शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

Coronavirus in Maharashtra - मुंबई ही खाली झालीच पाहिजे : भास्कर जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:10 IST

कोरोनाच्या भीतीने गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आजही आपले प्रयत्न सुरू आहेत. मुंबई ही खाली झालीच पाहिजे, या मताशी आजही आपण ठाम आहोत. आपण स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून चालत येणाऱ्या चाकरमान्यांना बससेवा देण्याची मागणी केली असल्याची माहिती आमदार जाधव यांनी दिली.

ठळक मुद्देमुंबई ही खाली झालीच पाहिजे : भास्कर जाधव चालत येणाऱ्या चाकरमान्यांना बससेवा देण्याची मागणी

चिपळूण : कोरोनाच्या भीतीने गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आजही आपले प्रयत्न सुरू आहेत. मुंबई ही खाली झालीच पाहिजे, या मताशी आजही आपण ठाम आहोत. आपण स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून चालत येणाऱ्या चाकरमान्यांना बससेवा देण्याची मागणी केली असल्याची माहिती आमदार जाधव यांनी दिली.ते म्हणाले की, आजही कोरोना ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेला नाही. हा भाग सुरक्षित असल्याने शक्य तेवढ्या नागरिकांना गावी आणणे गरजेचे आहे. त्यासाठी सलग आठ दिवस बससेवा सुरू करून चालत येणाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच कोरोना रुग्णांची वाढती संख्या मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांच्या माथी मारणेदेखील पूर्णत: चुकीचे आहे. या संकटात चाकरमान्यांचा कोणताही दोष नाही. त्यामुळे त्यांना चांगली वागणूक अथवा सेवा मिळालीच पाहिजे, असे त्यांनी सांगितले.भास्कर जाधव यांनी चाकरमान्यांसाठी व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही सांगितले. त्यांनी सांगितले की, मार्गताम्हाणे येथे तपासणी नाक्यावर विद्युत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असून, तेथे शिवसेनेतर्फे तंबू, केबीन व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सावर्डे नर्सिंग सेंटर, कामथे येथील समाजकल्याण वसतिगृहाची डागडुजी करून तेथेही जादा खाटांची व्यवस्था केली जाणार आहे.तसेच गुहागरसाठी १०० खाटांचे कोरोना केअर सेंटर उभारले जाणार आहे. त्यासाठी चार जागांची पाहणी केली जात आहे. त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे पुरेसा निधी उपलब्ध झाला असला, तरी आपण आपल्या आमदार निधीतून ५० लाख रूपये खर्च करण्यास परवानगी दिली आहे. या धर्तीवर सावर्डे येथेही कोरोना केअर सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार जाधव यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhaskar Jadhavभास्कर जाधवRatnagiriरत्नागिरीMumbaiमुंबई