शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

रत्नागिरी, सिंधुदुर्गात नागरी संरक्षण दल केंद्र कार्यान्वित होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 18:55 IST

नागरी संरक्षण दलाच्या केंद्रीय विभागाने मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग असे पाच जिल्हे नैसर्गिक आपत्तीग्रस्त जिल्हे म्हणून २०११ साली जाहीर केले होते.

रत्नागिरी : कोकणात नागरी संरक्षण दल केंद्र सोमवारपासून सुरू करणार असल्याचे स्पष्टीकरण सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयात दिले आहे. संरक्षण दल केंद्र स्थापनेबाबत शरद राऊळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात ॲड. राकेश भाटकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेला मोठे यश आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर शासनाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत गुरुवारी (७ जुलै) सुनावणी झाली हाेती.राज्याच्या गृह विभागाकडून कोणताही निर्णय न घेतल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने गृहखात्याच्या मुख्य सचिवांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची, तसेच राज्याच्या गृह खात्याच्या मुख्य सचिवांना तारखेला स्वतः न्यायालयात उपस्थित राहण्याचेही निर्देश दिले हाेते. त्यानंतर तत्काळ निर्णय घेत येत्या सोमवारपासून म्हणजेच १८ जुलैपासून नागरी संरक्षण दल केंद्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.नागरी संरक्षण दलाच्या केंद्रीय विभागाने मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग असे पाच जिल्हे नैसर्गिक आपत्तीग्रस्त जिल्हे म्हणून २०११ साली जाहीर केले होते. त्या अनुषंगाने या पाच जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण दलाचे केंद्र असावे, अशी शिफारस केंद्रीय मंडळाकडून त्यावेळी करण्यात आली होती. त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचीही तरतूद करण्यात आली होती.त्यानंतर सन २०१५ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्र स्थापनेसाठी जागा दिली होती, तसेच कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रियाही राबवली होती; परंतु राज्य शासनाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या केंद्राची स्थापना केली नव्हती. २०१६ पासून निर्णयासाठीच प्रकरण प्रलंबित आहे. आतापर्यंत नागरी संरक्षण दलाच्या केंद्राची रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये स्थापना न झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. मेनन व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली हाेती. आता हे केंद्र सुरु हाेणार असल्याने मदत लवकर मिळेल.

अवधी देणे टाळलेरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नागरी संरक्षण दलाचे केंद्र स्थापनेसाठी शासनाला वेळोवेळी अवधी देण्यात आला हाेता; पण दिरंगाई करणाऱ्या शासनाला जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केंद्र स्थापनेबाबत निर्णय घेण्यासंदर्भात अधिक मुदतीचा अर्ज मुदत वाढवून न देता निकाली काढला आहे. मे २०२२ पर्यंत दिलेल्या अवधीत नागरी संरक्षण दल केंद्र स्थापनेसाठी कोणतीही प्रक्रिया न झाल्याने शासनाला आता अधिक अवधी देणे टाळले होते.

रत्नागिरीत दाेन दिवसापूर्वीच कार्यालय सुरुअखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यासाठी नागरी संरक्षण दल स्थापन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या दलाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आपत्ती काळात या दलाची मदत होणार आहे. गृहविभागाने तत्काळ निर्णय घेत १८ जुलैपासून नागरी संरक्षण दल केंद्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार रत्नागिरीत  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशासकीय इमारतीत दोन दिवसांपूर्वी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

रत्नागिरीत नागरी संरक्षण दलाचे कार्यालय सुरू झाले आहे. या केंद्रामार्फत आपत्तीसंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार असून लवकरच त्याची सुरुवात होणार आहे. त्याचे नियोजन करण्यात येणार आहे. - डाॅ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी