शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

helmet compulsory: हेल्मेट वापराबाबत रत्नागिरीकरांमध्ये संभ्रमावस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 17:07 IST

काहींना वाटते हेल्मेट असावे तर काहीजण शहरात हेल्मेट नकाेच, असा सूर आळवत आहेत. नाही वापरला तर पाेलिसांची दंडाची पावती हातात पडतेच.

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील हेल्मेट सक्ती पुण्याच्या धर्तीवर बंद करावी, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले हाेते. त्याचवेळी त्यांनी ४ तारखेपर्यंत परिपत्रक काढले नाही तर रत्नागिरीकरांनी हेल्मेट वापरु नये, अशी सूचनाही केली. मात्र, त्यानंतर रत्नागिरीकरांमय्ये संभ्रमावस्थाच आहे. काहींना वाटते हेल्मेट असावे तर काहीजण शहरात हेल्मेट नकाेच, असा सूर आळवत आहेत. नाही वापरला तर पाेलिसांची दंडाची पावती हातात पडतेच.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दाेन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रत्नागिरी शहरात हेल्मेट सक्ती करू नये, अशी सूचना केली. पुण्याच्या धर्तीवर नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असेही सांगून याबाबतचे परिपत्रक ४ एप्रिलपर्यंत काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर रविवारी अचानक जिल्हाधिकारी यांनी परिपत्रक काढल्याची माहिती साेशल मीडियावर फिरू लागली.हेल्मेट वापरातून रत्नागिरीकरांची सुटका झाल्याच्या आनंदात साेमवारी अनेकजण रस्त्यावर विना हेल्मेट फिरू लागले. पण, त्याचवेळी पाेलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर अशाप्रकारचा काेणताही अध्यादेश काढण्यातच आलेला नसल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केला. त्यामुळे रत्नागिरीकरांमध्ये हेल्मेट वापराबाबत अजूनही संभ्रमावस्थाच आहे.रत्नागिरी शहरात बहुतांशी नागरिक सुरक्षितता म्हणून हेल्मेटचा वापर करतात. याला अपवाद काही राजकीय मंडळी आहेत. ही मंडळी बिनधास्तपणे रस्त्यावर विनाहेल्मेट फिरताना दिसतात. त्यामुळे हेल्मेट वापराची सक्ती नकाे असा सूर आळवण्यात आला. याबाबत काही नागरिकांची मते जाणून घेतली असता, हेल्मेट सुरक्षित असून, ते वापरलेच पाहिजे. असे सांगण्यात आले. तर काहींनी महामार्गावर हेल्मेट आवश्यकच आहे. पण, साळवी स्टाॅप ते पेठकिल्लापर्यंत हेल्मेट सक्ती असू नये असे सांगण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTrafficवाहतूक कोंडी