शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

Teacher recruitment : ..तरीही दुसऱ्या भरतीची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 16:28 IST

रत्नागिरी : शिक्षक भरतीसाठी डिसेंबर २०१७ मध्ये अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) राज्यात घेण्यात आली. २०१९ मध्ये पवित्र प्रणालींतर्गत ...

रत्नागिरी : शिक्षक भरतीसाठी डिसेंबर २०१७ मध्ये अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) राज्यात घेण्यात आली. २०१९ मध्ये पवित्र प्रणालींतर्गत शिक्षण सेवक भरती प्रक्रिया राबविण्यात आली असली तरी अद्याप अर्धवट आहे. मराठी व इंग्रजी माध्यमांची ७०३ शिक्षण सेवक पदासाठी जाहिरात काढण्यात आली होती, पैकी ४०९ पदेच भरण्यात आली आहेत.

पहिल्या भरतीतील पदे भरण्याची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात जिल्ह्यात ७३०६ प्राथमिक शिक्षकांची पदे मंजूर असून, प्रत्यक्ष ६२६३ शिक्षक कार्यरत आहेत. अद्याप १०४३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मराठी माध्यमांची ६८१५ पदे मंजूर असून, ५८७२ पदे भरलेली आहेत; मात्र ९४३ पदे रिक्त आहेत. उर्दू माध्यमांंची ४९१ पदे मंजूर असून, ३९१ पदे भरलेली आहेत, पैकी १०० पदे रिक्त आहेत. वारंवार होणारी जिल्हा बदली, सेवानिवृत्ती यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्तपदांची संख्या वाढतच आहे.

पवित्र प्रणाली अंतर्गत पहिल्या शिक्षणसेवक भरतीतील २९४ पदे अद्याप भरली गेलेली नाहीत. त्यातच येत्या फेब्रुवारीत दुसऱ्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्याचे शासनाने जाहीर केले आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून २०१९ मध्ये पहिली यादी जाहीर झाली. त्यामध्ये मराठी माध्यमाचे ६५९ शिक्षण सेवकांची जाहिरात असताना ४०० शिक्षण सेवक प्राप्त झाले. उर्दू माध्यमांच्या ४४ शिक्षण सेवकांची भरती असताना प्रत्यक्ष नऊच शिक्षण सेवकांची भरती करण्यात आली. या भरतीमध्ये उर्दू माध्यमांसह मराठी माध्यमांतील २९४ पदे रिक्त राहिल्याने रिक्तपदांची आकडेवाडी वाढू लागली आहे.

शासनाने भरतीसाठी दुसरी यादी ऑगस्ट २०१९ रोजी जाहीर करण्याचे जाहीर केले होते; मात्र राज्यभरातील डीएड, बीएडधारकांच्या विरोधामुळे ही यादी जाहीर होण्यास विलंब झाला. उमेदवारांनी न्यायालयाकडे दाद मागितली. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया रेंगाळली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सप्टेंबर २०२१ च्या सुरुवातीला अनुदानित संस्थांवरील शिक्षकांची निवड यादी जाहीर करण्यात आली. राज्यात मुलाखतीसह २ हजार ६२ जागांची निवड यादी लावली. संस्थांनी या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या; मात्र अनेकांना अजूनही निवड पत्रे देण्यात आलेली नाहीत. खासगी संस्थांची यादीही अद्याप जाहीर केलेली नाही.

भरती प्रक्रियेसाठी घेतलेल्या पहिल्या अभियोग्यता परीक्षेला चार वर्षे लोटून गेल्यानंतरही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नसताना सरकारकडून दुसऱ्या चाचणीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. दुसरी अभियोग्यता शिक्षक भरती परीक्षा येत्या फेब्रुवारीमध्ये घेण्याचे नियोजन असल्याबाबत शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. यामुळे यापूर्वी पात्र असलेल्या उमेदवारांत संभ्रम वाढला आहे.

अभियोग्यता चाचणीत जास्त गुण मिळणाऱ्या उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या शाळांवर नोकरी करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये हजार पदे रिक्त आहेत. ती भरणे अपेक्षित आहेत. त्यासाठी पहिल्या टप्प्यातील रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाकडून पाठपुरावा करणे गरजेचे आहे. फेब्रुवारीमध्ये अभियोग्यता परीक्षा जाहीर केली असली तरी रखडलेली भरतीही प्राधान्याने पूर्ण करावी. - संदीप गराटे, अध्यक्ष, कोकण डीएड, बीएड संघटना.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTeacherशिक्षक