शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

अंत्योदयच्या धान्य वितरणाला कात्री, रत्नागिरी जिल्ह्यात संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 16:12 IST

दोन माणसे असतील तर दहा किलो धान्य आणि तीन किंवा जास्त माणसे असतील तर ३५ किलो धान्य असा अजब निकष सध्या सरकारने लावला आहे. त्यामुळे अंत्योदय योजनेबाबत सध्या रत्नागिरी जिल्ह्यात संभ्रमाचे चित्र निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात सुमारे ४० हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक ३५ किलो धान्याला कात्री लागणार असल्याने नाराजी

रत्नागिरी , दि. २८ :  दोन माणसे असतील तर दहा किलो धान्य आणि तीन किंवा जास्त माणसे असतील तर ३५ किलो धान्य असा अजब निकष सध्या सरकारने लावला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अंत्योदय योजनेबाबत संभ्रमाचे चित्र निर्माण झाले आहे.

नव्या अध्यादेशामुळे अंत्योदय योजनेचा लाभ घेणाऱ्या पण घरात दोनच माणसे असलेल्या लोकांचे खूप मोठे नुकसान होणार आहे. प्राधान्य गटातील लोकांना मात्र सरकारने दिलासा दिला असून, त्यातील ज्या लोकांच्या शिधापत्रिकेवर पाच किंवा अधिक माणसे असतील त्यांना कमी दरात धान्य मिळणार आहे.

जिल्ह्यात सुमारे ४० हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक आहेत. सध्या अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रतिकार्ड ३५ किलो धान्य मिळत आहे. यात २० किलो तांदूळ, तर १५ किलो गहू याचा समावेश आहे.

तसेच हे धान्य कमी दरात दिले जात आहे, तर अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या प्राधान्य गटातील व्यक्तिंना प्रतिमाणशी पाच किलो धान्य मिळत आहे. दारिद्र्यरेषेखालील व्यक्तिंसाठी धान्याचा दर कमी असून, प्राधान्य गटासाठी अधिक आहे.

मात्र, आता शासनाने पुन्हा सुधारित अध्यादेश नुकताच काढला आहे. त्यानुसार अंत्योदयसाठी असलेल्या शिधापत्रिकेवर तीन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती असल्या तरच त्यांना ३५ किलो धान्य द्यावे. मात्र, एक किंवा दोन व्यक्ती असल्यास त्यांना प्राधान्य गटाप्रमाणे प्रतिमाणशी पाच किलो धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आदिवासी कुटुंबांच्या नियतनात कुठलाही बदल करण्यात येणार नाही

अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांच्या या निर्णयामुळे ज्या शिधापत्रिकेवर तीन व्यक्ती असल्या तरी त्यांना ३५ किलो धान्य मिळणार आहे. पण, दोनच व्यक्ती असतील, तर त्यांना केवळ दहा किलो धान्य मिळणार आहे. त्यामुळे हे धान्य कसे काय पुरणार, असा सवाल केला जात आहे.

या निर्णयाने प्राधान्य गटातील पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती असलेल्या कुटुंबांचा समावेश अंत्योदयमध्ये करण्यात येणार असल्याचा निर्णय शासनाने या अध्यादेशाद्वारे जाहीर केला असल्याने या निर्णयाचा फायदा अशा प्राधान्य कुटुंबांना मिळणार आहे. या कुटुंबांना सरसकट ३५ किलो धान्य अंत्योदयप्रमाणे कमी दरात मिळणार आहे.

याबाबतचा अध्यादेश सरकारने काढला असून, याप्रमाणे शिधापत्रिका देण्यात याव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र, नव्या शासननिर्णयानुसार अंत्योदय गटातील कुटुंबातील एक किंवा दोनच व्यक्ती असलेल्या कुटुंबाची शिधापत्रिका तसेच प्राधान्य गटातील पाच किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असलेल्या शिधापत्रिका या दुकानदारांना संकलित करून मग त्यानंतर त्यांना नवीन शिधापत्रिका द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे निर्णय झाला असला तरी त्याच्या अंमलबजावणीसाठी बराच काळ जाण्याची शक्यता आहे.अंत्योदय शिधापत्रिकाधारकांबाबत शासनाने नवीन अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. त्यात या शिधापत्रिकेवर एक किंवा दोन व्यक्ती असतील तर त्यांना प्राधान्य गटाप्रमाणे प्रतिमाणशी पाच किलो धान्य मिळणार आहे. मात्र, तीन व्यक्ती असल्या तर त्यांना मात्र ३५ किलो धान्य मिळणार आहे. या निर्णयामुळे एक किंवा दोन व्यक्ती असलेल्या कुटुंबांच्या आधीच्या ३५ किलो धान्याला कात्री लागणार असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :konkanकोकणtalukaतालुका