शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

चिपळूण आगारात परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST

चिपळूण : पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर बहुसंख्येने तालुक्यात दाखल झालेले चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी निघाल्याने एसटीसह रेल्वे व खासगी वाहनांनाही ...

चिपळूण : पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर बहुसंख्येने तालुक्यात दाखल झालेले चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी निघाल्याने एसटीसह रेल्वे व खासगी वाहनांनाही मोठी गर्दी होऊ लागली आहे. दोन दिवसांत तब्बल १२६ एसटी बस रवाना झाल्या असून, जादा गाड्याही हाऊसफुल्ल झाल्या आहेत. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आगार प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.

यावर्षी पूर परिस्थिती व अतिवृष्टीमुळे बहुतांशी चाकरमान्यांनी चिपळूणकडे पाठ फिरवली. तरीही सुमारे २० हजारहून अधिक चाकरमानी येथे दाखल झाले होते. या चाकरमान्यांसाठी १६० गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र आता परतीच्या प्रवासासाठीही तितक्याच गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पाच दिवसांच्या गणरायाचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले. विसर्जनानंतर बहुसंख्येने दाखल झालेले चाकरमानी परतीचा प्रवासासाठी मुंबई, पुण्याला निघाल्याने त्यांच्या प्रवासासाठी चिपळूण आगाराने विशेष जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. मंगळवारपासून प्रारंभ झालेल्या परतीच्या प्रवासासाठी आगाराने ३४ एसटी बसगाड्या मुंबई मार्गावर रवाना झाल्या आहेत. बुधवारी प्रवाशांची संख्या वाढल्याने यावेळी बसस्थानक पूर्णतः हाऊसफुल्ल झाले होते.

येथील आगारात सकाळपासूनच चाकरमान्यांची गर्दी झाल्याने मुंबईसह पुणे मार्गावरील बसगाड्या हाऊसफुल्ल होऊन जात होत्या. परतीच्या प्रवासादरम्यान चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगारात स्वतंत्र जादा वाहतूक केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. आगाऊ बुकिंग करण्यासाठी आरक्षण केंद्रासमोर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एकीकडे चाकरमान्यांसाठी जादा बसगाड्याचे नियोजन आगार प्रशासनाकडून करण्यात आले असले, तरी दुसरीकडे मात्र स्थानिक ग्रामीण फेऱ्याचे वेळापत्रक कोलडमडले होते. मंगळवारी आगारातून चाकरमान्यांसाठी ३४ तर बुधबारी ९२ जादा बसगाड्या सोडण्यात आल्या. चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी एसटीचालक वाहकांना आगार प्रशासनाकडून विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.