शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

वाशिष्ठी पुलावरून चाकरमान्याचा परतीचा प्रवास होणार सुखकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:35 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या चिपळूण बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी पुलाचे काम अंतिम ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या चिपळूण बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. काॅंक्रीटीकरणाच्या शेवटच्या थराचे (वेरिंग कोट) काम अजून शिल्लक असून, त्याची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच जोडरस्त्याचेही काम शिल्लक आहे. हे काम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाले तर पूल वाहतुकीच्या दृष्टीने चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी खुला होण्याची शक्यता आहे.

चिपळूणच्या वाशिष्ठी नदीवर बांधलेला ब्रिटिशकालीन पूल जीर्ण होऊन धोकादायक बनला आहे. जड वाहनांची वाहतूक झाल्याने हा पूल चक्क हलत होता. त्यामुळे अतिवृष्टीमध्ये पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत होता. तसेच नुकत्याच आलेल्या महापुराच्या वेळी पुलाचा काही भाग खचला आणि वाहतूक ठप्प पडली होती. अखेर मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत नवीन पुलाच्या कामाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुळात मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम केंद्र सरकारने हाती घेतले, तेव्हा त्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणून सर्वप्रथम महामार्गावरील पुलांना मंजुरी देण्यात आली. त्यावेळी सर्वात प्रथम चिपळूण वाशिष्ठी पुलाचे काम सुरू करण्यात आले. चिपळूण परशुराम ते आरवली खेरशेत या ३३ किलोमीटर अंतरातील चौपदरीकरणाच्या टप्प्यात पुलाचा समावेश असल्याने पुलासाठी स्वतंत्र असा निधी दिलेला नाही.

या पुलाचे काम घेतलेल्या पहिल्या ठेकेदाराने काही अडचणीमुळे काम अर्धवट सोडले. त्यानंतर चौपदरीकरण करणाऱ्या चेतक इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडे पुलाचे काम वर्ग करण्यात आले. उर्वरित कामाला चेतक कंपनीने सुरुवात केली. परंतु, कोरोना लॉकडाऊन आणि कामगारांची कमतरता यामुळे चेतक कंपनी अडचणीत आली आणि महामार्गाच्या कामासह पुलाचे कामदेखील त्या कंपनीने सोडून दिले. साहजिकच वाशिष्ठी पुलाचे काम ठप्प पडले. त्यानंतर आलेल्या रिगल इन्फ्रा कंपनीने हे काम हाती घेतले आणि कामाला गती मिळाली. खासदार विनायक राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करून पुलाचे काम सलग २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याला यशदेखील आले.

-------------------------

आता वाशिष्ठी पुलाचे मूळ काम पूर्ण झाले आहे. पुलावरील अंतिम टप्प्यातील काॅंक्रीटीकरण (वेरिंग कोट) चार दिवसांत देण्यात येणार आहे. तसेच जोडरस्त्याचे डांबरीकरण येत्या ८ दिवसात पूर्ण करून पूल एकेरी वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

- आर. आर. मराठे, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, चिपळूण.

----------------------------

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास होणार सुखकर

कोकणातील गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणासाठी लाखो गणेशभक्त चाकरमानी कोकणात येतात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी पुलाचे लोकार्पण करण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्णत्त्वास गेले तरी लोकार्पणासाठी कालावधी लागल्यास या पुलावरून चाकरमान्यांचे आगमन शक्य नाही. पण, परतीचा प्रवास सुखकर होण्याची शक्यता आहे.

--------------------

पुलाची एकूण लांबी २४७.५ मीटर

रुंदी २४ मीटर

१२ मीटर रुंदीचे दोन पूल

७ पिलर

पिलरची उंची १४.३०० मीटर