शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
5
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
6
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
8
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
9
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
10
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
11
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
12
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
13
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
14
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
15
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
16
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
17
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
18
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
19
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
20
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

रिफायनरी विरोधी भूमिकेमुळे खासदार विनायक राऊतांविरोधात तक्रार

By अरुण आडिवरेकर | Updated: September 19, 2022 18:49 IST

रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी होण्यासाठी सकारात्मक पाऊल टाकले होते तर स्थानिक आमदारही रिफायनरीसाठी आग्रही आहेत. ...

रत्नागिरी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी होण्यासाठी सकारात्मक पाऊल टाकले होते तर स्थानिक आमदारही रिफायनरीसाठी आग्रही आहेत. मात्र, खासदार विनायक राऊत प्रकल्प विरोधी भूमिका घेत असल्याने शिवसैनिकांमध्ये असंतोष पसरला आहे. खासदारांच्या या प्रकल्पविरोधी भूमिकेमुळे राजापुरातील शिवसैनिकांनी थेट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पत्र देऊन तक्रार केली आहे.राजापूर विभागप्रमुख संतोष चव्हाण यांच्यामार्फत हे पत्र देण्यात आले आहे. रत्नागिरी येथील शिवसंवाद यात्रेदरम्यान हे पत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले. नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यानंतर बारसू येथे रिफायनरी प्रकल्प उभारण्याबाबत हालचाली सुरू झाल्या.बारसू येथे रिफायनरी होण्यासाठी जनतेचा वाढता पाठिंबा लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून अनुकूलता दर्शवली होती. पक्षप्रमुखांच्या या भूमिकेनंतर स्थानिक आमदार राजन साळवी यांनीही रिफायनरी प्रकल्प राजापुरात झाला पाहिजे, अशी भूमिका घेतली. त्यासाठी त्यांनी आग्रहही धरला. शिवसेना पक्षप्रमुखांची ही भूमिका असतानाच पक्षाचे खासदार विनायक राऊत प्रकल्पविरोधी भूमिका मांडत आहेत.

त्यांनी विरोधाचा सूर अजून कायम ठेवल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी उमटली आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातील भूमिकेमुळे खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात थेट पक्षनेतृत्वाकडेच तक्रार करण्यात आली आहे.

राजापूर उपविभाग प्रमुख संतोष चव्हाण यांच्यामार्फत देण्यात या पत्रावर शिवसेनेच्या सदस्यांपर्यंत आलेल्या या पत्रावर विभागप्रमुखांपासून ग्रामपंचायत शिवसैनिकांच्या सह्या आहेत. ९० टक्के ग्रामस्थांचा विरोध अशी चुकीचे वक्तव्य खासदार विनायक राऊत यांच्याकडून होताना पाहायला मिळत आहे, असे या पत्रात म्हटले आहे. राजापूर तालुक्यातील सव्वाशे गावांचा प्रकल्पाला पाठिंबा आहे. विरोध करणाऱ्या दोन ते चार गावांत विरोधाचा सूर आहे. त्यांना वगळून प्रकल्पाला मुहुर्त स्वरूप देण्यासाठी शिवसेनेने सहकार्य करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.

समज देणार की ?

शिवसैनिकांच्या या पत्राचा पक्षनेतृत्व विचार करणार का, हेच पाहायचे आहे. पक्षाचे नेतृत्व प्रकल्प होण्यासाठी पत्र देतात तर दुसरीकडे पक्षाचेच खासदार विरोधी भूमिका घेत आहेत. त्यामुळे खासदारांना समज देणार का, हेच पाहायचे आहे.

नोकरीची संधी

तरुणपिढीतील मूल ही नोकरीधंद्याच्या शोधात पुणे, मुंबईला जातात. हा महाकाय प्रकल्प राजापूरला झाला तर स्थानिकांना नोकरीच्या संधी नक्कीच उपलब्ध होतील, अशी भावना या पत्रातून व्यक्त केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीVinayak Rautविनायक राऊत