शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

corona virus : बाजारपेठ बंदला रत्नागिरीतील व्यापाऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 15:24 IST

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही तालुक्यांमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंदचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील व्यापाऱ्यांची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने बंद ठेवण्यास स्पष्ट विरोध दर्शविला. मात्र, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी स्वेच्छेने दुकाने बंद ठेऊ शकतात, असेही ठरविण्यात आले.

ठळक मुद्देबाजारपेठ बंदला रत्नागिरीतील व्यापाऱ्यांचा विरोधकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बैठक, स्वेच्छेने दुकाने बंद ठेवण्याची सूचना

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही तालुक्यांमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंदचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील व्यापाऱ्यांची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने बंद ठेवण्यास स्पष्ट विरोध दर्शविला. मात्र, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी स्वेच्छेने दुकाने बंद ठेऊ शकतात, असेही ठरविण्यात आले.काही तालुक्यांमधून स्थानिक व्यापारी बांधवांनी एकत्र येऊन निर्णय घेत तेथील स्थानिक बाजारपेठ काही दिवस बंद ठेवून कोरोनाची ह्यब्रेक द चेनह्ण करण्याचा प्रयोग राबविला आहे. त्यांच्या भूमिकेचा विचार करून रत्नागिरी शहरातील व्यापाऱ्यांशी अशा प्रयोगाबाबत विचारविनिमय करण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांची बैठक पार पडली.या बैठकीमध्ये सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांचा विचार करण्यात आला. या बैठकीमध्ये हजर असलेल्या सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने यापूर्वी सुमारे ३ महिने बंद ठेवून मोठं नुकसान करून घेतल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे आता पुन्हा दुकाने बंद ठेवून आणखी नुकसान सहन करण्याची व्यापाऱ्यांची ताकद नसल्याने रत्नागिरी शहरातील व्यापाऱ्यांनी एकमताने आपली दुकाने बंद ठेवण्यास स्पष्टपणे नकार दर्शविला आहे. ज्या व्यापाऱ्यांना कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपली दुकाने स्वेच्छेने बंद ठेवायची असल्यास ते व्यापारी आपली दुकाने स्वेच्छेने बंद ठेवू शकतात. 

जे व्यापारी आपली दुकाने नेहमीप्रमाणे सुरू ठेवणार आहेत, त्यांनी शासनाच्या सर्व नियमांचे म्हणजेच सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्क आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असून, शासनाने दिलेल्या वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता दुकाने बंद करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास सदर व्यापाऱ्यांवर शासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.- उदय पेठे, अध्यक्ष,रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी