शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

रत्नागिरी : भाजी व्यावसायिकांविरोधात हटाव मोहीम, चिपळुणात भाजी व्यावसायिकांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 19:26 IST

चिपळूण येथील नगर परिषद प्रशासनाने शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण व रस्त्यावर बसणाऱ्या भाजी व्यावसायिकांविरोधात हटाव मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भाजी व्यावसायिकांनी निषेधार्थ दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देचिपळुणात भाजी व्यावसायिकांचा बंदलाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या भाजी मंडई इमारतीची रचना चुकीच्या पद्धतीने निषेधार्थ दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय

चिपळूण : येथील नगर परिषद प्रशासनाने शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण व रस्त्यावर बसणाऱ्या भाजी व्यावसायिकांविरोधात हटाव मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भाजी व्यावसायिकांनी निषेधार्थ दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत न्याय न मिळाल्यास भाजी व्यवसाय कायमस्वरुपी बंद ठेवण्यात येणार आहे. आज सकाळपासून व्यावसायिकांनी ठिय्या मांडला आहे.नगर परिषदेने गेली अनेक वर्षे भाजी व्यावसायिकांची दिशाभूल करुन अन्याय केला आहे. भाजी मंडईच्या पुढील बाजूला शॉपिंग मॉल व मागील बाजूस भाजी व्यावसायिकांना गाळ्यांची व्यवस्था केल्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे, अशी महिती भाजी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुधीर शिंदे यांनी दिली.

शहरातील पूजा थिएटर येथे भाजी व्यावसायिकांची पत्रकार परिषद झाली. यावेळी श्रीरंग माजलेकर, प्रदीप आंब्रे, मारुती करंजकर, दत्तू वाळुंज, गणेश खंडझोडे, एकनाथ भालेकर, राजासाहेब तांबे, आरीफ बागवान यांच्यासह २५० ते ३०० भाजी विक्रेते उपस्थित होते.पूर्वीपासून भाजी व्यावसायिक येथे व्यवसाय करत आहेत. त्यांना हटविण्यात आल्यास त्यांनी करायचे काय? त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण होईल. अगोदर भाजी व्यापाऱ्यांना जागा देऊन त्यांची व्यवस्था करावी. १९७९ साली भाजी मंडईचे उद्घाटन झाले. त्यावेळी ३७ गाळे होते. १९८५मध्ये इंदिरा सुपर भाजी मंडई या नावाने दुसरी भाजी मंडई तयार करण्यात आली. तेव्हापासून भाजी मंडईच्या बाहेर त्यावेळी ५ रुपये प्रतिदिन जागा भाडे होते.

भाजी विक्रेत्यांची संख्या हळूहळू वाढली. नगर परिषद प्रशासनाने लाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या भाजी मंडई इमारतीची रचना चुकीच्या पद्धतीने केली आहे. ही भाजी मंडई नसून कोंबड्यांचा खुराडा आहे. सध्या भाजी मंडई गाळ्यांची लिलाव प्रक्रिया सुरु आहे. त्यातच सोमवारी अतिक्रमण हटाव मोहीम नगर परिषदेने हाती घेतली असून, या पार्श्वभूमीवर शहरातील बहादूरशेख नाक्यापासून ते मच्छीमार्केटपर्यंत असणाऱ्या भाजी व्यावसायिकांनी एकत्र येऊन दोन दिवस भाजी व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMarketबाजारMuncipal Corporationनगर पालिका