शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

पथदिप खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार

By admin | Updated: August 3, 2014 01:56 IST

जिल्हा परिषद : स्थायी समिती सभेत चौकशीची मागणी

रत्नागिरी : पर्यावरण संतुलित ग्राम योजनेतून सौर पथदिप खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार असून त्याची चौकशी करण्याचा मागणी आज झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केली़ अध्यक्षा मनिषा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आजची स्थायी समितीची सभा सौरदिप खरेदी भ्रष्टचाराप्रकरणी जोरदार गाजली़ पर्यावरण संतुलित ग्राम योजनेसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी विविध कामासाठी जिल्हा परिषदेकडे देण्यात आला होता़ सुमारे आतापर्यंत १६ कोटी रुपये सौर पथदिप खरेदीसाठी खर्च करण्यात आले़ त्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीकडून ही खरेदी करण्यात आली होती़ सौरदिप खरेदीसाठीचा निधी ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्यात आला होता़ मात्र, जिल्ह्यातील हजारो सौरपथदिप बंद पडले असून अनेकांच्या बॅटरी निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोपही यावेळी सदस्य संजय कदम यांनी केला़ यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टचार झाल्याचा आरोप करुन ग्रामपंचायतींची चौकशी करुन त्यांचा अहवाल पुढील सभेसमोर ठेवण्यात यावा, अशी मागणी कदम व अन्य सदस्यांनी सभेत केली़ या प्रकरणी अध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिले आहेत़ एमआरजीएस व भारत निर्माण योजनेचे प्रस्ताव येत्या १५ आॅगस्टपर्यंत सादर कराव्यात, अशा सूचना अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना दिल्या़ यावेळी उपाध्यक्ष राजेश मुकादम, शिक्षण व अर्थ सभापती सतीश शेवडे, बांधकाम व आरोग्य सभापती अजित नारकर, समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, महिला व बालकल्याण सभापती स्मिता धामणस्कर व अन्य सदस्य, अधिकारी उपस्थित होते़ (शहर वार्ताहर)