शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

हिवाळी अधिवेशनात चिपळूणचा आवाज घुमला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 17:44 IST

आमदार शेखर निकम व आमदार भास्कर जाधव यांनी हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी करून चिपळूणवासीयांच्या भावना विधिमंडळात व्यक्त केल्या.

चिपळूण : कोकण सगळ्यांनाच आवडतो, मात्र कोकणचा एखादा प्रश्न सोडवायचा असेल अथवा निधी द्यायचा असेल तर थोडेसे हात आखडते घेतले जातात. कोकणाने तुमच्याकडे आजपर्यंत काही मागितले नाही. ७०० ते ८०० कोटी रुपये मोठी रक्कम नाही. सगळेच आश्वासने देतात. कोकणाच्या तोंडाला नेहमीच पाने पुसली जातात.

चिपळुणातील नद्यांमधील तातडीने गाळ व बेटे काढण्यासाठी १७० कोटी रुपयांचा निधी मंजूर व्हावा, तर ही कामे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत झाली पाहिजेत, अशी मागणी आमदार शेखर निकम व आमदार भास्कर जाधव यांनी हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी करून चिपळूणवासीयांच्या भावना विधिमंडळात व्यक्त केल्या.

गेल्या १७ दिवसांपासून चिपळूण बचाव समितीने वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ काढावा व पूररेषा रद्द करावी, या मागणीसाठी येथील प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. शासनाने उपोषणाची दखल घेतली. मात्र, तितकेसे निष्पन्न झालेले नाही. यामुळे चिपळूण बचाव समितीने साखळी उपोषण सुरूच ठेवून भीख मांगो आंदोलन, मूक मोर्चा काढला, तर बुधवारी चिपळूण बंदची हाक दिली. त्याला चिपळूणवासीयांनीही तितकाच प्रतिसाद दिला.

चिपळूणवासीयांच्या भावना तीव्र आहेत, हे दाखवून दिले आहे. दरम्यान, बुधवारी हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात आमदार शेखर निकम व भास्कर जाधव यांनी चिपळूणचा गाळप्रश्न पोटतिडकीने मांडला.

यावेळी निकम म्हणाले की, २२ जुलै रोजी आलेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे चिपळूणचे मोठे नुकसान झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत ३२०० कोटी रुपये कोकणाला देणार असाल, तर चिपळुणातील नद्यांमधील गाळ व बेटे काढणे, तेथील नद्या मोकळ्या करणे, छोटे-छोटे बंधारे बांधणे या कायमस्वरूपी योजना तातडीने होणे गरजेचे आहे.

एखादी आपत्ती आली तर आपण तीन टप्प्यात काम करतो. पहिल्या टप्प्यात मदत देतो. दुसऱ्या टप्प्यात उभारणीसाठी सहकार्य करतो तर तिसऱ्या टप्प्यात या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी योजना आखतो, असे आमदार निकम यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन