शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्यासमोर प्रकल्पग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 13:29 IST

घाडगेवाडी व काळंबेवाडी साठी एकच विहीर असून, एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होते. दोन्ही गावठाणांना पुरेल इतका पाणीसाठा त्या विहिरीत शिल्लक राहत नाही. त्यामुळे काळंबेवाडी पुनर्वसन गावठाची नळपाणी पुरवठा योजना करताना काळंबेवाडी साठी स्वतंत्र नवीन विहीर तयार करावी. 

ठळक मुद्दे- काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणाला पाहणीनागरी सुविधा कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करा : बाबासाहेब बेलदार

देवरूख :  संगमेश्वर तालुक्यातील काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणातील नागरी सुविधांची कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करा, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.संगमेश्वर तालुक्यातील गडनदी प्रकल्पबाधीत राजिवली काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणातील भूखंड ताब्यात देऊन त्या ठिकाणी नागरी सुविधा कामे पूर्ण करण्याच्या संदर्भात राजिवली ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष येडगे यांनी शिष्टमंडळासह अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांची भेट घेऊन काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणाची पाहणी करुन प्रकल्पग्रस्तांसोबत बैठक घेण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे बाबासाहेब बेलदार यांनी राजिवली काळंबेवाडी पुनर्वसन गावठाण पाहणी दौरा करुन पाटबंधारे विभागाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. तर एप्रिल अखेरपर्यंत गावठाण अंतर्गत वीजपुरवठा, पाणीपुरवठा आणि अंतर्गत रस्ते, पोहोच रस्ते आदी कामे पूर्ण करुन एप्रिलमध्ये भूखंड ताब्यात देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पुर्वी या कामांचा आढावा घेण्यासाठी मार्च महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार असल्याचे बाबासाहेब बेलदार यावेळी म्हणाले.राजिवली काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणातील समस्या जाणून घेण्यासाठी उपस्थित राहिलेल्या अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्यासमोर प्रकल्पग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडल्या. त्यामध्ये घाडगेवाडी व काळंबेवाडी साठी एकच विहीर असून, एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होते. दोन्ही गावठाणांना पुरेल इतका पाणीसाठा त्या विहिरीत शिल्लक राहत नाही. त्यामुळे काळंबेवाडी पुनर्वसन गावठाची नळपाणी पुरवठा योजना करताना काळंबेवाडी साठी स्वतंत्र नवीन विहीर तयार करावी. 

 

तसेच वादळी वारे, अतिवृष्टी आदी नैसर्गिक कारणांमुळे गडनदी क्षेत्रातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा वारंवार खंडीत होतो. त्याला पर्याय म्हणून गावठाणात सार्वजनिक एक उघडी विहीर बांधून द्यावी. पाण्यासोबतच विजेची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून आलेले अंदापत्रक मंजूर नकाशाप्रमाणे आहे का ते पहावे, काही बदल आवश्यक असल्यास ते तातडीने करुन अंमलबजावणी करावी आणि एप्रिल अखेरपर्यंत वीजपुरवठा सुरु करावा अशा सूचना यावेळी बेलदार यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीwater shortageपाणीकपातRatnagiriरत्नागिरी