शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
3
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
4
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
5
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
6
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
7
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
8
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
9
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
10
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
11
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
12
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
13
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
14
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
15
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
16
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
17
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
18
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
19
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
20
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल

जाचक अटींमुळे कोकणातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST

- प्रशासन, पोलिसांकडून नियमांचा केला जातोय बाऊ लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : लॉकडाऊनचे जाचक नियम आणि अटी, ई-पास व ...

- प्रशासन, पोलिसांकडून नियमांचा केला जातोय बाऊ

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : लॉकडाऊनचे जाचक नियम आणि अटी, ई-पास व प्रवाशांच्या कोरोना चाचणीची अट आणि पोलिसांकडून नियम व अटींचा बाऊ करत उगारला जाणारा कारवाईचा बडगा यामुळे गावाकडून मुंबईत जाणाऱ्या ग्रामीण भागातील प्रवाशांची परवड होत आहे. अनेकांना खासगी आरामबसमधून बसचा पास नाही, प्रवाशांचा कोरोना चाचणी अहवाल नाही म्हणून उतरविले जात आहे, तर एस़ टी़ च्या बसमधूनही २२ प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी असल्यास प्रवाशांना रस्त्यात उतरविले जात असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत़

कोरोना संसर्ग आणि त्यानंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर मुंबईकर चाकरमानी गावी आले. कुणी खासगी बसने, तर कुणी खासगी गाड्या करून गावात दाखल झाले. आता १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता येणार असल्याची माहिती मिळताच पुन्हा एकदा चाकरमान्यांनी मुंबईला परतण्याची लगबग सुरू केली आहे. या चाकरमान्यांना सरकारच्या लॉकडाऊनच्या कालावधीत प्रवासी वाहतुकीबाबत घालण्यात आलेल्या जाचक नियम व अटींचा फटका बसत आहे.

खासगी आरामबस चालकांना राजापूर व अन्य भागांतून मुंबईला प्रवासी वाहतूक करायची असेल तर ई-पास, तसेच गाडीतील सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल सोबत ठेवण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे याचा फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसत आहे. शुक्रवारी राजापूर ओणी येथून सुटणाऱ्या अशा दोन खासगी बस चालकांविरोधात राजापूर पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे प्रवाशांना उतरविण्यात आले व रात्री त्यांना घरी पाठविण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाप्रमाणे ही कारवाई होत असल्याचे स्थानिक पोलिसांकडून सांगितले जात आहे. मात्र, अशा अनेक बस मुंबई, पुण्यातून राजरोस प्रवासी वाहतूक करत आहेत, पण कोकणी माणसाला मात्र नियम आणि अटींचा बाऊ करत सरकारकडून त्रास दिला जात असल्याचा आराेप केला जात आहे़

खासगी बस वाहतूक बंद झाल्याने आता प्रवाशांनी एस़ टी़ ला पसंती दिली आहे. मात्र, कोरोना नियम आणि लॉकडाऊनमुळे एस़ टी़ चे ऑनलाईन आरक्षण बंद ठेवण्यात आले आहेत. त्यातच राजापूर आगारातून राजापूर-बोरिवली व राजापूर-नालासोपारा-अर्नाळा या दोन बस सकाळी सोडण्यात येत आहेत़ त्यातही केवळ प्रति बस २२ प्रवाशांचेच बंधन आहे. मात्र, २२ पेक्षा जास्त प्रवासी असले तर पोलिसांकडून त्यांनाही उतरविण्यात येत आहे. रविवारी राजापूर आगारातून अनेक प्रवाशांना गाडी नसल्याने मागे परतावे लागले आहे, तर लांजात राजापूर आगारातील एका मुंबई गाडीत चार ते पाच प्रवासी जास्त असल्याने त्यांना पोलिसांनी लांजात उतरविले़ त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले़