शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आरोग्यसेवक भरती परीक्षेत दापोलीत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 20:39 IST

dapolie police parade ground Ratnagirinews- सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी राज्यभर लेखी परीक्षा घेण्यात आली. मात्र, दापोलीतील एन. के. वराडकर बेलोसे कॉलेजला परीक्षेची कोणतीच कल्पना न दिल्याने परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला.

ठळक मुद्देआरोग्यसेवक भरती परीक्षेत दापोलीत गोंधळकेंद्राबाबतची कल्पनाच नसल्याने उशिराने परीक्षेला सुरुवात

दापोली : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी राज्यभर लेखी परीक्षा घेण्यात आली. मात्र, दापोलीतील एन. के. वराडकर बेलोसे कॉलेजला परीक्षेची कोणतीच कल्पना न दिल्याने परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला.

परीक्षा घेणाऱ्या संस्थेने लेखी न कळविल्याने कॉलेजने परीक्षेची कोणतीच तयारी केलेली नसल्याचे कॉलेजकडून सांगण्यात आले. त्यामुळे परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी केंद्राबाहेर संतप्त भावना व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.आरोग्य विभागाच्या विविध पदांकरिता रविवारी जिल्ह्यात लेखी परीक्षा घेण्यात आल्या, या परीक्षेसाठी दापोलीत आर. एन. वैद्य व एन. के. वराडकर कॉलेज अशी दोन परीक्षा केंद्रे जाहीर करण्यात आली होती. दापोलीतील दोन्ही केंद्रांवर तब्बल ८७५ विद्यार्थी महाराष्ट्रातून आले होते. मात्र, एन. के. वराडकर कॉलेजमध्ये परीक्षेची कोणतीच तयार केलेली नसल्याने परीक्षेदरम्यान गोंधळ उडाला.परीक्षेची वेळ १० वाजण्याची देण्यात आली होती. मात्र, सकाळी ९.३० वाजले तरीही परीक्षा केंद्र बंद असल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. या ठिकाणी केंद्राने केवळ एकच सुपरवायझर नेमला होता; तर अन्य कोणी त्या ठिकाणी आले नव्हते; तर दुसरीकडे परीक्षा केंद्रात बेंचवर विद्यार्थ्यांचे क्रमांकही टाकण्यात आलेले नव्हते. त्यामुळे परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ निर्माण झाला.

विद्यार्थी आक्रमक झाल्यानंतर दापोलीचे तहसीलदार सुरेश खोपटकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक हिरेमठ तसेच एन. के. वराडकर कॉलेजचे प्राचार्य सुरेश निंबाळकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तत्काळ रोल नंबर टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. रोल नंबर टाकून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या.अर्धा तास उशीरदापोलीतील आर. एन. वैद्य कॉलेजमध्ये ३३८ तर एन. के. वराडकर कॉलेजमध्ये ५३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेचा पेपर सकाळी १० वाजता सुरू होणार होता. मात्र, गोंधळामुळे परीक्षा १०.३० वाजता सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांना अर्धा तास वाढवून देण्यात आला होता. दापोलीतील दोन्ही केंद्रावर एकाच वेळी परीक्षा सुरू करण्यात आली.अनेकांची परीक्षेकडे पाठआरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात ३७ परीक्षा केंद्र होती. या परीक्षा केंद्रावर १४,५२० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. मात्र, प्रत्यक्षात १४३७ विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली. राजापूर येथील एका केंद्रावर ४८० पैकी ४६ विद्यार्थीच उपस्थित होते. रत्नागिरी तालुक्यातील फणसोप येथील केंद्रावर २१६ पैकी १९, हातखंबा येथील केंद्रावर २८८ पैकी केवळ २५ विद्यार्थी उपस्थित होते. कुवारबाव येथील केंद्र परीक्षार्थ्यांअभावी रद्द करण्यात आले.

 

टॅग्स :police parade groundपोलिस कवायत मैदानRatnagiriरत्नागिरी