शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
3
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
4
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
5
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
6
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
7
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
8
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
9
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
10
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
11
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
12
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
13
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
14
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
15
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
16
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
17
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
18
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
19
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
20
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?

हिवाळी अधिवेशनात चिपळूणचा आवाज घुमला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 17:44 IST

आमदार शेखर निकम व आमदार भास्कर जाधव यांनी हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी करून चिपळूणवासीयांच्या भावना विधिमंडळात व्यक्त केल्या.

चिपळूण : कोकण सगळ्यांनाच आवडतो, मात्र कोकणचा एखादा प्रश्न सोडवायचा असेल अथवा निधी द्यायचा असेल तर थोडेसे हात आखडते घेतले जातात. कोकणाने तुमच्याकडे आजपर्यंत काही मागितले नाही. ७०० ते ८०० कोटी रुपये मोठी रक्कम नाही. सगळेच आश्वासने देतात. कोकणाच्या तोंडाला नेहमीच पाने पुसली जातात.

चिपळुणातील नद्यांमधील तातडीने गाळ व बेटे काढण्यासाठी १७० कोटी रुपयांचा निधी मंजूर व्हावा, तर ही कामे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत झाली पाहिजेत, अशी मागणी आमदार शेखर निकम व आमदार भास्कर जाधव यांनी हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी करून चिपळूणवासीयांच्या भावना विधिमंडळात व्यक्त केल्या.

गेल्या १७ दिवसांपासून चिपळूण बचाव समितीने वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ काढावा व पूररेषा रद्द करावी, या मागणीसाठी येथील प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. शासनाने उपोषणाची दखल घेतली. मात्र, तितकेसे निष्पन्न झालेले नाही. यामुळे चिपळूण बचाव समितीने साखळी उपोषण सुरूच ठेवून भीख मांगो आंदोलन, मूक मोर्चा काढला, तर बुधवारी चिपळूण बंदची हाक दिली. त्याला चिपळूणवासीयांनीही तितकाच प्रतिसाद दिला.

चिपळूणवासीयांच्या भावना तीव्र आहेत, हे दाखवून दिले आहे. दरम्यान, बुधवारी हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात आमदार शेखर निकम व भास्कर जाधव यांनी चिपळूणचा गाळप्रश्न पोटतिडकीने मांडला.

यावेळी निकम म्हणाले की, २२ जुलै रोजी आलेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे चिपळूणचे मोठे नुकसान झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत ३२०० कोटी रुपये कोकणाला देणार असाल, तर चिपळुणातील नद्यांमधील गाळ व बेटे काढणे, तेथील नद्या मोकळ्या करणे, छोटे-छोटे बंधारे बांधणे या कायमस्वरूपी योजना तातडीने होणे गरजेचे आहे.

एखादी आपत्ती आली तर आपण तीन टप्प्यात काम करतो. पहिल्या टप्प्यात मदत देतो. दुसऱ्या टप्प्यात उभारणीसाठी सहकार्य करतो तर तिसऱ्या टप्प्यात या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी योजना आखतो, असे आमदार निकम यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन