शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोल्हापूर येथे खंडपीठ होण्यासाठी मुख्यमंत्र्यांची शिष्टाई, रत्नागिरीतील कार्यक्रमात दिली ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 18:25 IST

रत्नागिरी : कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, ही मागणीचे निवेदन कृती समितीत समावेश असलेल्या रत्नागिरी बार असोसिएशनच्या ...

रत्नागिरी : कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, ही मागणीचे निवेदन कृती समितीत समावेश असलेल्या रत्नागिरी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी रत्नागिरी दाैऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. यावेळी शिंदे यांनी आपण मुख्य न्यायाधीशांची भेट घेऊन चर्चा केली आहे. संयुक्त बैठकीसाठीही त्यांच्याकडे वेळ मागितली आहे. खंडपीठासंदर्भात शासन सकारात्मक असून विषय मार्गी लागेल, अशी ग्वाहीही त्यांनी या शिष्टमंडळाला दिली.रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील ४७०० वकील, साठ हजार खटले व त्यातील हजारो पक्षकार यांच्याशी खंडपीठाचा विषय निगडित आहे. गेली सुमारे ३८ वर्षे कोल्हापूर खंडपीठासाठी लढा सुरू आहे. कोल्हापूर येथे खंडपीठ झाल्यास या सहाही जिल्ह्यांना सोयीचे होणार आहे. त्यामुळे ही मागणी सातत्याने करण्यात येत आहे. येथील लोकनेते श्यामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी बुधवार, दि. २१ रोजी मुख्यमंत्री शिंदे रत्नागिरीत आले असता या कार्यक्रमापूर्वी त्यांना कृती समितीच्या शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते.या शिष्टमंडळात रत्नागिरी बारचे अध्यक्ष व कृती समितीचे सदस्य अॅड. विलास पाटणे, अॅड. अशोक कदम, अॅड. विजय साखळकर, उपाध्यक्ष अॅड. शाल्मली आबुलकर, सचिव अॅड. रत्नदीप चाचले यांचा समावेश होता. या निवेदनात या मागणीसाठी महाराष्ट्र शासनाचे त्या कामी सहकार्य वेळोवेळी लाभले असल्याचे नमूद केले आहे. तथापी, हा विषय अंतिमतः मार्गी लागण्यासाठी आपण देवेंद्रकुमार उपाध्याय, मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांच्याशी संपर्क साधून संयुक्त सभा बोलवावी, ही विनंती करण्यात आली आहे. तसेच अंतिमतः पक्षकारांच्या न्यायासाठी असल्याने मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लागेल, अशी अपेक्षा कृती समितीतर्फे करण्यात आली.यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपण मुख्य न्यायाधीशांशी याबाबत चर्चा करून एकत्रित बैठकीची वेळ मागितली असल्याचे सांगितले. खंडपीठसंदर्भात शासन सकारात्मक असून विषय मार्गी लागेल, अशी ग्वाहीही त्यांनी याप्रसंगी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCourtन्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेadvocateवकिल