शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

चिपळूणचा पराभव सेनेच्या जिव्हारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 18:18 IST

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण यांचा तब्बल ३० हजार मतांच्या फरकाने झालेला दारुण पराभव सेनेच्या जिव्हारी लागला आहे. हे शल्य कायम असतानाच आता शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर पाठोपाठ तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सेनेचे संघटन पूर्णत: अडचणीत आले आहे.

ठळक मुद्देचिपळूणचा पराभव सेनेच्या जिव्हारीशहरप्रमुखांच्या पाठोपाठ तालुकाप्रमुखांचाही राजीनामा

चिपळूण : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण यांचा तब्बल ३० हजार मतांच्या फरकाने झालेला दारुण पराभव सेनेच्या जिव्हारी लागला आहे. हे शल्य कायम असतानाच आता शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर पाठोपाठ तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सेनेचे संघटन पूर्णत: अडचणीत आले आहे.यावेळची विधानसभा निवडणूक खऱ्या अर्थाने अटीतटीची झाली. या विधानसभा निवडणुकीत सेनेने जिल्ह्यात भाजपला जराही संधी न देता पाचही जागांवर उमेदवार दिले. या पाच जागांपैकी चिपळूणची जागा खात्रीशीर निवडून येणार, असे सेनेला तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही अपेक्षित होते.

गेली दहा वर्षे चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदार संघात सेनेला ताकद देण्याचे काम माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी केले. चिपळूणचे आमदार म्हणून सलग दोन वेळा विजय मिळविला आहे. मात्र, यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाच जागांपैकी एकमेव चव्हाण यांचा पराभव झाल्याने त्याचा जोरदार धक्का येथील शिवसैनिकांना बसला आहे. त्यांच्या या पराभवावर अजूनही येथील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचा विश्वास बसत नाही. यातूनच शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला.शहरप्रमुखांच्या राजीनाम्यानंतर तालुकाप्रमुख शिंदे यांनीही तितक्याच घाईघाईने राजीनामा दिला आहे. सध्या विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांची लगबग सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार चव्हाण यांनी शिवसैनिकांना खचून जाऊ नका, असे आवाहन केले होते.

एवढेच नव्हे, तर लक्ष्मीपूजनानिमित्ताने त्यांनी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन तातडीने पुढील कामाला सुरुवात केली आहे. असे असताना शहरप्रमुख उमेश सकपाळ आणि त्यांच्या पाठोपाठ तालुकाप्रमुख प्रताप शिंदे या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने येथील शिवसैनिक पूर्णत: खचून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.नुक त्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत सेनेचा बालेकिल्ला असलेल्या चिपळुणातून चव्हाण यांचा धक्कादायक पराभव झाला. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर सेनेत उलटसूलट चर्चा सुरू आहे. अशातच मतदार संघातील पकड कमी होऊ नये यासाठी गेली दहा वर्षे आमदार म्हणून मतदार संघातसहीत जनतेच्या संपर्कात असणाऱ्या माजी आमदार चव्हाण यांचे पुनर्वसन व्हावे, अशी मागणी युवा सेनेचे तालुका अधिकारी उमेश खताते व पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ratnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना