शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

नागरिकांच्या विरोधानंतरही राजापुरातील हातिवले टोलनाक्यावर वसुली सुरू, चाकरमान्यांच्या खिशाला कात्री लागणार 

By अरुण आडिवरेकर | Updated: April 11, 2023 16:53 IST

मंत्री गडकरी यांनी टोल सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले

राजापूर : नागरिकांच्या विराेधानंतरही मुंबई-गोवा महामार्गावरीलरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सीमेवरील हातिवले (ता. राजापूर) येथील टोलनाका मंगळवार (११ एप्रिल)पासून सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने या टाेलवसुलीला परवानगी दिल्याने सकाळपासूनच टाेल वसुलीला सुरूवात झाली. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि सुट्टीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.हातिवले टोलनाक्यावर वसुलीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. याठिकाणी सिग्नल यंत्रणाही बसवण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आणि स्थानिकांनी विरोध करत टोलनाका सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पडला होता. महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलवसुली करून देणार नाही, अशी भूमिका सर्वपक्षीय राजकीय नेते व नागरिकांनी घेतली होती. त्यानंतर टाेलवसुलीचा प्रश्न काहीसा मागे पडला हाेता. मात्र, मंगळवारी अचानक हातिवेले येथील टाेलनाक्यावर टोलवसुली सुरु करण्यात आली आहे.केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला हाेता. यावेळी त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणीही केली हाेती. त्यानंतर झालेल्या बैठकीत मंत्री गडकरी यांनी टोल सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले हाेते. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने आम्हाला टोल सुरू करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसारच आम्ही टोल वसुलीला सुरुवात केलेली आहे, अशी माहिती टोल कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गtollplazaटोलनाका