शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पावसामुळे तयार होईनात गड-किल्ले; बच्चे कंपनीमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 14:11 IST

पावसामुळे मोकळ्या जागेत किल्ले उभारणे अशक्य असल्याने सध्या तरी इमारतींच्या बेसमेंटमध्ये किल्ले तयार करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देमातीचे किल्ले बनविण्यासाठी शहर, गावांमध्येही अनेक स्पर्धांचे आयोजन

रत्नागिरी : बच्चे कंपनीची परीक्षा संपून गुरूवारपासून दीपावलीची सुटी सुरू झाली. दीपावलीत बच्चे कंपनी खास मातीचे किल्ले तयार करते. मात्र, पावसामुळे किल्ले तयार करण्यात अडचण निर्माण झाल्याने बच्चे कंपनीमध्ये नाराजी आहे. शहरात काही मंडळांतर्फे आकर्षक किल्ले स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असले तरी पावसामुळे किल्ले कुठे तयार करावे, असा प्रश्न आहे.ग्रामीण भागात दिवाळीपूर्वी घरासमोर अंगण तयार केले जात असे. अंगणातील एका कोपºयात मातीने लिंपून किल्ला तयार करण्यात येत असे. परंतु, केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातदेखील किल्ले तयार केले जातात. कोणत्या तरी एका किल्ल्याची संकल्पना घेऊन मोठ्यांच्या सहकार्यातून किल्ले तयार केले जातात. माती लिंपून किल्ले तयार करण्याबरोबरच आकर्षक गढी किंवा बुरूजही उभारण्यात येतात. काही ठिकाणी काल्पनिक तर काही ठिकाणी ऐतिहासिक किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती बनवली जाते. शिवाय किल्ल्यांना आकर्षक रंगरंगोटीदेखील करण्यात येत आहे.मेथी, मोहरी टाकून हिरवळ उगविण्यात येते. पूर्वी बच्चे कंपनी खेळण्यातील बाहुल्या किंवा शोभेच्या वस्तूंनी किल्ल्याचे सुशोभिकरण करीत असत. मात्र, आता तयार मावळे, शिवाजी महाराज तसेच प्राणी इतकेच नव्हे तर रेडिमेड किल्लेदेखील बाजारात विक्रीला उपलब्ध आहेत. १० ते ५० रूपयांपर्यंत मावळे, शिवाजी महाराजांच्या मूर्ती विकण्यात येत आहेत. तर तयार किल्ले १५० ते ३०० रूपयांपर्यंत विकण्यात येत आहे. पावसामुळे मोकळ्या जागेत किल्ले उभारणे अशक्य असल्याने सध्या तरी इमारतींच्या बेसमेंटमध्ये किल्ले तयार करण्यात येत आहेत.शहरातील फ्लॅट संस्कृतीमध्ये गॅलरीच्या कोपऱ्यात हा किल्ला ठेवून सुशोभिकरण केले जाते किंवा इमारतीच्या बेसमेंटमध्ये किल्ला उभारण्यात येत आहे. छोट्या-छोट्या हाताने माती भिजवून ती लिंपून दगड किंवा विटांचे तुकडे यांच्याद्वारे सुशोभिकरण करून रंगरंगोटी केली जाते. पाण्याची कारंजी किंवा धबधबेदेखील दाखविण्यात येतात.किल्ले बनविले जाणारकिल्लाप्रेमी मंडळांकडून किल्ले बनविण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असले तरी पावसामुळे किल्ले तयार करण्याच्या कामात व्यत्यय येत आहे. रत्नागिरीतील भाट्ये, मांडवी किनाºयांवर बच्चे कंपनीकडून असे किल्ले तयार केले जातात.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFordफोर्ड