शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

चिपळुणात मियावाकी जंगल पद्धतीनुसार जंगल विकसित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 15:42 IST

कोट्यवधी रुपये कमावण्याच्या हव्यासापोटी निसर्गावर घाला घालणाऱ्यांना रोखण्याकरीता यापुढे निसर्गालाच हस्तक्षेप करावे लागेल. मात्र, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी येथे केले.

ठळक मुद्दे चिपळुणात मियावाकी जंगल पद्धतीनुसार जंगल विकसितमाणसाची हाव रोखण्यासाठीच निसर्गाचा वाढता हस्तक्षेप : मकरंद अनासपुरे

चिपळूण : निसर्गाविषयी आतापासूनच संवेदनशील झालो नाहीतर पुढची पिढी माफ करणार नाही. यापुढे पाणीच नव्हे तर ऑक्सिजनही विकत घ्यावे लागेल. त्याची चुणूक आतापासूनच दिसू लागली आहे. कोट्यवधी रुपये कमावण्याच्या हव्यासापोटी निसर्गावर घाला घालणाऱ्यांना रोखण्याकरीता यापुढे निसर्गालाच हस्तक्षेप करावे लागेल. मात्र, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी येथे केले. तसेच कोकणातील स्वदेशी वाणांची सीड बँक सुरू करून शेतकऱ्यांना मोफत बी-बीयाणे उपलब्ध करावीत, असे आवाहनही केले.येथील ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्था व नाम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शहरालगतच्या धामणवणे येथे ज्येष्ठ व्यापारी श्रीराम रेडीज यांच्या सुमारे १०० एकर जागेत जपानमधील तज्ज्ञांच्या मियावाकी जंगल पद्धतीनुसार जंगल विकसित करण्यात येणार आहे.

या कामाचा शुभारंभ बुधवारी प्रसिद्ध अभिनेते अनासपुरे यांच्याहस्ते राज्यवृक्ष ताम्हणच्या लागवडीने काढण्यात आले. यानंतर आमदार शेखर निकम यांच्याहस्ते वृक्ष लागवड करण्यात आले. याठिकाणी सुमारे दहा हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे.त्यानंतर आमदार शेखर निकम यांनी सांगितले की, शासनामार्फ चुकीच्या पद्धतीने विदेशी जातीच्या वृक्ष लागवडी केल्या जात असल्याने त्याचा घातक परिणाम निसर्गावर होत आहे. त्यासाठी लवकरच शासनाचे लक्ष वेधले जाईल. तत्पूर्वी शेतकरी किंवा बागायतदारांनी वृक्ष लागवड करताना स्थानिक जातीच्या वृक्षांची लागवड करावी, असे आवाहन केले. 

टॅग्स :environmentपर्यावरणRatnagiriरत्नागिरीMakrand Anaspureमकरंद अनासपुरे