शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

Coronavirus in Maharashtra - मुंबई ही खाली झालीच पाहिजे : भास्कर जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:10 IST

कोरोनाच्या भीतीने गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आजही आपले प्रयत्न सुरू आहेत. मुंबई ही खाली झालीच पाहिजे, या मताशी आजही आपण ठाम आहोत. आपण स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून चालत येणाऱ्या चाकरमान्यांना बससेवा देण्याची मागणी केली असल्याची माहिती आमदार जाधव यांनी दिली.

ठळक मुद्देमुंबई ही खाली झालीच पाहिजे : भास्कर जाधव चालत येणाऱ्या चाकरमान्यांना बससेवा देण्याची मागणी

चिपळूण : कोरोनाच्या भीतीने गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आजही आपले प्रयत्न सुरू आहेत. मुंबई ही खाली झालीच पाहिजे, या मताशी आजही आपण ठाम आहोत. आपण स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून चालत येणाऱ्या चाकरमान्यांना बससेवा देण्याची मागणी केली असल्याची माहिती आमदार जाधव यांनी दिली.ते म्हणाले की, आजही कोरोना ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेला नाही. हा भाग सुरक्षित असल्याने शक्य तेवढ्या नागरिकांना गावी आणणे गरजेचे आहे. त्यासाठी सलग आठ दिवस बससेवा सुरू करून चालत येणाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच कोरोना रुग्णांची वाढती संख्या मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांच्या माथी मारणेदेखील पूर्णत: चुकीचे आहे. या संकटात चाकरमान्यांचा कोणताही दोष नाही. त्यामुळे त्यांना चांगली वागणूक अथवा सेवा मिळालीच पाहिजे, असे त्यांनी सांगितले.भास्कर जाधव यांनी चाकरमान्यांसाठी व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही सांगितले. त्यांनी सांगितले की, मार्गताम्हाणे येथे तपासणी नाक्यावर विद्युत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असून, तेथे शिवसेनेतर्फे तंबू, केबीन व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सावर्डे नर्सिंग सेंटर, कामथे येथील समाजकल्याण वसतिगृहाची डागडुजी करून तेथेही जादा खाटांची व्यवस्था केली जाणार आहे.तसेच गुहागरसाठी १०० खाटांचे कोरोना केअर सेंटर उभारले जाणार आहे. त्यासाठी चार जागांची पाहणी केली जात आहे. त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे पुरेसा निधी उपलब्ध झाला असला, तरी आपण आपल्या आमदार निधीतून ५० लाख रूपये खर्च करण्यास परवानगी दिली आहे. या धर्तीवर सावर्डे येथेही कोरोना केअर सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार जाधव यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhaskar Jadhavभास्कर जाधवRatnagiriरत्नागिरीMumbaiमुंबई