शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

गृह अलगीकरणाबाबत जिल्हाधिकारी यांनी कडक केले निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:30 IST

रत्नागिरी : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेउन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी गृह अलगीकरणाबाबत कडक निर्बंध लागू केले असून, अत्यावश्यक ...

रत्नागिरी : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेउन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी गृह अलगीकरणाबाबत कडक निर्बंध लागू केले असून, अत्यावश्यक आस्थापना, कार्यालये वगळता इतर कार्यांलये तसेच आस्थापनांमध्ये मर्यादित संख्या ठरवून दिली आहे. बुघवारी सायंकाळी हे आदेश निर्गमित करण्यात आले.

जिल्ह्यात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शिमगोत्सव सुरू झाल्याने आता संसर्ग अधिक वाढण्याचा धोका आहे, हे लक्षात घेऊन गृह अलगीकरणात असलेल्या रुग्ण आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तींसाठी कडक नियम घालून दिले आहेत. त्यानुसार गृह अलगीकरण झालेले नागरिक, रुग्ण याविषयीची माहिती संबंधित स्थानिक प्राधिकरण यांना कळविणे, तसेच ही व्यक्‍ती कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकांच्या (डॉक्टर) देखरेखीखाली आहे याचीदेखील माहिती स्थानिक प्रशासनाला देणे बंधनकारक राहील. रुग्ण असलेल्या ठिकाणी सुरवातीच्या दिवसापासून १४ दिवसांपर्यंत प्रवेशद्वारावर किंवा दर्शनी ठिकाणी फलक लावावा. कोविड पाॅझिटिव्ह रुग्णांना गृह अलगीकरण (home quaraintine) असा शिक्का मारणे. हा रुग्ण गृह अलगीकरण केलेल्या ठिकाणी संबंधित कुटुंबातील व्यक्‍तींनी घराबाहेर कमीत कमी संपर्क ठेवून शक्य तितक्‍या मर्यादित हात्रचाली कराव्यात तसेच मास्क परिधान केल्याशिवाय इतरत्र वावर करू नये. गृह अलगीकरणाबाबतच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास असा रुग्ण किंवा अलगीकरण झालेले नागरिक यांना स्थानिक प्रशासनाने सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरित केले जाईल.

सवे कार्यालये - आस्थापना ( आरोग्य व इतर अत्यावश्यक आस्थापना वगळता) ५० टक्के क्षमतेच्या अधीन राहून सुरू राहतील. घरातून काम (home work) करण्याबाबत प्रोत्साहित करणे. सर्व धार्मिक ठिकाणच्या व्यवस्थापन करणाऱ्या विश्‍वस्त यांनी संबंधित धार्मिक ठिकाणच्या परिसरामध्ये उपलब्ध असणारी जागा आणि पुरेशे सामाजिक अंतर राखले जाइल, ही दक्षता घ्यावी. तसेच कारोनाच्या आनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने मास्क, सॅनिटायझर, थर्मल गन आदींचे पालन करण्यात यावे. मास्कचा योग्य वापर तसेच सामाजिक अंतराबाबत अंमलबजावणीकरिता संबंधित आस्थापनांनी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत संबंधित, जागामालक, आस्थापना, आयोजक यांना दंड आकारला जाईल.

पाॅईंटर

* सिनेमागृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल यामध्ये ५० टक्के संख्येची मर्यादा पाळावी.

* कोणतेही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक मेळावे आयोजित करता येणार नाहीत. असे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधित जागा आस्थापना मालकाकडून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत दंड वसूल केला जाईल.

* लग्न समारंभात ५०पेक्षा जास्त लोकांना परवानगी असणार नाही. त्याकरिता संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची पूर्व परवानगी आवश्यक राहील.

* अंतिम संस्कारासाठी २०पेक्षा जास्त लोक उपस्थित राहण्यास मनाई राहील. याबाबतची दक्षता ग्राम कृती दल, नागरी कृती दल यांनी घ्यावयाची आहे.