शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

corona virus -जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढली, येणारे मार्ग बंद करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 13:45 IST

जिल्हाभरात हजारोंच्या संख्येने मुंबई, पुणे येथून नागरिक दाखल झाले आहेत. यातील अनेकजण आपण बाहेरगावाहून आल्याची माहितीही लपवत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणारे सर्व मार्ग बंद करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढली, येणारे मार्ग बंद करण्याची गरज अनेकजण लपवतायत माहिती, आरोग्य यंत्रणेसमोर पडलाय पेच

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत असले तरी अनेकजण जिल्ह्यात बाहेरहून दाखल होत आहेत.

जिल्हाभरात हजारोंच्या संख्येने मुंबई, पुणे येथून नागरिक दाखल झाले आहेत. यातील अनेकजण आपण बाहेरगावाहून आल्याची माहितीही लपवत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणारे सर्व मार्ग बंद करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हेच मोठे आव्हान आता उभे राहिले आहे. त्यासाठी कोणीही घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत ह्यजनता कर्फ्यूह्ण यशस्वीही झाला. पण, बाहेर गावाहून येणारे लोंढे अजूनही थांबलेले नाहीत. कोकणातील बहुतांशी लोक मुंबई, पुणे येथे वास्तव्याला आहेत.

या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या भागातून येणाऱ्या नागरिकांना थांबविणे गरजेचे आहे. रेल्वे, एस्. टी. बससेवा बंद असली तरी अनेकजण खासगी वाहनाने रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होत आहेत.सुटी पडल्याने अनेकजण आपल्या गावी मौजमजा करण्यासाठी येत असल्याचेही पुढे येत आहे. त्याचबरोबर परदेशात कामानिमित्त स्थायिक झालेले बहुतांशी नागरिक मायदेशी परतत आहेत. यामध्ये दुबई व आखाती भागातून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या सर्वांना थांबविणे गरजेचे आहे.

अनेकजण जिल्ह्यात दाखल होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरगावातून आल्यानंतर त्याची माहिती संबंधित आरोग्य यंत्रणेला देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पण, या आवाहनाला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. अनेकजण ही माहिती लपविताना दिसत आहेत.ही माहिती घेण्याचे काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. माहिती विचारल्यास त्यांनाच जाब विचारण्यात येत आहे. त्यामुळे ही माहितीदेखील मिळणे मुश्किल झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणारे सर्व मार्ग तत्काळ बंद करण्याची गरज निर्माण झाली असून, नातेवाईकांनीही आपल्या आप्तेष्टांना गावी न येण्याचे आवाहन करण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी