शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 12:57 IST

Rain Rajapur Ratnagiri : बुधवारी दुपारपासून संततधारेने कोसळणाऱ्या पावसामुळे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जवाहर चौकात पुराचे पाणी भरले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देजवाहर चौकात पुराचे पाणी तालुक्यात पावसाची संततधार

राजापूर : बुधवारी दुपारपासून संततधारेने कोसळणाऱ्या पावसामुळे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जवाहर चौकात पुराचे पाणी भरले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.गेल्या आठवड्यात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मात्र, त्यावेळी राजापूर तालुक्यात पावसाने उसंत घेतली होती. काही ठिकाणी पावसामुळे किरकोळ पडझडीच्या घटना घडल्या होत्या. राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत थोडीशी वाढ झाली होती. मात्र, बुधवारी सकाळपासून पावसाने जोर धरत दुपारनंतर जोरदारपणे पडलायला सुरुवात केली आहे.बुधवारी सायंकाळी कोदवली व अर्जुना नदीच्या पाणीपातळीत मोठ्याप्रमाणावर वाढ झाली होती. रात्रभर पावसाने उसंत न घेतल्याने मध्यरात्री राजापूर शहरातील जवाहर चौकात पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे नदीशेजारील काही दुकानांमध्ये पाणी भरले आहे. शहरात पुराची शक्यता असल्यामुळे बुधवारी सायंकाळीच बाजारपेठेतील अनेक व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षितस्थळी हलवला होता.मुसळधार पावसामुळे शहरातील चिंचबांध रस्ता, गुजराळी रस्ता, शिवाजीपथ रस्ता पाण्याखाली गेला आहे. मध्यरात्री राजापूर शहरातील जवाहर चौकात स्तंभापर्यंत पाणी भरले होते. सकाळीही पावसाचा जोर कायम राहिल्याने अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी