शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

CoronaVirus InRatnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 15:21 IST

जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी कोरोनाबाधितांचा आकडा १६१ वर पोहोचला असतानाच मंगळवारी सकाळी १० वाजता कोरोनाबाधित पाचव्या रुग्णाचा मृत्यू झाला. संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी येथील प्रौढाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. संगमेश्वर तालुक्यातील कोरोनाचा हा पहिलाच बळी ठरला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित पाचव्या रुग्णाचा मृत्यू संगमेश्वर तालुक्यात पहिला बळी

रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी कोरोनाबाधितांचा आकडा १६१ वर पोहोचला असतानाच मंगळवारी सकाळी १० वाजता कोरोनाबाधित पाचव्या रुग्णाचा मृत्यू झाला. संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी येथील प्रौढाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. संगमेश्वर तालुक्यातील कोरोनाचा हा पहिलाच बळी ठरला आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आत्तापर्यंत १६१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मुंबईकरांचाच समावेश आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत तब्बल ७४ हजार नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १६१ झाली असून, ५५ जण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. मात्र, मंगळवारी सकाळी संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी येथील एका प्रौढाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली.

माळवाशी येथील मृत्यूमुखी पडलेली व्यक्ती मुंबईतून आलेली असून, १९ मे रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेले आठ दिवस कोरोनाशी झुंज देत असतानाच मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.जिल्ह्यात आत्तापर्यंत खेड तालुक्यातील अलसुरेतील व्यक्ती, दापोली तालुक्यातील माटवण येथील महिला, गुहागर तालुक्यातील जामसूद येथील महिला आणि रत्नागिरी तालुक्यातील नाचणे - शांतीनगर येथील महिलेचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी