शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

corona virus : कामगारांच्या चारित्र्य पडताळणीला कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 17:31 IST

Coronavirus, ratnagiri, police, पूर्वी शासकीय सेवेसाठी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य असायचे. पण आता उमेदवाराला गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही ना, याची शहानिशा करण्यासाठी खासगी आस्थापना तसेच विविध परवान्यांसाठीही चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मागितले जात आहे.

ठळक मुद्देकामगारांच्या चारित्र्य पडताळणीला कोरोनाची बाधाप्रमाणपत्रांचे काम मंदावले

शोभना कांबळेरत्नागिरी : पूर्वी शासकीय सेवेसाठी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य असायचे. पण आता उमेदवाराला गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही ना, याची शहानिशा करण्यासाठी खासगी आस्थापना तसेच विविध परवान्यांसाठीही चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मागितले जात आहे.यापूर्वी शासनाच्या सेवेत रूजू होण्यासाठी पोलीस विभागाकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागत होते. मात्र, बदलत्या काळानुसार गुन्हेगारीत वाढ होऊ लागल्याने आता शासकीयबरोबरच खासगी आस्थापनांमध्येही उमेदवाराचे चारित्र्य पाहिले जाते. त्यामागे गुन्हेगारी पार्श्वभूमी असू नये, यासाठी उमेदवाराला पडताळणी प्रमाणपत्र दाखल करावे लागते.

गेल्या काही वर्षांपासून शिक्षक भरतीसाठीही चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागत आहे. तसेच शासकीय समितीवर निवड, विविध शासकीय परवाने, बँकांमध्ये नोकरी, विविध उद्योग, कारखाने, खासगी आस्थापना, सुरक्षारक्षकांची भरती आदींसाठी पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते.गेल्यावर्षी १०,२८३ ऑनलाईन आणि ३३० ऑफलाईन अशी एकूण १०,६१३ प्रमाणपत्र पोलीस विभागाकडून देण्यात आली होती. मात्र, यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने एप्रिल ते जुलै या कालावधीत पडताळणीची संख्या कमी आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा पडताळणीसाठीचे प्रस्ताव वाढू लागले असून, ३ डिसेंबरपर्यंत ही संख्या ६,८१४ झाली आहे.दोन वर्षांत १७,४२७ कर्मचाऱ्यांची पडताळणीगेल्यावर्षी १०,६१३ विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी पोलीस विभागाकडून करण्यात आली होती. यावर्षी कोरोनामुळे एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत कमी प्रस्ताव दाखल झाले. मात्र, तरीही जून ते ३ डिसेंबर २०२० या कालावधीत ६,८१४ प्रमाणपत्रे देण्यात आली.पडताळणीसाठी असा करा अर्जपडताळणी जलदगतीने होण्यासाठी २०१७ सालापासून ऑनलाईन प्रणाली सुरू झाली आहे. त्यासाठी pcs.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो. त्यासोबत आधार, पॅनकार्ड आदी कागदपत्रे जोडावी लागतात.

कुठेही काम करताना उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाही ना, हे पाहिले जाते. आता तर कुठल्याही ठिकाणी त्याच्याकडून गुन्हा घडला असेल, तर महाराष्ट्रात कुठेही चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज केला तरी त्यावर त्याने केलेला गुन्हा नमूद होतो.- हेमंतकुुमार शहा,पोलीस अधिकारी

उद्योग किंवा कारखान्याची विश्वासार्हता महत्त्वाची असते. त्यामुळे त्यात काम करणारे कर्मचारी हेही विश्वासू असावे लागतात. याठिकाणी काम करणाऱ्या कामगाराला जर कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, तर ती त्या उद्योगासाठी घातक असते. त्यासाठी त्याला कामावर घेतानाच त्या उमेदवाराची चारित्र्य पडताळणी करणे गरजेचे असते.- अभिजीत जाधव, उद्योजक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसGovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी