शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

corona virus -जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढली, येणारे मार्ग बंद करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 13:45 IST

जिल्हाभरात हजारोंच्या संख्येने मुंबई, पुणे येथून नागरिक दाखल झाले आहेत. यातील अनेकजण आपण बाहेरगावाहून आल्याची माहितीही लपवत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणारे सर्व मार्ग बंद करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढली, येणारे मार्ग बंद करण्याची गरज अनेकजण लपवतायत माहिती, आरोग्य यंत्रणेसमोर पडलाय पेच

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत असले तरी अनेकजण जिल्ह्यात बाहेरहून दाखल होत आहेत.

जिल्हाभरात हजारोंच्या संख्येने मुंबई, पुणे येथून नागरिक दाखल झाले आहेत. यातील अनेकजण आपण बाहेरगावाहून आल्याची माहितीही लपवत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणारे सर्व मार्ग बंद करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हेच मोठे आव्हान आता उभे राहिले आहे. त्यासाठी कोणीही घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत ह्यजनता कर्फ्यूह्ण यशस्वीही झाला. पण, बाहेर गावाहून येणारे लोंढे अजूनही थांबलेले नाहीत. कोकणातील बहुतांशी लोक मुंबई, पुणे येथे वास्तव्याला आहेत.

या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या भागातून येणाऱ्या नागरिकांना थांबविणे गरजेचे आहे. रेल्वे, एस्. टी. बससेवा बंद असली तरी अनेकजण खासगी वाहनाने रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होत आहेत.सुटी पडल्याने अनेकजण आपल्या गावी मौजमजा करण्यासाठी येत असल्याचेही पुढे येत आहे. त्याचबरोबर परदेशात कामानिमित्त स्थायिक झालेले बहुतांशी नागरिक मायदेशी परतत आहेत. यामध्ये दुबई व आखाती भागातून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या सर्वांना थांबविणे गरजेचे आहे.

अनेकजण जिल्ह्यात दाखल होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरगावातून आल्यानंतर त्याची माहिती संबंधित आरोग्य यंत्रणेला देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पण, या आवाहनाला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. अनेकजण ही माहिती लपविताना दिसत आहेत.ही माहिती घेण्याचे काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. माहिती विचारल्यास त्यांनाच जाब विचारण्यात येत आहे. त्यामुळे ही माहितीदेखील मिळणे मुश्किल झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणारे सर्व मार्ग तत्काळ बंद करण्याची गरज निर्माण झाली असून, नातेवाईकांनीही आपल्या आप्तेष्टांना गावी न येण्याचे आवाहन करण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी