शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

दिलासा! कोरोना रुग्ण कमी होत आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होऊ लागली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक झाल्याने जिल्ह्याला ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होऊ लागली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक झाल्याने जिल्ह्याला चांगलाच दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात ६९४ रुग्णांनी दिवसभरात कोरोनावर मात केल्याने, एकूण ६४,५१५ रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी केवळ १५६ बाधित रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ६९,११५ झाली आहे. कोरोनाने ४ रुग्णांचा बळी घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १,९७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या असूनही बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाल्याने ही समाधानकारक बाब आहे. जिल्हाभरात ७,७१४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील आरटीपीसीआर चाचणीत ५७ आणि अँटिजन चाचणीत ९९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये मंडणगड, लांजा तालुक्यातील रुग्ण कमी झाले असून, अनुक्रमे १ आणि ३ रुग्ण सापडले आहेत. दापोली तालुक्यात १३, खेडमध्ये २०, चिपळूणात ३७, संगमेश्वरमध्ये १०, रत्नागिरीत ५६ आणि गुहागर, राजापुरात प्रत्येकी ९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात २७७ कोरोनाबाधित ऑक्सिजनवर आहेत.

जिल्ह्यात लक्षणे नसलेले १,९९६ रुग्ण तर लक्षणे असलेले ६४८ अशा एकूण २,६४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९३.३४ टक्के असून, मृत्यूदर २.८५ टक्के आहे. मृतांमध्ये गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये ५० पेक्षा जास्त वयोगटातील १,६४६ जण आणि सहव्याधी असलेले ७३१ रुग्ण आहेत.