शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

रिफायनरी विरोधी भूमिकेमुळे खासदार विनायक राऊतांविरोधात तक्रार

By अरुण आडिवरेकर | Updated: September 19, 2022 18:49 IST

रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी होण्यासाठी सकारात्मक पाऊल टाकले होते तर स्थानिक आमदारही रिफायनरीसाठी आग्रही आहेत. ...

रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी होण्यासाठी सकारात्मक पाऊल टाकले होते तर स्थानिक आमदारही रिफायनरीसाठी आग्रही आहेत. मात्र, खासदार विनायक राऊत प्रकल्प विरोधी भूमिका घेत असल्याने शिवसैनिकांमध्ये असंतोष पसरला आहे. खासदारांच्या या प्रकल्पविरोधी भूमिकेमुळे राजापुरातील शिवसैनिकांनी थेट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पत्र देऊन तक्रार केली आहे.राजापूर विभागप्रमुख संतोष चव्हाण यांच्यामार्फत हे पत्र देण्यात आले आहे. रत्नागिरी येथील शिवसंवाद यात्रेदरम्यान हे पत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले. नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यानंतर बारसू येथे रिफायनरी प्रकल्प उभारण्याबाबत हालचाली सुरू झाल्या.बारसू येथे रिफायनरी होण्यासाठी जनतेचा वाढता पाठिंबा लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून अनुकूलता दर्शवली होती. पक्षप्रमुखांच्या या भूमिकेनंतर स्थानिक आमदार राजन साळवी यांनीही रिफायनरी प्रकल्प राजापुरात झाला पाहिजे, अशी भूमिका घेतली. त्यासाठी त्यांनी आग्रहही धरला. शिवसेना पक्षप्रमुखांची ही भूमिका असतानाच पक्षाचे खासदार विनायक राऊत प्रकल्पविरोधी भूमिका मांडत आहेत.

त्यांनी विरोधाचा सूर अजून कायम ठेवल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी उमटली आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील भूमिकेमुळे खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात थेट पक्षनेतृत्वाकडेच तक्रार करण्यात आली आहे.

राजापूर उपविभाग प्रमुख संतोष चव्हाण यांच्यामार्फत देण्यात या पत्रावर शिवसेनेच्या सदस्यांपर्यंत आलेल्या या पत्रावर विभागप्रमुखांपासून ग्रामपंचायत शिवसैनिकांच्या सह्या आहेत. ९० टक्के ग्रामस्थांचा विरोध अशी चुकीचे वक्तव्य खासदार विनायक राऊत यांच्याकडून होताना पाहायला मिळत आहे, असे या पत्रात म्हटले आहे. राजापूर तालुक्यातील सव्वाशे गावांचा प्रकल्पाला पाठिंबा आहे. विरोध करणाऱ्या दोन ते चार गावांत विरोधाचा सूर आहे. त्यांना वगळून प्रकल्पाला मुहुर्त स्वरूप देण्यासाठी शिवसेनेने सहकार्य करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.

समज देणार की ?

शिवसैनिकांच्या या पत्राचा पक्षनेतृत्व विचार करणार का, हेच पाहायचे आहे. पक्षाचे नेतृत्व प्रकल्प होण्यासाठी पत्र देतात तर दुसरीकडे पक्षाचेच खासदार विरोधी भूमिका घेत आहेत. त्यामुळे खासदारांना समज देणार का, हेच पाहायचे आहे.

नोकरीची संधी

तरुणपिढीतील मूल ही नोकरीधंद्याच्या शोधात पुणे, मुंबईला जातात. हा महाकाय प्रकल्प राजापूरला झाला तर स्थानिकांना नोकरीच्या संधी नक्कीच उपलब्ध होतील, अशी भावना या पत्रातून व्यक्त केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीVinayak Rautविनायक राऊत