शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित आणखी एका रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यातून मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी काही अहवाल सोमवारी सकाळी प्राप्त झाले. या ...

ठळक मुद्देकामथेतील एकाचा मृत्यूनंतरचा अहवाल पॉझिटिव्हआणखी तिघे कोरोनाबाधित, कोरोनाग्रस्तांचा आकडा ३६४

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यातून मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी काही अहवाल सोमवारी सकाळी प्राप्त झाले. या अहवालानुसार आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर चिपळूण तालुक्यातील कामथे येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १४ झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांचे स्वॅब घेऊन क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे स्वॅब तपासणीसाठी कोल्हापूर आणि मिरज येथे पाठविण्यात आले आहेत. हे अहवाल टप्प्याटप्प्याने जिल्हा रुग्णालयाला प्राप्त होत आहेत. सोमवारी सकाळी मिरज येथून काही अहवाल प्राप्त झाले आहेत. या प्राप्त अहवालांमध्ये ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ४६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये रत्नागिरीतील एक आणि संगमेश्वरातील एकाचा समावेश आहे.त्याचबरोबर चिपळूण तालुक्यातील कामथे येथील एकाचा ३ जून रोजी मृत्यू झाला होता. त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचाही अहवाल सोमवारी प्राप्त झाला असून, तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आता १४ झाली आहे. त्याचबरोबर ६ कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या १७३ इतकी आहे. तर सध्या १७७ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी