शहरं
Join us  
Trending Stories
1
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
2
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
3
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
4
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
5
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
6
BMC Elections: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
7
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
8
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
9
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
10
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
11
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
12
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
13
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
14
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
15
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
16
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
17
Pisces Yearly Horoscope 2026: मीन राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रेमाचे आणि प्रगतीचे वर्ष; परदेश प्रवासासह उत्पन्नात होणार मोठी वाढ!
18
पत्नी असावी तर अशी! BMC निवडणूक लढवणाऱ्या समाधान सरवणकरांना तेजस्विनीची साथ, अभिनेत्रीचं होतंय कौतुक
19
‘मुंबई मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने उमेदवार उतरवणार’, सुनिल तटकरे यांची घोषणा
20
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : बाजारपेठ बंदला रत्नागिरीतील व्यापाऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 15:24 IST

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही तालुक्यांमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंदचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील व्यापाऱ्यांची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने बंद ठेवण्यास स्पष्ट विरोध दर्शविला. मात्र, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी स्वेच्छेने दुकाने बंद ठेऊ शकतात, असेही ठरविण्यात आले.

ठळक मुद्देबाजारपेठ बंदला रत्नागिरीतील व्यापाऱ्यांचा विरोधकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बैठक, स्वेच्छेने दुकाने बंद ठेवण्याची सूचना

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही तालुक्यांमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंदचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील व्यापाऱ्यांची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने बंद ठेवण्यास स्पष्ट विरोध दर्शविला. मात्र, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी स्वेच्छेने दुकाने बंद ठेऊ शकतात, असेही ठरविण्यात आले.काही तालुक्यांमधून स्थानिक व्यापारी बांधवांनी एकत्र येऊन निर्णय घेत तेथील स्थानिक बाजारपेठ काही दिवस बंद ठेवून कोरोनाची ह्यब्रेक द चेनह्ण करण्याचा प्रयोग राबविला आहे. त्यांच्या भूमिकेचा विचार करून रत्नागिरी शहरातील व्यापाऱ्यांशी अशा प्रयोगाबाबत विचारविनिमय करण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांची बैठक पार पडली.या बैठकीमध्ये सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांचा विचार करण्यात आला. या बैठकीमध्ये हजर असलेल्या सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने यापूर्वी सुमारे ३ महिने बंद ठेवून मोठं नुकसान करून घेतल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे आता पुन्हा दुकाने बंद ठेवून आणखी नुकसान सहन करण्याची व्यापाऱ्यांची ताकद नसल्याने रत्नागिरी शहरातील व्यापाऱ्यांनी एकमताने आपली दुकाने बंद ठेवण्यास स्पष्टपणे नकार दर्शविला आहे. ज्या व्यापाऱ्यांना कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपली दुकाने स्वेच्छेने बंद ठेवायची असल्यास ते व्यापारी आपली दुकाने स्वेच्छेने बंद ठेवू शकतात. 

जे व्यापारी आपली दुकाने नेहमीप्रमाणे सुरू ठेवणार आहेत, त्यांनी शासनाच्या सर्व नियमांचे म्हणजेच सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्क आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असून, शासनाने दिलेल्या वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता दुकाने बंद करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास सदर व्यापाऱ्यांवर शासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.- उदय पेठे, अध्यक्ष,रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी