शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

Coronavirus Unlock : बारमधील गर्दी आटली, आता घरातच उघडते बाटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 12:24 IST

Coronavirus Unlock, Hotel, Ratnagirinews लॉकडाऊन काळात बार बंद असताना घरीच बसण्याची सवय लागलेल्या लोकांची पावले आता बारकडे वळत नाहीत. त्याऐवजी आता लोक घरातच बसून मद्यपान करत असल्याचे समोर येत आहे. आता बार सेवेत हजर झाले असले तरी त्यातील गर्दी ५० टक्क्यांहून अधिक घटली आहे.

ठळक मुद्देबारमधील गर्दी आटली, आता घरातच उघडते बाटलीकोरोनामुळे बारमधील गर्दी घटली

मनोज मुळ्येरत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्रावर काही का काही परिणाम झाले. काही व्यवसाय पूर्णपणे बंद झाले तर काही नवीन व्यवसाय उदयास आले. असाच एक बदल झाला तो बारमधील हजेरीवर. लॉकडाऊन काळात बार बंद असताना घरीच बसण्याची सवय लागलेल्या लोकांची पावले आता बारकडे वळत नाहीत. त्याऐवजी आता लोक घरातच बसून मद्यपान करत असल्याचे समोर येत आहे. आता बार सेवेत हजर झाले असले तरी त्यातील गर्दी ५० टक्क्यांहून अधिक घटली आहे.मार्च महिन्यापासून अनेक गोष्टींमध्ये बदल झाले. सुरूवातीच्या काळात कोरोनाची तीव्रता वाढत असताना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला. त्यावेळी बार, वाईन मार्ट बंद झाले. जिकडे-तिकडे याचीच चर्चा अधिक होती.

सोशल मीडियावर मीम्सनी धुमाकूळ घातला होता. बाकी काही नको, किमान वाईन मार्ट तरी सुरू करा, असा मुद्दा अनेक बाजूंनी पुढे आणला गेला. सरकारनेही महसूल बुडतो असे कारण देत वाईन मार्ट सुरू करण्याला परवानगी दिली.अनेक महिने बार बंद असल्याने मद्य पिणाऱ्यांची संख्या घटली नाही, उलट बाहेर गेल्यावर कोरोनाची भीती आहे म्हणून घरातच मद्यपान करणाऱ्यांची संख्या वाढली. आता बार उघडून अनेक दिवस झाले असले, तरी बारमध्ये पहिल्यासारखी गर्दी होत नाही. नेहमी येणारे जवळपास ५० ते ६० टक्के लोक आता बारमध्ये येत नाहीत. कोरोनामुळे लोक घरीच मद्यपान करत असल्याने बारमधील गर्दी घटली असल्याचे अनेक बारमालकांनी सांगितले.नाईलाजाने का होईना..कोरोना दाखल झाल्यापासून बार बंद झाले. बाहेर पडल्यास कोरोनोचा धोका असल्याने अनेक पुरूषांना नाईलाजाने का होईना पण घरातच मद्यपान करण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे बारमध्ये नियमित जाणारेही आता आम्ही घरीच बसतो, असे आवर्जून सांगतात.व्यवसायावर मोठा परिणामएका बारशी निगडीत अनेक पद्धतीचा व्यवसाय चालतो. स्टार्टर म्हणून खाल्ले जाणारे पदार्थ, बारमधील कामगार, जेवण बनवणारे असे अनेकजण त्यावर अवलंबून असतात. मात्र, आता बारमधील गर्दी कमी झाल्यामुळे हे सर्व गणित जुळवायचे कसे, असा प्रश्न आता हॉटेल मालकांसमोर उभा आहे. लोकांची गर्दी कमी होत असल्याने बारचा कोट्यवधींचा व्यवसाय आता खूप कमी होऊ लागला आहे.अहो, घरीच बसाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या कामाखेरीज बाहेर पडू नका, घरातच बसा... या सरकारच्या आवाहनाची खूप खिल्ली उडवली गेली. मंदिरे, वाचनालये उघडण्याआधी वाईन मार्ट सुरू झाल्याने घरीच बसा या वाक्यावर सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल झाले आणि नंतर ते प्रत्यक्षातही आले.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकhotelहॉटेलRatnagiriरत्नागिरी