक अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे.

तर इथे संपर्क साधावाअतिवृष्टी व चक्रीवादळ याचा एकत्रित फटका टाळण्यासाठी समुद्रकिनारी व नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी. ग्रामकृतीदलाच्या सुचनेनुसार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात.

मदत आवश्यक असल्यास आपले ग्रामपंचायत, तहसीलदार कार्यालय, जिल्हा नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२३५२- २२६२४८, २२२२३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळRatnagiriरत्नागिरी