शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

निधी खर्च करण्यात चव्हाण आघाडीवर, साळवी पिछाडीवर

By admin | Updated: July 23, 2014 22:29 IST

जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघांसाठी मिळालेल्या एकूण १० कोटी रूपयांच्या निधीपैकी

रत्नागिरी : आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी २ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात येते. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघांसाठी मिळालेल्या एकूण १० कोटी रूपयांच्या निधीपैकी मार्च २०१४ अखेर ८ कोटी ४५ लाख ८५ हजार इतका खर्च झाला आहे. सर्वाधिक खर्च चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांचा १ कोटी ९० लाख इतका झाला असून, सर्वांत कमी राजापूरचे आमदार राजन साळवी यांचा १ कोटी ४२ लाख रूपये इतका झाला आहे.स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी २ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून, हा निधी जिल्हा नियोजन समितीकडून वितरीत केला जातो. यात प्रत्येक मतदार संघातील रस्ते दुरूस्ती, डांबरीकरण व खडीकरण, वर्गखोल्या, पाखाडी बांधणे, पुलांंची दुरूस्ती, समाज मंदिर बांधणे, व्यायामशाळा आदी विकास कार्यक्रमांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सन २०१३ - १४ या आर्थिक वर्षासाठी पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी २ याप्रमाणे एकूण १० कोटी निधी प्राप्त झाला. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात मार्च २०१४ अखेर सर्वाधिक एकूण खर्च चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांचा १ कोटी ९० लाख रूपये इतका झाला आहे.त्याखालोखाल रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, आणि दापोलीचे आमदार सूर्यकांत दळवी यांचा (अनुक्रमे १ कोटी ८७ लाख आणि १ कोटी ८१ लाख रूपये) झाला आहे. या तुलनेने गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचा (१ कोटी ४४ लाख) आणि राजापूरचे आमदार राजन साळवी यांचा (१ कोटी ४२ लाख रूपये) निधी कमी खर्च झालेला दिसून येतो. या पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण मिळालेल्या १० कोटीच्या निधीमधून गतवर्षातील (सन २०१२-१३) अपूर्ण कामासाठी ३ कोटी ३६ लाख २९ हजार इतका निधी वितरीत करण्यात आला होता. २०१३-१४ या आर्थिक वर्षातील नवीन कामासाठी ९ कोटी ९१ लाख ५८ हजार इतका निधी उपलब्ध होता. मार्च १४ अखेर ९ कोटी ९१ लाख ३३ हजार एवढ्या किमतीच्या ३३० नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. एकंदरीत २०१३ - १४ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला देण्यात आलेल्या एकूण १० कोटी निधीपैकी ८ कोटी ४५ लाख ८५ हजार इतका खर्च झाला आहे. उर्वरित १ कोटी ५४ लाख १५ हजाराचा निधी ३१ मार्च २०१४ अखेर कार्यान्वयन यंत्रणेकडे देण्यात आला आहे. त्यामुळे मार्च २०१४ अखेर अपूर्ण राहिलेल्या कामासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांतील विकासकामांसाठी २०१३- १४ साठी प्रत्येकी दोन कोटीची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी मार्च २०१४ अखेर झालेला खर्चमतदारसंघआमदारझालेला खर्च१) दापोलीसूर्यकांत दळवी१,८१,२०,०००२) गुहागरभास्कर जाधव१,४४,०६,०००३) चिपळूणसदानंद चव्हाण१,९०,१६,०००४) रत्नागिरीउदय सामंत१,८७,५८,०००५) राजापूरराजन साळवी१,४२,८५,०००एकूण८,४५,८५,०००