शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

जाचक अटींमुळे कोकणातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST

- प्रशासन, पोलिसांकडून नियमांचा केला जातोय बाऊ लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : लॉकडाऊनचे जाचक नियम आणि अटी, ई-पास व ...

- प्रशासन, पोलिसांकडून नियमांचा केला जातोय बाऊ

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : लॉकडाऊनचे जाचक नियम आणि अटी, ई-पास व प्रवाशांच्या कोरोना चाचणीची अट आणि पोलिसांकडून नियम व अटींचा बाऊ करत उगारला जाणारा कारवाईचा बडगा यामुळे गावाकडून मुंबईत जाणाऱ्या ग्रामीण भागातील प्रवाशांची परवड होत आहे. अनेकांना खासगी आरामबसमधून बसचा पास नाही, प्रवाशांचा कोरोना चाचणी अहवाल नाही म्हणून उतरविले जात आहे, तर एस़ टी़ च्या बसमधूनही २२ प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी असल्यास प्रवाशांना रस्त्यात उतरविले जात असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत़

कोरोना संसर्ग आणि त्यानंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर मुंबईकर चाकरमानी गावी आले. कुणी खासगी बसने, तर कुणी खासगी गाड्या करून गावात दाखल झाले. आता १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता येणार असल्याची माहिती मिळताच पुन्हा एकदा चाकरमान्यांनी मुंबईला परतण्याची लगबग सुरू केली आहे. या चाकरमान्यांना सरकारच्या लॉकडाऊनच्या कालावधीत प्रवासी वाहतुकीबाबत घालण्यात आलेल्या जाचक नियम व अटींचा फटका बसत आहे.

खासगी आरामबस चालकांना राजापूर व अन्य भागांतून मुंबईला प्रवासी वाहतूक करायची असेल तर ई-पास, तसेच गाडीतील सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल सोबत ठेवण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे याचा फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसत आहे. शुक्रवारी राजापूर ओणी येथून सुटणाऱ्या अशा दोन खासगी बस चालकांविरोधात राजापूर पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे प्रवाशांना उतरविण्यात आले व रात्री त्यांना घरी पाठविण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाप्रमाणे ही कारवाई होत असल्याचे स्थानिक पोलिसांकडून सांगितले जात आहे. मात्र, अशा अनेक बस मुंबई, पुण्यातून राजरोस प्रवासी वाहतूक करत आहेत, पण कोकणी माणसाला मात्र नियम आणि अटींचा बाऊ करत सरकारकडून त्रास दिला जात असल्याचा आराेप केला जात आहे़

खासगी बस वाहतूक बंद झाल्याने आता प्रवाशांनी एस़ टी़ ला पसंती दिली आहे. मात्र, कोरोना नियम आणि लॉकडाऊनमुळे एस़ टी़ चे ऑनलाईन आरक्षण बंद ठेवण्यात आले आहेत. त्यातच राजापूर आगारातून राजापूर-बोरिवली व राजापूर-नालासोपारा-अर्नाळा या दोन बस सकाळी सोडण्यात येत आहेत़ त्यातही केवळ प्रति बस २२ प्रवाशांचेच बंधन आहे. मात्र, २२ पेक्षा जास्त प्रवासी असले तर पोलिसांकडून त्यांनाही उतरविण्यात येत आहे. रविवारी राजापूर आगारातून अनेक प्रवाशांना गाडी नसल्याने मागे परतावे लागले आहे, तर लांजात राजापूर आगारातील एका मुंबई गाडीत चार ते पाच प्रवासी जास्त असल्याने त्यांना पोलिसांनी लांजात उतरविले़ त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले़