शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

लावणी, कोळीनृत्य, ठाकरीनृत्य, दिंडी-वारकरी नृत्यांतून महाराष्ट्राची संस्कृती

By शोभना कांबळे | Updated: February 14, 2024 15:34 IST

महासंस्कृती महोत्सवाची रत्नागिरीकरांवर तिसऱ्या दिवशीही मोहिनी

रत्नागिरी : शाहीर नंदेश उमप यांच्या महाराष्ट्राची संस्कृती या कार्यक्रमातील गण,गवळण, लोकगीते, भारुड, लावणी, कोळी नृत्य, ठाकरी नृत्य, दिंडी-वारकरी नृत्यांनी समस्त रसिकांना ठेका धरायला लावला. महासंस्कृती महोत्सवाची रत्नागिरीकरांवर तिसऱ्या दिवशीही मोहिनी कायम होती.पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात शाहीर नंदेश उमप प्रस्तुत ‘महाराष्ट्राची संस्कृती’हा कार्यक्रम मंगळवारी झाला. तत्पूर्वी कोकण नमन कला मंचाच्यावतीने भजनाचा कार्यक्रम झाला. प्रारंभी शाहीर नंदेश उमप, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, उपायुक्त राजकुमार कोले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पत्रकार अलिमियाँ काझी, किशोर मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. त्यानंतर शाहीर उमप यांचे स्वागत करण्यात आले.उमप यांच्या भारदस्त पहाडी आवाजातील नमनाने सुरूवात झाली. गण -गवळण,बहिणाबाईंच्या ओव्या, ग्रामसंस्कृती जागवणारी लोकगीते, दिंडी –वारकरी गीताने अख्या रसिकांना डोलायला लावलं. शाहीर उमप थेट रसिकांमध्ये उतरले. उपस्थितांमधून विठ्ठल नामाचा गजर आणि त्याच्या जोडीला टाळ्या यांनी वातावरण भारुन गेले होते. ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो’, ‘लिंगोबाचा डोंगूर आभाळीगेला’ या ठाकर गीतांवरील नृत्यांने आणि यानंतर तमाम महाराष्ट्राच्या लाडक्या लावणीने रसिकांना अक्षरश: वेड लावले.शिट्या-टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी पहायला मिळाला. ढोलकीवरील थाप, ताल आणि त्याच्या जोडीला उपस्थितीत प्रेक्षकांकडून मिळाणाच्या टाळ्यांची लयबद्धता यांच्या जुगलबंदीने बराच वेळ रंगत आणली. गीत, संगीत, नृत्य, गायन, वादन, सोंगी भजन, भारुड आदी कलाविष्कारांनी उपस्थितांना दंगवून टाकले.

जाती -धर्माचं सोवळं जाळलं तरच स्वराज्य उजळेल..छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय महाराष्ट्र काय, देशही पूर्ण होऊ शकत नाही. अशा राजांच्या जीवनातील शिवप्रताप दिन पोवाड्याने या कार्यक्रमाची सांगता झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साकारलेल्या पात्राने स्वराज्याच्या उभारणीत अठरापगड जाती, रोहिले, मुस्लीम मावळ्यांचा सहभाग घेतल्याचा आवर्जून उल्लेख केला. शिवाय आजही तंतोतंत लागू पडणारा ‘जाती-धर्माचं सोवळं आपण जाळलं, तरच स्वराज्य उजळेल’ हा मौलिक संदेशही या कार्यक्रमातून दिला.

७३ वर्षीय तरूणाचा उत्साह..शाहीर उमप यांच्या भारदस्त पहाडी आवाजाने ‘पयलं नमन.. ’ ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर गण आणि त्यानंतर झालेल्या ‘कान्हा वाजवी बासरी’ या गवळणने रसिकांची पाऊले थेट मंचावरच थिरकायला सुरुवात झाली. बालकांसोबत ७३ वर्षीय वृदधाच्या नृत्याने उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी