शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

चिपळुणातील खैरतोडप्रकरणी कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 15:27 IST

कळंबस्ते येथील रिक्त पदाअभावी बंद पडलेले (हॅचरिज) अंडी उबवणूक केंद्र भाडेतत्त्वावर द्यावे, अशी मागणी सभापती पूजा निकम यांनी बैठकीत केली. कळंबस्ते पशुसंवर्धन कार्यालय खैरतोड प्रकरणात डॉ. संतोष निमुणकर दोषी आहेत. त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव पशुसंवर्धन आयुक्तांकडे दिल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुजारी यांनी संयुक्त बैठकीत सांगितले.

ठळक मुद्देचिपळुणातील खैरतोडप्रकरणी कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडेपशुसंवर्धन अधिकारी व पंचायत समिती सदस्यांची संयुक्त बैठक

चिपळूण : कळंबस्ते येथील रिक्त पदाअभावी बंद पडलेले (हॅचरिज) अंडी उबवणूक केंद्र भाडेतत्त्वावर द्यावे, अशी मागणी सभापती पूजा निकम यांनी बैठकीत केली. कळंबस्ते पशुसंवर्धन कार्यालय खैरतोड प्रकरणात डॉ. संतोष निमुणकर दोषी आहेत. त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव पशुसंवर्धन आयुक्तांकडे दिल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुजारी यांनी संयुक्त बैठकीत सांगितले.खैरतोड व पशुसंवर्धन विभागातील समस्यांविषयी पशुसंवर्धन अधिकारी व पंचायत समिती सदस्यांची संयुक्त बैठक झाली. गटनेते राकेश शिंदे यांनी खैरतोड प्रकरणाची माहिती दिली. यावेळी डॉ. पुजारी म्हणाले की, पंचायत समितीचा चौकशी अहवाल मिळाल्यावर डॉ. निमुणकर यांना कारणे दाखवा नोटीस दिली.

निमुणकर यांनी दिलेला खुलासा अमान्य केला. त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होणार नाही. यामध्ये कारवाईचे अधिकार जिल्हा परिषदेला नाहीत. डॉ. निमुणकर यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव चार दिवसांपूर्वीच पशुसंवर्धन कार्यालयाला पाठवला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.यावेळी पशुसंवर्धन कार्यालय आवारात अनेक धोकादायक झाडे आहेत. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्त समिती स्थापण्याचे ठरले. त्यामध्ये पशुसंवर्धन अधिकाऱ्यांसह राकेश शिंदे व नितीन ठसाळे यांचा समावेश केला. ही समिती सर्वेक्षण केल्यानंतर लिलाव प्रक्रिया राबवणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

यावेळी उपसभापती शरद शिगवण, सदस्य विश्वनाथ साळवी, नितीन ठसाळे, सुनील तटकरे, रिया कांबळी, नंदू शिर्के, दीपाली पवार, प्रकाश कानसे, डॉ. संतोष निमुणकर, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी मयेकर, उपायुक्त डॉ. झनकर आदी उपस्थित होते.रिक्त पदांची जंत्रीयावेळी सभापती निकम म्हणाल्या की, पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. अंडी उबवणूक केंद्रही बंद आहे. ते भाडेतत्त्वावर दिल्यास शासनाला महसूल मिळेल. यातून शेतकऱ्यांचीही गैरसोय दूर होईल. तसा ठराव पंचायत समितीकडून देऊ, असे सांगितले.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीRatnagiriरत्नागिरी