शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

CoronaVirus : महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात टेस्ट लॅब त्वरीत सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 16:19 IST

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना तपासणी लॅब सुरु करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तोच आरोग्य सुविधेवर जास्तीत जास्त खर्च करण्याचे आदेशही दिले आहेत. रत्नागिरीतील कोरोना तपासणी लॅबबाबत खलिला वस्ता यांच्यातर्फे अ‍ॅड. राकेश भाटकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी अंतिम निर्णय देण्यात आला.

ठळक मुद्दे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेशरत्नागिरीचे खलिल वस्ता यांनी दाखल केली याचिका

रत्नागिरी : राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना तपासणी लॅब सुरु करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तोच आरोग्य सुविधेवर जास्तीत जास्त खर्च करण्याचे आदेशही दिले आहेत. रत्नागिरीतील कोरोना तपासणी लॅबबाबत खलिला वस्ता यांच्यातर्फे अ‍ॅड. राकेश भाटकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी अंतिम निर्णय देण्यात आला.महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून कोरोना तपासणीसाठी मिरज किंवा कोल्हापूर येथे नमुने पाठविण्यात येत होते. मात्र, ते मिळण्यासाठी बराच कालावधी लागत असल्याने अ‍ॅड. राकेश भाटकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यात लॅब सुरू करण्याबाबत याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ए सय्यद यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होती. त्यावर शुक्रवारी निर्णय देण्यात आला.या याचिकेवरील पहिल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्यातील इतर जिल्ह्यांची माहिती मागविली होती. राज्य सरकारने दिलेल्या या माहितीनुसार राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये तपासणी लॅब नसल्याचे पुढे आले होते. आयसीएमआर यांच्या नियमानुसार ज्या जिल्ह्यात १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळलेले आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये कोरोना तपासणी लॅब असणे गरजेचे आहे, असे स्पष्ट केले आहेत.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि उपाययोजना पाहता मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात टेस्ट लॅब त्वरीत सुरू करा, आयसीएमआरच्या गाईडलाईन्स नुसार प्रत्येक जिल्ह्यात टेस्ट लॅब असली पाहिजे, असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याadvocateवकिलRatnagiriरत्नागिरी