शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

corona virus : रत्नागिरीत कोरोनाबाधित मृत रुग्णांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 13:47 IST

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील तपासणी केंद्रातून मंगळवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आणखीन ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४९३ इतकी झाली आहे. तर मंगळवारी आणखीन दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून २३ झाली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत कोरोनाबाधित मृत रुग्णांच्या संख्येत वाढआणखीन दोघांचा मृत्यू, मृतांची संख्या झाली २३, नवीन अहवालानुसार ९ जण पॉझिटिव्ह

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील तपासणी केंद्रातून मंगळवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आणखीन ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४९३ इतकी झाली आहे. तर मंगळवारी आणखीन दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून २३ झाली आहे.गेले दोन दिवस जिल्हा रुग्णालयातील तपासणी मशीन बंद पडल्याने अहवाल प्राप्त झाले नव्हते. सोमवारी सायंकाळी हे मशीन सुरू झाल्यानंतर तपासणीचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखीन ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये दापोली तालुक्यातील आडे येथे १ आणि दाभोळ येथील २, संगमेश्वर तालुक्यातील कडवईत १, अंधेरी - कारभाटलेत १, तिवरेवाडीत १, लांजा तालुक्यातील इसवली येथे १, रत्नागिरीतील निवळीफाटा - हातखंबा येथे १ आणि जयगड येथील एकाचा समावेश आहे.जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांपैकी आणखीन दोघांचा मंगळवारी मृत्यू झाला. मृत झालेल्या रुग्णांमध्ये चिपळूणमधील बहादूरशेख नाका येथील ७२ वर्षीय पुरूषाचा तर खेडमधील शिवतर येथील ४४ वर्षाच्या पुरूषाचा समावेश आहे. हे दोन्ही रुग्ण मुंबईतून गावी आले होते.जहाजातील आणखीन एक पॉझिटिव्हजयगड येथील जहाजातून आलेल्यांपैकी आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नव्याने आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाचा यापूर्वी अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, तो अन्य चार पॉझिटिव्ह रुग्णांसोबत गणपतीपुळे येथील हॉटेलमध्ये राहिला होता. सुरक्षेसाठी त्याला रत्नागिरीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत क्वारंटाईन करण्यात आले होते. तेथून पुन्हा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल सोमवारी रात्री प्राप्त झाला असून, तो पॉझिटिव्ह आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी