शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्यासमोर प्रकल्पग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 13:29 IST

घाडगेवाडी व काळंबेवाडी साठी एकच विहीर असून, एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होते. दोन्ही गावठाणांना पुरेल इतका पाणीसाठा त्या विहिरीत शिल्लक राहत नाही. त्यामुळे काळंबेवाडी पुनर्वसन गावठाची नळपाणी पुरवठा योजना करताना काळंबेवाडी साठी स्वतंत्र नवीन विहीर तयार करावी. 

ठळक मुद्दे- काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणाला पाहणीनागरी सुविधा कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करा : बाबासाहेब बेलदार

देवरूख :  संगमेश्वर तालुक्यातील काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणातील नागरी सुविधांची कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करा, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.संगमेश्वर तालुक्यातील गडनदी प्रकल्पबाधीत राजिवली काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणातील भूखंड ताब्यात देऊन त्या ठिकाणी नागरी सुविधा कामे पूर्ण करण्याच्या संदर्भात राजिवली ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष येडगे यांनी शिष्टमंडळासह अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांची भेट घेऊन काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणाची पाहणी करुन प्रकल्पग्रस्तांसोबत बैठक घेण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे बाबासाहेब बेलदार यांनी राजिवली काळंबेवाडी पुनर्वसन गावठाण पाहणी दौरा करुन पाटबंधारे विभागाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. तर एप्रिल अखेरपर्यंत गावठाण अंतर्गत वीजपुरवठा, पाणीपुरवठा आणि अंतर्गत रस्ते, पोहोच रस्ते आदी कामे पूर्ण करुन एप्रिलमध्ये भूखंड ताब्यात देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पुर्वी या कामांचा आढावा घेण्यासाठी मार्च महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार असल्याचे बाबासाहेब बेलदार यावेळी म्हणाले.राजिवली काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणातील समस्या जाणून घेण्यासाठी उपस्थित राहिलेल्या अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्यासमोर प्रकल्पग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडल्या. त्यामध्ये घाडगेवाडी व काळंबेवाडी साठी एकच विहीर असून, एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होते. दोन्ही गावठाणांना पुरेल इतका पाणीसाठा त्या विहिरीत शिल्लक राहत नाही. त्यामुळे काळंबेवाडी पुनर्वसन गावठाची नळपाणी पुरवठा योजना करताना काळंबेवाडी साठी स्वतंत्र नवीन विहीर तयार करावी. 

 

तसेच वादळी वारे, अतिवृष्टी आदी नैसर्गिक कारणांमुळे गडनदी क्षेत्रातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा वारंवार खंडीत होतो. त्याला पर्याय म्हणून गावठाणात सार्वजनिक एक उघडी विहीर बांधून द्यावी. पाण्यासोबतच विजेची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून आलेले अंदापत्रक मंजूर नकाशाप्रमाणे आहे का ते पहावे, काही बदल आवश्यक असल्यास ते तातडीने करुन अंमलबजावणी करावी आणि एप्रिल अखेरपर्यंत वीजपुरवठा सुरु करावा अशा सूचना यावेळी बेलदार यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीwater shortageपाणीकपातRatnagiriरत्नागिरी