शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

corona virus : रत्नागिरीतील क्वारंटाईन केंद्रात असुविधांचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 16:45 IST

परदेशातून सुखकर प्रवास करून रत्नागिरीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे रत्नागिरीत आल्यावर हाल झाले. रत्नागिरीतील सिंचन भवनातील क्वारंटाईन केंद्रातील गैरसोयींमुळे हाल झाले. या गैरसोयींमुळे विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तर काही पालकांनी आपल्या मुलांची इतरत्र व्यवस्था केली होती.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला संताप परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांचे रत्नागिरीत आल्यावर हाल

रत्नागिरी : परदेशातून सुखकर प्रवास करून रत्नागिरीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे रत्नागिरीत आल्यावर हाल झाले. रत्नागिरीतील सिंचन भवनातील क्वारंटाईन केंद्रातील गैरसोयींमुळे हाल झाले. या गैरसोयींमुळे विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तर काही पालकांनी आपल्या मुलांची इतरत्र व्यवस्था केली होती.परदेशात शिक्षण घेणारे काही विद्यार्थी सोमवारी रात्री रत्नागिरीत दाखल झाले. रत्नागिरीतील दामले हायस्कूल येथे स्वॅब घेतल्यानंतर त्यांना सिंचन भवन येथील विश्रामगृहात क्वारंटाईन करण्यात आले. मात्र, हे विद्यार्थी तेथे पोहोचल्यानंतर असुविधांचा सामना करावा लागला. क्वारंटाईन केंद्रात बेड नाही, गाद्या नाहीत, अशी परिस्थिती होती. त्यातही केंद्रात पाण्याची सुविधा नसल्याचेही पाहायला मिळाले.केंद्रातील खोल्यांमधील शौचालय गेले सहा महिनेच साफ केले नसल्याचे विदारक चित्र विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना पाहायला मिळाले. हे विदारक चित्र पाहिल्यानंतर रात्री उशिरा विद्यार्थी आणि त्यांच्या नातेवाईकांनी स्वत: खोल्या साफ करून घेतल्या. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन केंद्रात ठेवण्यात आले. मात्र, काही नातेवाईकांनी येथील परिस्थिती पाहिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना अन्यत्र नेण्याचा निर्णय घेतला. अखेर केंद्रात कोणतीही नोंद न करता त्या विद्यार्थ्यांना त्यांनी अन्यत्र नेले. क्वारंटाईनसाठी असलेल्या केंद्रातील गैरसोयीबाबत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.संतप्त भावनासिंचन भवनाच्या विश्रामगृहातील क्वारंटाईन केंद्रात दोन पोलीस आणि शिक्षक कार्यरत होते. क्वारंटाईन केंद्रात नक्की माणसे ठेवतात का, असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणीही केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी