शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उद्या संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 13:39 IST

जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीला दिनांक २ ते ३ जून या कालावधीत चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या चक्रीवादळामुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून दिनांक ३ जून २०२० रोजी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५चे कलम ३४ प्रमाणे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संचारबंदी जाहीर केली आहे.

ठळक मुद्देचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उद्या संचारबंदीजिल्हाधिकारी यांनी काढले आदेश, एनडीआरएफची तुकडी तैनात

रत्नागिरी : जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीला दिनांक २ ते ३ जून या कालावधीत चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या चक्रीवादळामुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून दिनांक ३ जून २०२० रोजी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५चे कलम ३४ प्रमाणे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संचारबंदी जाहीर केली आहे.या आदेशानुसार लोकांना त्यांच्या अत्यावश्यक सेवा विषयक बाबीसाठी वगळून अन्य कोणत्याही गोष्टीसाठी जिल्ह्यात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी संचार करण्यास बंदी करण्यात आली आहे. या कालावधीत लोकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला असून लोकांनी घरातच सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.समुद्रामध्ये जाऊ नयेया कालावधीत लोकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. त्याचबरोबर समुद्रात वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये जाऊ नये. मच्छिमारांनी आपल्या बोटींचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना सुरक्षितपणे बांधून ठेवण्याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात.नागरिकांनी हे करावे

  • घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तर तत्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षितस्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेऊन स्थलांतरीत व्हावे.
  • घराच्या अवती भवती वादळामुळे कोणत्या वस्तू, विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूंपासून लांब रहावे.
  •  आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षितस्थळी हलवावे.
  • केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदिल) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तू उजेड व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात.
  • हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा. त्यासाठी काही जास्त बॅटऱ्या जवळ ठेवाव्यात.
  • नागरिकांनी सोबत आवश्यक अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे.

तर इथे संपर्क साधावाअतिवृष्टी व चक्रीवादळ याचा एकत्रित फटका टाळण्यासाठी समुद्रकिनारी व नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी. ग्रामकृतीदलाच्या सुचनेनुसार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात.

मदत आवश्यक असल्यास आपले ग्रामपंचायत, तहसीलदार कार्यालय, जिल्हा नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२३५२- २२६२४८, २२२२३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळRatnagiriरत्नागिरी