शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

corona virus : कामगारांच्या चारित्र्य पडताळणीला कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 17:31 IST

Coronavirus, ratnagiri, police, पूर्वी शासकीय सेवेसाठी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य असायचे. पण आता उमेदवाराला गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही ना, याची शहानिशा करण्यासाठी खासगी आस्थापना तसेच विविध परवान्यांसाठीही चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मागितले जात आहे.

ठळक मुद्देकामगारांच्या चारित्र्य पडताळणीला कोरोनाची बाधाप्रमाणपत्रांचे काम मंदावले

शोभना कांबळेरत्नागिरी : पूर्वी शासकीय सेवेसाठी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य असायचे. पण आता उमेदवाराला गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही ना, याची शहानिशा करण्यासाठी खासगी आस्थापना तसेच विविध परवान्यांसाठीही चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मागितले जात आहे.यापूर्वी शासनाच्या सेवेत रूजू होण्यासाठी पोलीस विभागाकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागत होते. मात्र, बदलत्या काळानुसार गुन्हेगारीत वाढ होऊ लागल्याने आता शासकीयबरोबरच खासगी आस्थापनांमध्येही उमेदवाराचे चारित्र्य पाहिले जाते. त्यामागे गुन्हेगारी पार्श्वभूमी असू नये, यासाठी उमेदवाराला पडताळणी प्रमाणपत्र दाखल करावे लागते.

गेल्या काही वर्षांपासून शिक्षक भरतीसाठीही चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागत आहे. तसेच शासकीय समितीवर निवड, विविध शासकीय परवाने, बँकांमध्ये नोकरी, विविध उद्योग, कारखाने, खासगी आस्थापना, सुरक्षारक्षकांची भरती आदींसाठी पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते.गेल्यावर्षी १०,२८३ ऑनलाईन आणि ३३० ऑफलाईन अशी एकूण १०,६१३ प्रमाणपत्र पोलीस विभागाकडून देण्यात आली होती. मात्र, यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने एप्रिल ते जुलै या कालावधीत पडताळणीची संख्या कमी आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा पडताळणीसाठीचे प्रस्ताव वाढू लागले असून, ३ डिसेंबरपर्यंत ही संख्या ६,८१४ झाली आहे.दोन वर्षांत १७,४२७ कर्मचाऱ्यांची पडताळणीगेल्यावर्षी १०,६१३ विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी पोलीस विभागाकडून करण्यात आली होती. यावर्षी कोरोनामुळे एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत कमी प्रस्ताव दाखल झाले. मात्र, तरीही जून ते ३ डिसेंबर २०२० या कालावधीत ६,८१४ प्रमाणपत्रे देण्यात आली.पडताळणीसाठी असा करा अर्जपडताळणी जलदगतीने होण्यासाठी २०१७ सालापासून ऑनलाईन प्रणाली सुरू झाली आहे. त्यासाठी pcs.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो. त्यासोबत आधार, पॅनकार्ड आदी कागदपत्रे जोडावी लागतात.

कुठेही काम करताना उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाही ना, हे पाहिले जाते. आता तर कुठल्याही ठिकाणी त्याच्याकडून गुन्हा घडला असेल, तर महाराष्ट्रात कुठेही चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज केला तरी त्यावर त्याने केलेला गुन्हा नमूद होतो.- हेमंतकुुमार शहा,पोलीस अधिकारी

उद्योग किंवा कारखान्याची विश्वासार्हता महत्त्वाची असते. त्यामुळे त्यात काम करणारे कर्मचारी हेही विश्वासू असावे लागतात. याठिकाणी काम करणाऱ्या कामगाराला जर कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, तर ती त्या उद्योगासाठी घातक असते. त्यासाठी त्याला कामावर घेतानाच त्या उमेदवाराची चारित्र्य पडताळणी करणे गरजेचे असते.- अभिजीत जाधव, उद्योजक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसGovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी