शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

cyclone : आपत्तीच्या काळातही मंडणगड उपेक्षित, दौरे केवळ दिखाव्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:52 IST

विकासकामांच्या बाबतीत नेहमीच दुर्लक्षित असलेला मंडणगड तालुका आपत्तीकाळातही उपेक्षित राहिल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील मंत्री अजूनही तालुक्यात फिरकलेले नसून, पालकमंत्र्यांनी दौऱ्यात केवळ बैठक घेण्यात धन्यता मानली.

ठळक मुद्देआपत्तीच्या काळातही मंडणगड उपेक्षित, दौरे केवळ दिखाव्यासाठीनागरिक अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत, तालुक्यात मदत मिळणे झाले दुरापास्त

मंडणगड : विकासकामांच्या बाबतीत नेहमीच दुर्लक्षित असलेला मंडणगड तालुका आपत्तीकाळातही उपेक्षित राहिल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील मंत्री अजूनही तालुक्यात फिरकलेले नसून, पालकमंत्र्यांनी दौऱ्यात केवळ बैठक घेण्यात धन्यता मानली.

खासदारांचा अजूनही पत्ताच नसून जिल्हाधिकारी यांनीदेखील रात्रीच्या वेळी तालुक्याचा दौरा केला. मंडणगड तालुक्यात सर्वाधिक नुकसान होऊनही अजून मदतीपासून ग्रामस्थ वंचित आहेत. फयान, त्सुनामी, कोरोना यांसारख्या राष्ट्रीय आपत्तीमध्येही मंडणगड तालुका जिल्ह्यातील अन्य तालुक्यांपेक्षा उपेक्षित राहिल्याची खंत आहे.राष्ट्रीय तालुक्याला मिळणारी मदत एक भाग असला तरी निसर्ग चक्रीवादळानंतरही तालुका उपेक्षित राहिला आहे. वादळामध्ये तालुक्यातील १०९ गावांपैकी ७० टक्के गावे बाधित झाली आहेत. यापैकी ५० टक्के गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची वस्तुस्थिती असताना शासकीय व राजकीय स्तरावरील हालचाली पाहता या तालुक्यात आपत्ती नाहीच का? असा सवाल निर्माण होत आहे.

३ जून रोजी आलेले वादळ सायंकाळी ३ वाजता संपले असले तरी प्रशासनाचा संपर्क होण्यास पहाटेचे ४ वाजले होते. त्यानंतर पुढील ४८ तासात प्रशासनाचा किंवा लोकप्रतिनिधींना दापोलीपर्यंतचे दौरे करता आले, पण तिथून १ तास अंतरावर असलेल्या मंडणगड तालुक्यात दौरा करता आला नाही, याचे आश्चर्य वाटते.वादळानंतर वेळास, बलदेववाडी, कांटे, केंगवल, रानवली, साखरी, जावळे, गुडेघर, काणकोर, नारायणनगर, वेळवी, देव्हारे इत्यादी गावांतील १०० टक्के घरांचे व बागायतींचे नुकसान झालेले असताना मंत्री आणि अधिकारी त्याठिकाणी फिरकलेच नाहीत. वेळास, बाणकोट परिसरातील शेतकऱ्यांच्या पिढीजात आंबा, काजू, नारळ, पोफळी, मसाले यांच्या बागा नेस्तनाबूत झाल्या. ही गावे विकास व रोजगारासाठी पन्नास वर्षे मागे गेली, असे असताना या गावांची विचारपूस करण्यासाठी कोणीही आले नाही.घटनेनंतर दोन दिवसांनी सर्वप्रथम आमदार योगेश कदम यांनी वेळास परिसराला भेट दिली. त्यांनीही संपूर्ण परिसराची पाहणी केली नाही. यानंतर जिल्हाधिकारी यांनी रात्रीच्या अंधारात या परिसराला भेट दिली. पालकमंत्री यांनी रविवारी दौरा केला. पण, त्यांनी हा परिसर पाहिलाही नाही. त्यांनी अधिकाऱ्यांशी केवळ पंधरा मिनिटे चर्चा केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवे येथे जाऊन पुन्हा दापोली गाठली. त्यामुळे त्यांचा हा दौरा नक्की कशाकरिता होता, असा सवाल उपस्थित होत आहे.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आखलेला दौराच रद्द केला. जिल्ह्याचे सुपुत्र असूनही तेही तालुक्यात फिरकलेले नाहीत. याचबरोबर एकनाथ शिंदे यांनीही तालुक्याला भेट देण्याचे टाळले. त्यामुळे सर्व पातळीवर तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याची भावना निर्माण होत आहे.तालुक्याला सापत्नतेची वागणूककोणताही रोजगार तालुक्यात नाही. मनिऑर्डरवर ग्रामस्थ गुजराण करीत आहेत. अशावेळी त्यांच्यावर संकट ओढवले असताना त्यांना तातडीची मदत मिळणे अपेक्षित आहे. पावसात घरावर छप्पर नाही. अन्नधान्य, कपडे उडून मातीमोल झाले, उत्पन्न देणाऱ्या बागायतीही नष्ट झाल्या आहेत. शहरीकरणाचा वसा घेतलेल्या मंडणगड तालुक्याला आजही सापत्न वागणूक मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा पुढे आले आहे. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळRatnagiriरत्नागिरीministerमंत्री