शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

corona virus : रत्नागिरीतील क्वारंटाईन केंद्रात असुविधांचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 16:45 IST

परदेशातून सुखकर प्रवास करून रत्नागिरीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे रत्नागिरीत आल्यावर हाल झाले. रत्नागिरीतील सिंचन भवनातील क्वारंटाईन केंद्रातील गैरसोयींमुळे हाल झाले. या गैरसोयींमुळे विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तर काही पालकांनी आपल्या मुलांची इतरत्र व्यवस्था केली होती.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला संताप परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांचे रत्नागिरीत आल्यावर हाल

रत्नागिरी : परदेशातून सुखकर प्रवास करून रत्नागिरीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे रत्नागिरीत आल्यावर हाल झाले. रत्नागिरीतील सिंचन भवनातील क्वारंटाईन केंद्रातील गैरसोयींमुळे हाल झाले. या गैरसोयींमुळे विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तर काही पालकांनी आपल्या मुलांची इतरत्र व्यवस्था केली होती.परदेशात शिक्षण घेणारे काही विद्यार्थी सोमवारी रात्री रत्नागिरीत दाखल झाले. रत्नागिरीतील दामले हायस्कूल येथे स्वॅब घेतल्यानंतर त्यांना सिंचन भवन येथील विश्रामगृहात क्वारंटाईन करण्यात आले. मात्र, हे विद्यार्थी तेथे पोहोचल्यानंतर असुविधांचा सामना करावा लागला. क्वारंटाईन केंद्रात बेड नाही, गाद्या नाहीत, अशी परिस्थिती होती. त्यातही केंद्रात पाण्याची सुविधा नसल्याचेही पाहायला मिळाले.केंद्रातील खोल्यांमधील शौचालय गेले सहा महिनेच साफ केले नसल्याचे विदारक चित्र विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना पाहायला मिळाले. हे विदारक चित्र पाहिल्यानंतर रात्री उशिरा विद्यार्थी आणि त्यांच्या नातेवाईकांनी स्वत: खोल्या साफ करून घेतल्या. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन केंद्रात ठेवण्यात आले. मात्र, काही नातेवाईकांनी येथील परिस्थिती पाहिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना अन्यत्र नेण्याचा निर्णय घेतला. अखेर केंद्रात कोणतीही नोंद न करता त्या विद्यार्थ्यांना त्यांनी अन्यत्र नेले. क्वारंटाईनसाठी असलेल्या केंद्रातील गैरसोयीबाबत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.संतप्त भावनासिंचन भवनाच्या विश्रामगृहातील क्वारंटाईन केंद्रात दोन पोलीस आणि शिक्षक कार्यरत होते. क्वारंटाईन केंद्रात नक्की माणसे ठेवतात का, असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणीही केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी