शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : भाजी व्यावसायिकांविरोधात हटाव मोहीम, चिपळुणात भाजी व्यावसायिकांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 19:26 IST

चिपळूण येथील नगर परिषद प्रशासनाने शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण व रस्त्यावर बसणाऱ्या भाजी व्यावसायिकांविरोधात हटाव मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भाजी व्यावसायिकांनी निषेधार्थ दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देचिपळुणात भाजी व्यावसायिकांचा बंदलाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या भाजी मंडई इमारतीची रचना चुकीच्या पद्धतीने निषेधार्थ दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय

चिपळूण : येथील नगर परिषद प्रशासनाने शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण व रस्त्यावर बसणाऱ्या भाजी व्यावसायिकांविरोधात हटाव मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भाजी व्यावसायिकांनी निषेधार्थ दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत न्याय न मिळाल्यास भाजी व्यवसाय कायमस्वरुपी बंद ठेवण्यात येणार आहे. आज सकाळपासून व्यावसायिकांनी ठिय्या मांडला आहे.नगर परिषदेने गेली अनेक वर्षे भाजी व्यावसायिकांची दिशाभूल करुन अन्याय केला आहे. भाजी मंडईच्या पुढील बाजूला शॉपिंग मॉल व मागील बाजूस भाजी व्यावसायिकांना गाळ्यांची व्यवस्था केल्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे, अशी महिती भाजी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुधीर शिंदे यांनी दिली.

शहरातील पूजा थिएटर येथे भाजी व्यावसायिकांची पत्रकार परिषद झाली. यावेळी श्रीरंग माजलेकर, प्रदीप आंब्रे, मारुती करंजकर, दत्तू वाळुंज, गणेश खंडझोडे, एकनाथ भालेकर, राजासाहेब तांबे, आरीफ बागवान यांच्यासह २५० ते ३०० भाजी विक्रेते उपस्थित होते.पूर्वीपासून भाजी व्यावसायिक येथे व्यवसाय करत आहेत. त्यांना हटविण्यात आल्यास त्यांनी करायचे काय? त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण होईल. अगोदर भाजी व्यापाऱ्यांना जागा देऊन त्यांची व्यवस्था करावी. १९७९ साली भाजी मंडईचे उद्घाटन झाले. त्यावेळी ३७ गाळे होते. १९८५मध्ये इंदिरा सुपर भाजी मंडई या नावाने दुसरी भाजी मंडई तयार करण्यात आली. तेव्हापासून भाजी मंडईच्या बाहेर त्यावेळी ५ रुपये प्रतिदिन जागा भाडे होते.

भाजी विक्रेत्यांची संख्या हळूहळू वाढली. नगर परिषद प्रशासनाने लाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या भाजी मंडई इमारतीची रचना चुकीच्या पद्धतीने केली आहे. ही भाजी मंडई नसून कोंबड्यांचा खुराडा आहे. सध्या भाजी मंडई गाळ्यांची लिलाव प्रक्रिया सुरु आहे. त्यातच सोमवारी अतिक्रमण हटाव मोहीम नगर परिषदेने हाती घेतली असून, या पार्श्वभूमीवर शहरातील बहादूरशेख नाक्यापासून ते मच्छीमार्केटपर्यंत असणाऱ्या भाजी व्यावसायिकांनी एकत्र येऊन दोन दिवस भाजी व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMarketबाजारMuncipal Corporationनगर पालिका