शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढली, येणारे मार्ग बंद करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 13:45 IST

जिल्हाभरात हजारोंच्या संख्येने मुंबई, पुणे येथून नागरिक दाखल झाले आहेत. यातील अनेकजण आपण बाहेरगावाहून आल्याची माहितीही लपवत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणारे सर्व मार्ग बंद करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढली, येणारे मार्ग बंद करण्याची गरज अनेकजण लपवतायत माहिती, आरोग्य यंत्रणेसमोर पडलाय पेच

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत असले तरी अनेकजण जिल्ह्यात बाहेरहून दाखल होत आहेत.

जिल्हाभरात हजारोंच्या संख्येने मुंबई, पुणे येथून नागरिक दाखल झाले आहेत. यातील अनेकजण आपण बाहेरगावाहून आल्याची माहितीही लपवत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणारे सर्व मार्ग बंद करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हेच मोठे आव्हान आता उभे राहिले आहे. त्यासाठी कोणीही घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत ह्यजनता कर्फ्यूह्ण यशस्वीही झाला. पण, बाहेर गावाहून येणारे लोंढे अजूनही थांबलेले नाहीत. कोकणातील बहुतांशी लोक मुंबई, पुणे येथे वास्तव्याला आहेत.

या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या भागातून येणाऱ्या नागरिकांना थांबविणे गरजेचे आहे. रेल्वे, एस्. टी. बससेवा बंद असली तरी अनेकजण खासगी वाहनाने रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होत आहेत.सुटी पडल्याने अनेकजण आपल्या गावी मौजमजा करण्यासाठी येत असल्याचेही पुढे येत आहे. त्याचबरोबर परदेशात कामानिमित्त स्थायिक झालेले बहुतांशी नागरिक मायदेशी परतत आहेत. यामध्ये दुबई व आखाती भागातून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या सर्वांना थांबविणे गरजेचे आहे.

अनेकजण जिल्ह्यात दाखल होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरगावातून आल्यानंतर त्याची माहिती संबंधित आरोग्य यंत्रणेला देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पण, या आवाहनाला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. अनेकजण ही माहिती लपविताना दिसत आहेत.ही माहिती घेण्याचे काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. माहिती विचारल्यास त्यांनाच जाब विचारण्यात येत आहे. त्यामुळे ही माहितीदेखील मिळणे मुश्किल झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणारे सर्व मार्ग तत्काळ बंद करण्याची गरज निर्माण झाली असून, नातेवाईकांनीही आपल्या आप्तेष्टांना गावी न येण्याचे आवाहन करण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी