शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

कोकण उद्ध्वस्त करण्याची मुख्यमंत्र्यांनी घेतली सुपारी : अशोक वालम यांचा रत्नागिरीत आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 16:50 IST

नाणार परिसरात होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प कोकणासाठी विनाशकारी आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पासाठी जमीन मोजणी करण्याचे आदेश दिल्याने त्यांनी कोकण उद्ध्वस्त करण्याची सुपारीच घेतला असल्याचा खळबळजनक आरोप कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी रत्नागिरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

ठळक मुद्देराजापुरातील रिफायनरी विरोधातील आंदोलन तीव्र होणारशेवटच्या क्षणापर्यंत लढा सुरू राहणार, वेळप्रसंगी प्राणांतिक उपोषण करू : वालम

रत्नागिरी : नाणार परिसरात होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प कोकणासाठी विनाशकारी आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पासाठी जमीन मोजणी करण्याचे आदेश दिल्याने त्यांनी कोकण उद्ध्वस्त करण्याची सुपारीच घेतला असल्याचा खळबळजनक आरोप कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी रत्नागिरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

नाणार परिसरात होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प कोकणासाठी विनाशकारी आहे.  त्यामुळे हा प्रकल्प रद्दच झाला पाहिजे. त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आपला लढा सुरू राहणार आहे. वेळप्रसंगी प्राणांतिक उपोषण आपण करू, असा इशारा कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी परिषदेत दिला.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पासाठी जमीन मोजणी करण्याचे आदेश दिल्याने त्यांनी कोकण उद्ध्वस्त करण्याची सुपारीच घेतला असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात केंद्र आणि राज्य शासनाचा रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला जोरदार विरोध होत असून, आज अशोक वालम यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, या प्रकल्पाचे केवळ फायदेच सांगण्यात येत आहेत. पण, प्रकल्पामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती कोणीच देत नाही. तालुक्याचे आमदार चार महिन्यांनंतर आता या प्रकल्पाला विरोध करत आहेत.

यापूर्वी त्यांना येथील जनतेची काळजी का वाटली नाही? शिवसेना सत्तेत आहे, खासदार, आमदार, पालकमंत्री शिवसेनेचे आहेत. एवढेच नव्हे तर उद्योगमंत्री, पर्यावरणमंत्री हेदेखील शिवसेनेचे आहेत. तरीदेखील प्रकल्पासाठीचा अध्यादेश काढण्यात आला. जर विरोधच करायचा होता तर अध्यादेश का काढण्यात आला? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

शिवसेना पक्षप्रमुख यांनी मातोश्रीवर आयोजित केलेल्या बैठकीला खासदार, आमदार, पालकमंत्री उपस्थित होते. या बैठकीला प्रकल्पबाधित ग्रामस्थांना बोलावण्यात आले होते. पण, या बैठकीपासून आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी आपली बाजू उचलून धरल्यानंतर आपणास बैठकीला बोलावण्यात आल्याचे वालम यांनी सांगितले.

या बैठकीत येत्या अधिवेशन काळात शिवसेनेचे आमदार, खासदार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करतील आणि हा प्रकल्प येथून हटविण्यात येईल, त्यासाठी मी तुमच्या सोबत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे वालम यांनी स्पष्ट केले.

अधिवेशन काळात प्रकल्पग्रस्त आणि प्रकल्पबाधित गावातील ग्रामस्थ उपोषण करणार असून, या उपोषणाला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिल्याचेही त्यांनी सांगितले.वालम यांनी पुढे सांगितले की, आमचा लढा पक्षविरहीत आहे. प्रकल्प विरोधी भूमिका घेणाºयांचे आम्ही स्वागतच करतो. पण त्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचा बॅनर चालणार नाही. जनतेचा या प्रकल्पाला विरोध असतानाही मुख्यमंत्री मात्र प्रकल्प होण्यासाठीच प्रयत्न करत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत प्रस्तावित जागेतच हा प्रकल्प होणार असल्याचे पुन्हा जाहीर केले आहे. त्यामुळे कोकणावर हा प्रकल्प लादला जात आहे. कोकणातील निसर्ग संपत्ती नष्ट करून हे कोणता विकास करणार आहेत?

मुख्यमंत्र्यांनी कोकणला उद्ध्वस्त करण्याची सुपारीच घेतली आहे. त्यामुळेच ते हा प्रकल्प कोकणाच्या माथी मारत असल्याचे वालम यांनी सांगितले. संपूर्ण कोकणातून हा प्रकल्प हद्दपार झाला पाहिजे, त्यासाठी आपला लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस