शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

जातीचे दाखले अडकले तलाठी चौकशीत

By admin | Updated: March 30, 2015 00:24 IST

दालदी समाज : ‘शासकीय’ कारभाराने मच्छिमार झाले हैराण

रत्नागिरी : मुस्लिम मच्छिमार दालदी समाजातील लोकांना जातीचे दाखले मिळवण्यासाठी सेतू कार्यालयात पायपीट करावी लागत आहे. आता दाखले तलाठी चौकशीच्या गर्तेत अडकले जात असल्याने मच्छिमार हैराण झाले आहेत. मुस्लिम मच्छिमार दालदी समाजाला इतर मागासवर्गीयांचे दाखले मिळत असले तरी ते सहजासहजी मिळत नाहीत. समाजाकडे योग्य नेतृत्व नसल्याने या समाजाला दाखल्यांसह इतर शासकीय कामांमध्ये अनेक अडथळे निर्माण होत आहेत. अनेकदा कागदपत्रांची पूर्तता असताना जाणीवपूर्वक अमूकच कागद पाहिजे, असे सांगून दाखला देण्यास सहा ते सात महिने काढले जातात. त्यामुळे सेतूचे उंबरठे झिजवून अनेक जणांनी दाखला मिळविण्याचा नादच सोडून दिला. गरीब, गरजू आणि विकासापासून नेहमीच वंचित राहिलेल्या या समाजाला आता जातीचा दाखला मिळविण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तलाठी चौकशी करताना यापूर्वी तलाठ्याकडे लाभार्थी अर्ज हातीच घेऊन जात होता. आता तलाठी चौकशीसाठी अर्ज सेतू कार्यालयात जमा करावा लागतो. त्यानंतर तो टपालातून त्या-त्या तलाठ्यांकडे चौकशी जातो. मात्र, एका तलाठी चौकशीसाठी दोन ते तीन महिने जात असल्याने दाखल्यासाठी खूप उशिर होत आहे. त्यासाठी तलाठी चौकशीसाठी पूर्वीचीच पध्दतीचा वापर करण्यात यावा, अशी मागणी या समाजाकडून करण्यात येत आहे. जेणेकरुन दाखला मिळण्यास उशीर होणार नाही. (शहर वार्ताहर)दालदी समाजातील लोकांना जातीचे दाखले मिळविताना सेतूमध्ये पायपीट करावी लागत असल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मच्छिमार बांधवांची त्यामुळे ससेहोलपट होत आहे. याप्रकरणी शासनाने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.