शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

नागरिकांच्या विरोधानंतरही राजापुरातील हातिवले टोलनाक्यावर वसुली सुरू, चाकरमान्यांच्या खिशाला कात्री लागणार 

By अरुण आडिवरेकर | Updated: April 11, 2023 16:53 IST

मंत्री गडकरी यांनी टोल सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले

राजापूर : नागरिकांच्या विराेधानंतरही मुंबई-गोवा महामार्गावरीलरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सीमेवरील हातिवले (ता. राजापूर) येथील टोलनाका मंगळवार (११ एप्रिल)पासून सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने या टाेलवसुलीला परवानगी दिल्याने सकाळपासूनच टाेल वसुलीला सुरूवात झाली. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि सुट्टीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.हातिवले टोलनाक्यावर वसुलीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. याठिकाणी सिग्नल यंत्रणाही बसवण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आणि स्थानिकांनी विरोध करत टोलनाका सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पडला होता. महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलवसुली करून देणार नाही, अशी भूमिका सर्वपक्षीय राजकीय नेते व नागरिकांनी घेतली होती. त्यानंतर टाेलवसुलीचा प्रश्न काहीसा मागे पडला हाेता. मात्र, मंगळवारी अचानक हातिवेले येथील टाेलनाक्यावर टोलवसुली सुरु करण्यात आली आहे.केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला हाेता. यावेळी त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणीही केली हाेती. त्यानंतर झालेल्या बैठकीत मंत्री गडकरी यांनी टोल सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले हाेते. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने आम्हाला टोल सुरू करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसारच आम्ही टोल वसुलीला सुरुवात केलेली आहे, अशी माहिती टोल कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गtollplazaटोलनाका